शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

अमरावती जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना दुसऱ्या लाटेच्यावेळी सर्वाधिक रुग्ण अमरावतीमध्ये नोंद झाले होते. यावरून कोरोनाची ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना दुसऱ्या लाटेच्यावेळी सर्वाधिक रुग्ण अमरावतीमध्ये नोंद झाले होते. यावरून कोरोनाची दुसरी लाट अमरावती येथून सुरू झाल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, याच जिल्ह्यात दुसरी लाटेतील रुग्ण कमी झाले असताना अलीकडे रुग्ण वाढत असल्याने ही तिसरी लाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, इतक्या कमी दिवसांत तिसरी लाट येणे किंवा लाटेवर लाट येणे शक्य नाही. परंतु या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण वाढायला लागले. १ फेब्रुवारी रोजी ९२ रुग्णांची नोंद झाली असताना १४ फेब्रुवारी रोजी ३९९ रुग्णांची नोंद झाली. १ ते १४ फेब्रुवारीदरम्यान ३,३१५ रुग्णांची वाढ झाली. १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ४,२३० रुग्णांची भर पडताच जिल्हा प्रशासनाने २२ फेब्रुवारीपासून कडक निर्बंध लावले. २२ ते २८ फेब्रुवारीमध्ये ५,५९३ रुग्णांची नोंद झाली. वाढत असलेल्या रुग्णसंख्येला घेऊनच २२ फेब्रुवारीपासून कडक निर्बंध लावण्यात आले.

-अंतर्गत कडक निर्बंधामुळे दुसरी लाट ओसरल्याचे चित्र

अमरावती जिल्ह्यात निर्बंधाचा प्रभाव दिसून येण्यास साधारण १५ दिवसांचा कालावधी लागला. त्यामुळे २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ५,५९३ नवे रुग्ण आढळून आले. १ ते ११ मार्च दरम्यान ६,१६६ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली. १२ ते २१ मार्चदरम्यान ४,११२, २२ ते ३१ मार्चदरम्यान ३,२४०, १ ते १० एप्रिलदरम्यान ३,२८८ नवे रुग्ण आढळून आले. दुसरी लाट ओसरत असल्याचे मत व्यक्त होऊ लागले.

- यामुळे तिसऱ्या लाटेची शंका वाढली

रुग्णसंख्येत कमालीची घट येताच, कोरोनावर नियंत्रण मिळविणारा अमरावती जिल्हा ‘मॉडेल’ म्हणून नावारुपास आला. परंतु १५ मार्चपासून राज्याचे निर्बंध लागू झाले. जिल्ह्याचे कडक निर्बंध निघाले. शहर आणि ग्रामीण भागातील लोकांची अंतर्गत रहदारी वाढली. लग्न सोहळ्यात लोक सहभागी होऊ लागले. परिणामी, पुन्हा रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. ११ ते २० एप्रिलदरम्यान ५,९४२, २१ ते ३० एप्रिलमध्ये ७,८५२ नवे रुग्ण आढळून आले. १० मे रोजी तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. १,००५ रुग्णांची नोंद झाली. १ ते १० मे यादरम्यान सर्वाधिक १०,७२३ रुग्ण आढळून आले. ११ ते १९ मेदरम्यान ८,८५९ रुग्णांची नोंद झाली. या संख्येला घेऊनच अमरावतीमध्ये तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे; परंतु जिथे ग्रामीण भागात कमी रुग्ण होते तिथे रुग्ण वाढल्याने रुग्णसंख्येत भर पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-तिसरी लाट नक्कीच नाही

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होताना दिसत होती. यादरम्यान कोरोनाचा प्रतिबंधक नियमांची लोकांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. याच काळात लग्न सोहळे, कौटुंबिक कार्यक्रम झाले. त्याचा परिणाम, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दिसायला लागला. अमरावती जिल्ह्यात दुसरी लाट गेलीच नाही तर तिसऱ्या लाटेचा प्रश्न येतोच कुठे? सध्या मागील काही दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा कमी होताना दिसून येत आहे.

-डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती जिल्हा

-अमरावती जिल्ह्यातील चार महिन्यांतील स्थिती

कालावधी : नव्या रुग्णांची संख्या

१ ते १४ फेब्रुवारी : ३,३१५

१५ ते २१ फेब्रुवारी : ४,२३०

२२ ते २८ फेब्रुवारी : ५,५९३

१ ते ११ मार्च : ६,१६६

१२ ते २१ मार्च : ४,११२

२२ ते ३१ मार्च : ३,२४०

१ ते १० एप्रिल : ३,२८८

११ ते २० एप्रिल : ५,९४२

२१ ते ३० एप्रिल : ७,८५२

१ ते १० मे : १०,७२३

११ ते १९ मे : ८,८५९