शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

चोरट्याने केली महानगरांत जीवाची मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 11:29 IST

मालकाचा विश्वासघात करून साडेआठ लाख रुपये चोरून नेणाऱ्या चोरट्याने आधी स्वत:वर उपचार करून घेतले. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या महानगरांत जाऊन जीवाची मुंबई केली.

ठळक मुद्दे आधी उपचार, नंतर ऐश, आता हातकड्या

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालकाचा विश्वासघात करून साडेआठ लाख रुपये चोरून नेणाऱ्या चोरट्याने आधी स्वत:वर उपचार करून घेतले. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या महानगरांत जाऊन जीवाची मुंबई केली. सोने, दुचाकी विकत घेऊन ऐशोआरामात सहा महिने काढले. आता तो पोलिसांच्या कोठडीत पाहुणचार घेत आहे. गेल्या आठवड्यात गणेशपेठ पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक करून नागपुरात आणलेला आरोपी राजकुमार शांतिलाल गुप्ता ऊर्फ हेमंत शांतिलाल गोयल (वय ५३) याच्या चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे.आरोपी गुप्ता ऊर्फ गोयल मूळचा पुण्याच्या रामटेकडी (हडपसर) परिसरातील रहिवासी आहे. येथील हॉटेल व्यावसायिक अफजल अबुबकर मिठ्ठा (वय ४२) यांच्याकडे तो काम करायचा. मिठ्ठा यांचा आरोपीवर खूप विश्वास होता. त्यामुळे मोठे आर्थिक व्यवहारही ते त्याला सोपवायचे. १९ आॅगस्ट २०१९ ला दुपारी १ वाजता मिठ्ठा यांनी गुप्ता ऊर्फ गोयलला ८ लाख ५५ हजाराचा चेक देऊन बँकेतून रक्कम आणायला सांगितले. दुपारी गेलेला गोयल सायंकाळ होऊनही परत न आल्यामुळे काळजीत पडलेल्या मिठ्ठा यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. साडेआठ लाखांची रोकड घेऊन बेपत्ता झालेल्या गोयलचा मोबाईल बंद होता. त्याचे अपहरण झाले असावे, अशीही शंका आली. त्यामुळे पोलिसही हादरले. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी बरीच धावाधाव केली. मात्र, तो काही हाती लागला नाही.पोलीस इकडे त्याचा शोध घेत होते तर गुप्ता सरळ पुण्याला पोहचला होता. त्याला हायड्रोसिल अन् जबड्याचे दुखणे होते. त्यावर त्याने खासगीत उपचार करून घेतले. प्रकृती चांगली झाल्यानंतर त्याने सोनसाखळी, अंगठी विकत घेतली. नंतर इंदूर गाठले. तेथे अनेक दिवस ऐशोआराम केला. तेथून जबलपूरला पोहचला. तेथेही जीवाची मुंबई करून घेतली. नंतर उत्तरप्रदेशात पोहचला. लखनौचा नवाबी पाहुणचार घेतल्यानंतर जवळच्या राजाजीपुरम (तालकटोरा) येथे त्याने बस्तान बसविले. तेथेच त्याने बनावट आधारकार्ड तयार करून मोटरसायकलही विकत घेतली.

प्रशंसनीय तपास !वाढत्या तक्रारी आणि गुन्हे यामुळे बºयाच गुन्ह्यांच्या तपासावरून एक-दीड महिन्यानंतर पोलिसांची नजर हटते. ते मागे पडलेल्या गुन्ह्यांना मागे ठेवून त्यापेक्षा मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य देतात. मात्र, या प्रकरणाच्या तपासावर पोलिसांनी आपली नजर होती तशीच रोखून ठेवली. त्याच्या बँक खात्यावरही पोलिसांचे लक्ष होते. अलीकडे त्याच्या खात्यातील रक्कम राजाजीपुरमच्या एटीएममधून वारंवार काढली जात असल्याचे लक्षात येताच गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने तालकटोरा गाठले. तेथील एटीएमच्या चौकीदाराकडून गोयल-गुप्ताची माहिती काढली अन् अखेर त्याच्या मुसक्या बांधल्या. अनेक गोष्टींसाठी तरसल्यानंतर तब्बल सहा महिने जीवाची मुंबई करायला भेटली. त्यामुळे या गुन्ह्याचा गुप्ता-गोयलला पश्चात्ताप नसल्याचे पोलीस सांगतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी