शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील एटीएमवर चोरटे साधताहेत डाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:00 IST

ATM Theft, Nagpur Crime News चोरांचे हात सरावलेले आहेत आणि हातोडा मारल्याबरोबर धनाचा लाभ कुठून होईल, याचा ते सातत्याने वेध घेत असतात. एटीएम सेंटर हे चोरांसाठी एकमुश्त रक्कम मिळविण्यासाठीचे साधन झाले आहेत आणि या सेंटर्समधून जर तुम्ही पैसे काढत असाल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देएकमुश्त रक्कम मिळण्याच्या गॅरन्टीने ठरताहेत गुन्हेगारांच्या आवडीचे केंद्ररात्रीपासून ते पहाटेपर्यंत गर्दी कमी असल्याचा घेताहेत लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरांचे हात सरावलेले आहेत आणि हातोडा मारल्याबरोबर धनाचा लाभ कुठून होईल, याचा ते सातत्याने वेध घेत असतात. एटीएम सेंटर हे चोरांसाठी एकमुश्त रक्कम मिळविण्यासाठीचे साधन झाले आहेत आणि या सेंटर्समधून जर तुम्ही पैसे काढत असाल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. रात्रीच्या नीरव शांततेत एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरटे सज्ज आहेत आणि अशात जर तुम्ही एकटे असाल तर त्यांच्या सज्जतेला तुम्हीही बळी पडण्याची शक्यता आहे.केवळ सप्टेंबर महिन्याकडे लक्ष वेधले तर एटीएममधून मोठी रक्कम लंपास करण्याच्या ६-७ घटना शहरात उघडकीस आल्या आहेत. हरियाणा आणि बिहार येथील गयामध्ये एटीएम फोडणाऱ्या टोळीचे काही सदस्य नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांचे कार्ड बदलविण्याचे व त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम उडविण्याच्या घटनाही पुढे यायला लागल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यावर विचार करावा तर ‘टाळेबंदी’च्या काळात गुन्हेगारांसाठी एटीएम मशीन मोठी रक्कम काढण्याचे प्रमुख माध्यम झाले आहेत. सुरक्षारक्षक नसलेले एटीएम सेंटर तर त्यांच्यासाठी पर्वणीच ठरत आहेत. प्राप्त माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी आशीर्वाद नगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून १.६६ लाख रुपये अज्ञात आरोपींनी काढले. १३ सप्टेंबरला हुडकेश्वर येथील म्हाळगीनगर चौकातील एटीएम चोरट्यांचे लक्ष्य ठरले. १४ सप्टेंबरला कळमना, नाका क्रमांक ४च्या पुढे असलेल्या एसबीआयच्या एटीएममधून अज्ञात आरोपीने ८२ हजार रुपयांवर हात साफ केला. १५ सप्टेंबरला प्रतापनगर ठाण्याच्या हिंगणा टी-पॉर्इंट येथील एटीएममधून आरोपीने २ लाख १३ हजार रुपये काढले. वाडी येथील एटीएममधून १.८० लाख रुपयाची चोरी झाली. १६ सप्टेंबरला बेलतरोडी येथील चिंचभवन चौकात असलेल्या एसबीआय एटीएममधून ८० हजार रुपये चोरीला गेले. १७ सप्टेंबरला वर्धमाननगर येथील एटीएम फोडून १.२५ लाख रुपये लंपास करण्यात आले. २३ सप्टेंबरला वाडी येथील कॅनरा बँकेच्या एटीएममधून २.३९ लाख रुपये उडविण्यात आले. ग्रामीण भागातील एटीएम सेंटरही चोरट्यांच्या रडारवर आहेतच.रात्रीच्या वेळी मिळतो भरपूर वेळजाणकारांच्या मते, गुन्हेगारांना एटीएम मशीन्समधून मोठी रक्कम मिळण्याची गॅरन्टी असते. या मशीन्सच्या कोणत्या यंत्रणेला, कोणत्या प्रक्रियेच्या वेळी हात लावायचा, याची संपूर्ण माहिती या प्रशिक्षित अट्टल गुन्हेगारांना आहे. त्यामुळेच, चोरटे रात्री ९ वाजतापासून ते पहाटे ५.३० वाजतापर्यंतच्या काळात संधी साधत असतात. यावेळी नागरिकांची वर्दळ जवळपास नसतेच. एटीएममध्येही कुणी येत नाहीत. घटनेच्या दुसºया दिवशीच संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांना गडबड झाल्याची बाब कळते.कठोर सुरक्षा व्यवस्थेची गरजसर्वच बँकांना रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शिकेचे पालन करणे गरजेचे असल्याचे शहरातील सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी सांगितले. सर्वच सेंटर्सवर सीसीटीव्ही असतातच. परंतु, तेथे सायरन अलर्ट सिस्टिम व आर्म्स गार्ड असणे गरजेचे आहे. एटीएमच्या अंतर्गत पार्ट्स सोबत हातचलाखी करताच सायरन वाजण्याची व्यवस्था असेल तर बाजूबाजूचे लोक तात्काळ एकत्रित येऊ शकतात. परंतु, बहुतांश एटीएममध्ये सुरक्षारक्षकच नसतो. आवश्यक व्यवस्थेच्या अभावी घटनेनंतरच पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरच धावपळ करावी लागत असल्याचे बागुल म्हणाले.

टॅग्स :atmएटीएमtheftचोरी