शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

साडेसात लाख मतदारांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:47 IST

यवतमाळ-वाशिम मतदारसंघ; मतदान टाळणाऱ्यांची कोण दखल घेणार?

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणूक विभागाने जनजागृती करूनही लोकसभेच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान होऊ शकलेले नाही. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील थोडेथोडके नव्हे, तब्बल ७ लाख ४४ हजार ९७९ मतदार मतदानापासून लांब राहिले. हे मतदार देशभक्त नाहीत का, मतदान प्रक्रियेबाबत एवढी उदासीनता असण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या मतदारसंघात १९ लाख १४ हजार ७८५ एकूण मतदार आहेत. सर्व मतदारांनी मतदान करणे सक्तीचे नसले तरी सक्षम लोकशाहीसाठी गरजेचे होते. त्यामुळेच शंभर टक्के मतदानाचा आकडा गाठण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती केली होती. प्रत्यक्षात पाच वर्षापूर्वी झालेल्या ५८ टक्के मतदानापेक्षा फक्त तीन अंकाने मतदानाची टक्केवारी वाढू शकली. ६१.०९ टक्के मतदान झाल्याची नोंद प्रशासनाने जाहीर केली आहे. गेल्या पाच वर्षात देशभक्तीची एक ‘वेगळी’ चर्चा यवतमाळ-वाशिमच नव्हेतर संपूर्ण देशभरात सुरू आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्याची जशी टूम आली, तशीच ‘आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र इतरांनी देण्याची गरज नाही’, असे दणक्यात सांगणाºयांचीही संख्या वाढली. मग देशभक्तीचा ठेका घेणाºया या भारतीयांना लोकशाही प्रक्रियेत भाग घेणे का जीवावरचे ओझे वाटले? हा प्रश्न आहे.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात तब्बल ७ लाख ४४ हजार ९७९ मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य टाळले.मतदानासाठी युद्धभूमीवर जाण्याची गरज नव्हती, हाती बंदूक घेण्याची गरज नव्हती, तोंडाची वाफ गमावून विरोधकांवर टीका करण्याची गरज नव्हती. गरज होती ती फक्त स्वाभिमानाने जाऊन योग्य उमेदवाराला मत देण्याची. पण सोशल मीडियात देशभक्ती फारवर्ड करणाºयांनी हे साधे राष्ट्रीय कर्तव्य बजावले नाही.का टाळले मतदान?उन्ह खूप होते, काय करायचे मतदान करून? कोणीही निवडून आले तरी काय फरक पडतो?- मी नोकरीसाठी बाहेरगावी असतो, कसे मतदान करणार? मतदार यादीत नावच सापडले नाही. मतदान टाळण्याची अशी अनेक कारणे सांगितली जात आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर