शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची; समता योद्धा पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2023 20:55 IST

Nagpur News संविधान संपवून मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. याच्या विरोधात लढा उभारावा लागेल. ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची आहे, असे मत दिल्ली महाविद्यालयातील प्रो. डॉ. लक्ष्मण यादव यांनी केले.

 

नागपूर : शिक्षणाचे खासगीकरण करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांना शिक्षणच घेता येऊ नये म्हणून ते अधिक महागडे करण्यात येते. काहीजण मागासवर्गीयांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. संविधान संपवून मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. याच्या विरोधात लढा उभारावा लागेल. ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची आहे, असे मत दिल्ली महाविद्यालयातील प्रो. डॉ. लक्ष्मण यादव यांनी केले.

समता सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात समता योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन पथसंचलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲड. फिरदौस मिर्झा, प्रा. सूरज मंडल, प्रीतम प्रियदर्शी, अमन कांबळे, चित्रपट दिग्दर्शक तृषांत इंगळे, ॲड. स्मिता कांबळे, प्रामुख्याने उपस्थित होते.

माणसाला माणूस बनविण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे आज ९० टक्के लोकांना लाभ होत आहे. डॉ. आंबेडकर इतरांना कळू नये, याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांच्या समग्र प्रकाशनासाठी ४० वर्षे लागली. पुस्तकातून त्यांना गायब ठेवण्यात आले. ओबीसी व हिंदू कोडबिलसाठी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आज विचारधारेची लढाई आहे. संविधान संपवून मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा विरोध झाला पाहिजे. प्रधानमंत्री ओबीसी असल्याचे सांगतात. ते ओबीसी आहेत तर जातनिहाय जनगणना का करीत नाहीत, ओबीसींना ५२ टक्के आरक्षण का देत नाहीत? जाती जनगणना हा सामाजिक न्यायाचा विषय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ॲड. फिरदौस मिर्झा यांनी बाबासाहेब आता विरोधकांनाही समजावून सांगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत आपण आपल्याकडून तसा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

संचालन ॲड. आकाश मून यांनी केले. यावेळी स्वप्नील गणवीर, विपीन तातड, महेश इंगोले या रॅप स्टारनी जयभीम कडक हे रॅप गीत सादर करीत तरुणाईमध्ये जोश भरला.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती