शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लॉकडाऊनच्या काळात १३ दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:29 IST

लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले.

ठळक मुद्देसात महिन्यात ३०३ अपघात : ४४ दुचाकीस्वारांचा मृत्यूमृतांमध्ये विना हेल्मेट चालकांची संख्या अधिक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले. विशेष म्हणजे, जानेवारी ते जुलै या काळात ३०३ अपघात झाले. त्यात ९१ प्राणांतिक अपघात झाले असून ४४ दुचाकीस्वारांचा समावेश होता. यातील बहुतांश चालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे किंवा हेल्मेटचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले आहे.नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ९४० अपघात, ३४० मृत्यू व ९८१ व्यक्ती जखमी झाल्या. जिल्ह्यात एकूण २०५७ अपघात, ५७७ मृत्यू व २१६८ जखमी झाले. २०१९ मध्ये शहरात १००७ अपघातात २५० मृत्यू तर १०४२ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ८४३ अपघात, ३८४ मृत्यू व ९५० जखमी झाले. जिल्ह्यात एकूण १८५० अपघात, ६३४ मृत्यू व १९९२ जखमी झाले. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये २०७ अपघात कमी झाले असले तरी शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी जानेवारी ते जुलै महिन्यात ३०३ अपघात झाले आहेत.मार्चमध्ये ५, एप्रिलमध्ये २ तर मेमध्ये ६ दुचाकीस्वारांचा मृत्यूजानेवारी महिन्यात ७, फेब्रुवारी महिन्यात १४, मार्च महिन्यात ५, एप्रिल महिन्यात २, मे महिन्यात ६, जून महिन्यात ६ तर जुलै महिन्यात ४ दुचाकीस्वारांचे प्राणांतिक अपघात झाले. यात लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळात झालेल्या अपघातात १३ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला.वेगाने वाहन चालविणे हे अपघातांचे कारणवाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, वाहतुकीसाठी निर्देशित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे किंवा रस्त्यावरील स्थिती न पाहता वेगाने वाहन चालविणे हे जवळपास १/३ जीवघेण्या अपघातांचे कारण असते. अतिवेगामुळे अपघात टाळण्यास कमी वेळ मिळतो, अपघाताची शक्यता वाढते व अपघात झाल्यास त्याची तीव्रताही वाढते. यातच हेल्मेट न घालता किंवा बोगस कंपन्यांचे अयोग्य हेल्मेट घालून दुचाकी चालवित असताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता अधिक पटीने वाढते.अपघात निश्चितच टाळता येण्यासारखेमागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यापर्यंत सर्व प्रकारचे अपघात मिळून २६८ अपघात कमी झाले आहेत. जुलै २०१९ मध्ये १३५ प्राणांतिक अपघात झाले होते. त्या तुलनेत जुलै २०२० मध्ये ९१अपघात झाले आहेत. ४४ अपघात कमी झाले आहेत. परंतु अपघात मुक्त शहर करण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात.विक्रम साळी,पोलीस उपआयुक्त (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर