शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

नागपुरात लॉकडाऊनच्या काळात १३ दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:29 IST

लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले.

ठळक मुद्देसात महिन्यात ३०३ अपघात : ४४ दुचाकीस्वारांचा मृत्यूमृतांमध्ये विना हेल्मेट चालकांची संख्या अधिक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले. विशेष म्हणजे, जानेवारी ते जुलै या काळात ३०३ अपघात झाले. त्यात ९१ प्राणांतिक अपघात झाले असून ४४ दुचाकीस्वारांचा समावेश होता. यातील बहुतांश चालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे किंवा हेल्मेटचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले आहे.नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ९४० अपघात, ३४० मृत्यू व ९८१ व्यक्ती जखमी झाल्या. जिल्ह्यात एकूण २०५७ अपघात, ५७७ मृत्यू व २१६८ जखमी झाले. २०१९ मध्ये शहरात १००७ अपघातात २५० मृत्यू तर १०४२ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ८४३ अपघात, ३८४ मृत्यू व ९५० जखमी झाले. जिल्ह्यात एकूण १८५० अपघात, ६३४ मृत्यू व १९९२ जखमी झाले. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये २०७ अपघात कमी झाले असले तरी शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी जानेवारी ते जुलै महिन्यात ३०३ अपघात झाले आहेत.मार्चमध्ये ५, एप्रिलमध्ये २ तर मेमध्ये ६ दुचाकीस्वारांचा मृत्यूजानेवारी महिन्यात ७, फेब्रुवारी महिन्यात १४, मार्च महिन्यात ५, एप्रिल महिन्यात २, मे महिन्यात ६, जून महिन्यात ६ तर जुलै महिन्यात ४ दुचाकीस्वारांचे प्राणांतिक अपघात झाले. यात लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळात झालेल्या अपघातात १३ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला.वेगाने वाहन चालविणे हे अपघातांचे कारणवाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, वाहतुकीसाठी निर्देशित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे किंवा रस्त्यावरील स्थिती न पाहता वेगाने वाहन चालविणे हे जवळपास १/३ जीवघेण्या अपघातांचे कारण असते. अतिवेगामुळे अपघात टाळण्यास कमी वेळ मिळतो, अपघाताची शक्यता वाढते व अपघात झाल्यास त्याची तीव्रताही वाढते. यातच हेल्मेट न घालता किंवा बोगस कंपन्यांचे अयोग्य हेल्मेट घालून दुचाकी चालवित असताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता अधिक पटीने वाढते.अपघात निश्चितच टाळता येण्यासारखेमागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यापर्यंत सर्व प्रकारचे अपघात मिळून २६८ अपघात कमी झाले आहेत. जुलै २०१९ मध्ये १३५ प्राणांतिक अपघात झाले होते. त्या तुलनेत जुलै २०२० मध्ये ९१अपघात झाले आहेत. ४४ अपघात कमी झाले आहेत. परंतु अपघात मुक्त शहर करण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात.विक्रम साळी,पोलीस उपआयुक्त (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर