शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

चोरट्याने केली महानगरांत जीवाची मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 11:29 IST

मालकाचा विश्वासघात करून साडेआठ लाख रुपये चोरून नेणाऱ्या चोरट्याने आधी स्वत:वर उपचार करून घेतले. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या महानगरांत जाऊन जीवाची मुंबई केली.

ठळक मुद्दे आधी उपचार, नंतर ऐश, आता हातकड्या

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालकाचा विश्वासघात करून साडेआठ लाख रुपये चोरून नेणाऱ्या चोरट्याने आधी स्वत:वर उपचार करून घेतले. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या महानगरांत जाऊन जीवाची मुंबई केली. सोने, दुचाकी विकत घेऊन ऐशोआरामात सहा महिने काढले. आता तो पोलिसांच्या कोठडीत पाहुणचार घेत आहे. गेल्या आठवड्यात गणेशपेठ पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक करून नागपुरात आणलेला आरोपी राजकुमार शांतिलाल गुप्ता ऊर्फ हेमंत शांतिलाल गोयल (वय ५३) याच्या चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे.आरोपी गुप्ता ऊर्फ गोयल मूळचा पुण्याच्या रामटेकडी (हडपसर) परिसरातील रहिवासी आहे. येथील हॉटेल व्यावसायिक अफजल अबुबकर मिठ्ठा (वय ४२) यांच्याकडे तो काम करायचा. मिठ्ठा यांचा आरोपीवर खूप विश्वास होता. त्यामुळे मोठे आर्थिक व्यवहारही ते त्याला सोपवायचे. १९ आॅगस्ट २०१९ ला दुपारी १ वाजता मिठ्ठा यांनी गुप्ता ऊर्फ गोयलला ८ लाख ५५ हजाराचा चेक देऊन बँकेतून रक्कम आणायला सांगितले. दुपारी गेलेला गोयल सायंकाळ होऊनही परत न आल्यामुळे काळजीत पडलेल्या मिठ्ठा यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. साडेआठ लाखांची रोकड घेऊन बेपत्ता झालेल्या गोयलचा मोबाईल बंद होता. त्याचे अपहरण झाले असावे, अशीही शंका आली. त्यामुळे पोलिसही हादरले. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी बरीच धावाधाव केली. मात्र, तो काही हाती लागला नाही.पोलीस इकडे त्याचा शोध घेत होते तर गुप्ता सरळ पुण्याला पोहचला होता. त्याला हायड्रोसिल अन् जबड्याचे दुखणे होते. त्यावर त्याने खासगीत उपचार करून घेतले. प्रकृती चांगली झाल्यानंतर त्याने सोनसाखळी, अंगठी विकत घेतली. नंतर इंदूर गाठले. तेथे अनेक दिवस ऐशोआराम केला. तेथून जबलपूरला पोहचला. तेथेही जीवाची मुंबई करून घेतली. नंतर उत्तरप्रदेशात पोहचला. लखनौचा नवाबी पाहुणचार घेतल्यानंतर जवळच्या राजाजीपुरम (तालकटोरा) येथे त्याने बस्तान बसविले. तेथेच त्याने बनावट आधारकार्ड तयार करून मोटरसायकलही विकत घेतली.

प्रशंसनीय तपास !वाढत्या तक्रारी आणि गुन्हे यामुळे बºयाच गुन्ह्यांच्या तपासावरून एक-दीड महिन्यानंतर पोलिसांची नजर हटते. ते मागे पडलेल्या गुन्ह्यांना मागे ठेवून त्यापेक्षा मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य देतात. मात्र, या प्रकरणाच्या तपासावर पोलिसांनी आपली नजर होती तशीच रोखून ठेवली. त्याच्या बँक खात्यावरही पोलिसांचे लक्ष होते. अलीकडे त्याच्या खात्यातील रक्कम राजाजीपुरमच्या एटीएममधून वारंवार काढली जात असल्याचे लक्षात येताच गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने तालकटोरा गाठले. तेथील एटीएमच्या चौकीदाराकडून गोयल-गुप्ताची माहिती काढली अन् अखेर त्याच्या मुसक्या बांधल्या. अनेक गोष्टींसाठी तरसल्यानंतर तब्बल सहा महिने जीवाची मुंबई करायला भेटली. त्यामुळे या गुन्ह्याचा गुप्ता-गोयलला पश्चात्ताप नसल्याचे पोलीस सांगतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी