शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तिसऱ्या दिवशीही कोल्ड स्टोअरेजची आग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 20:34 IST

भंडारा मार्गावरील कापसी-महालगाव परिसरात असलेल्या सुरुची मसालेच्या पाच मजली कोल्ड  स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग बुधवारी तिसऱ्या दिवशीही धुमसत आहे. कोल्ड स्टोअरेजच्या पाचव्या मजल्याला लागलेली आग चौथ्या व तिसऱ्या मजल्यापर्यंत आली आहे. आगीमुळे बांधकामासाठी वापरण्यात आलेले स्टील व लोखंड वितळत असल्याने इमारत धोकादायक झाली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी बाजूच्या दुसऱ्या गोदामात पोहोचलेली आग आटोक्यात आली आहे.

ठळक मुद्देपाचवरून तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आग पसरली : नियंत्रणाची व्यवस्था नसल्याने आगीचा भडका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा मार्गावरील कापसी-महालगाव परिसरात असलेल्या सुरुची मसालेच्या पाच मजली कोल्ड  स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग बुधवारी तिसऱ्या दिवशीही धुमसत आहे. कोल्ड स्टोअरेजच्या पाचव्या मजल्याला लागलेली आग चौथ्या व तिसऱ्या मजल्यापर्यंत आली आहे. आगीमुळे बांधकामासाठी वापरण्यात आलेले स्टील व लोखंड वितळत असल्याने इमारत धोकादायक झाली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी बाजूच्या दुसऱ्या गोदामात पोहोचलेली आग आटोक्यात आली आहे.कापसी खुर्द येथील सुरुचीचे हे स्टोअरेज महामार्गाला लागून आहे. १.४ एकर परिसरात हे विस्तारले असून, पहिल्या पाच माळ्याच्या स्टोअरेजमध्ये हजारो मिरची पोती भरून ठेवली होती. पाचव्या, चौथ्या व तिसऱ्या माळ्यांपर्यंत ही आग पसरली आहे तर, दुसरे स्टोअरेज चार माळ्यांचे आहे. येथे मंगळवारी आग पसरली होती. आगीत आतमध्ये असलेल्या मसाले बनविण्यासाठीची सर्व सामग्रीची पोती जळाली. बुधवारी ही आग आटोक्यात आली आहे. मात्र पाच माळ्यांच्या स्टोअरेजमधील आग आटोक्यात येणे शक्य नाही. ती आणखी काही दिवस राहील. ही इमारत धोकादायक झाली आहे. आग आटोक्यात आल्यानंतर इमारत पडली नाही तरी तिचा वापर धोकादायक असल्याने ती जमीनदोस्त करावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दुसऱ्या कोल्ड स्टोअरेजच्या इमारतीत आग विझविताना मंगळवारी वाहनचालक डी. बी. बिनीकर, आर. डी. पवार, योगेश खोडके आणि रोशन कावळे हे चार जण जखमी झाले. या सर्वांना तातडीने पारडी भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील बिनीकर यांच्या हाताची कातडी भाजल्याने त्यांना क्रिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.फायर फायटिंगची यंत्रणा नाहीपाच मजली कोल्ड स्टोअरेज उभारताना येथे करण्यात येणारा मालाचा साठा विचारात घेता सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीत फायर फायटिंग, पाण्याचा मारा करण्यासाठी स्प्रिंकलर्स बसविणे आवश्यक होते. ही यंत्रणा असती तर स्टोअरेजला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणणे शक्य झाले असते. परंतु स्टोअरेज मालकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. आता ती शक्य नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.धोकादायक इमारतीच्या यादीतअग्निशमन विभागातर्फे १ सप्टेंबर २०१४ रोजी या परिसराची तपासणी करण्यात आली होती. यात इमारतीत आगप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने, त्यावेळी स्टोअरेज मालकाला नोटीस बजावण्यात आली होती. यासाठी २६ सप्टेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली होती. नोटीसकडे दुर्लक्ष केल्यानेच ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. विभागाने यासंदर्भात नागपूर महानगर विकास प्राधिकरण व कापसी खुर्द पंचायत समितीलाही कळविले होते. यात पाणी व वीज तोडावी, अशी सूचना केली होती. तर, विभागाने दिलेल्या नोटीसला स्टोअरेज मालकाने न्यायालयात आव्हान देऊन स्थगनादेश मिळविला. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अग्निशमन विभागाला कारवाई करता आलेली नाही१५ लाख लिटर पाण्याचा मारासध्या घटनास्थळी कळमना व सक्करदरा येथील चार बंबांसह टीटीएलतर्फे पाण्याचा मारा करण्यात येत आहे. स्टोरेज परिसरात हायड्रंन्ट असल्याने आग विझविण्यास लागत असलेले पाणी उपलब्ध आहे. किमान दोन लाख लिटर पाणी क्षमता येथे आहे. तसेच आसपासच्या परिसरातूनही पाणी उपलब्ध असल्याने इमारतीवर सातत्याने पाण्याचा मारा करण्यात येत आहे. तीन दिवसात १५ लाख लीटरहून अधिक पाण्याचा मारा करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आग नियंत्रणाच्या प्रयत्नात असून बुधवारी अग्निशमन विभागाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे व विभागाचे अधिकारी व कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर