शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांसाठी ते करतात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST

नागपूर : उन्हाळा आला की जंगलातील पाणवठे सुकायला लागतात. वनविभागाद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते; पण ती अपुरी पडते. अशा ...

नागपूर : उन्हाळा आला की जंगलातील पाणवठे सुकायला लागतात. वनविभागाद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते; पण ती अपुरी पडते. अशा वेळी पाण्याच्या शाेधात प्राण्यांची जंगलाबाहेर येऊन गावांमध्ये भटकंती सुरू असते. शिवाय एका जंगलातून दुसरीकडे भटकंती करताना वाटेत पाण्यासाठी त्यांची धडपड हाेते. प्राण्यांची ही धडपड लक्षात घेत ग्रामायणच्या निसर्गविज्ञान टीमतर्फे वन्यजिवांच्या भ्रमणमार्गातील पाणवठ्यांवर टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्राण्यांची तृष्णा शमविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

ही व्यवस्था सांभाळणारे विजय घुगे यांनी या कार्याबद्दल माहिती दिली. निसर्ग विज्ञानच्या टीमने २०१५ पासून हे कार्य सुरू केले आहे. विशेषत: नुकतेच मुख्यमंत्र्यांनी संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा दिलेल्या मुनिया रिजर्व्ह फाॅरेस्टमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात ही व्यवस्था करण्यात येते. मुनिया हे वनक्षेत्र ९९५२ हेक्टर म्हणजे जवळपास १०० चाैरस किलाेमीटरमध्ये पसरले असून ताडाेबा, बाेर, उमरेड कर्हांडला व पेंच अभयारण्यादरम्यान भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. उन्हाळ्यात भटकंती करणारे प्राणी गावाकडे पाण्याच्या शाेधात येत असतात. मानव-वन्यजीव संघर्षाच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेत मुनियाच्या वनक्षेत्रात वनविभाग व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली. असलेल्या पाणवठ्यांची दुरुस्ती करण्यात आली. नंतर येथे टँकर लावून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यात काॅरिडाेरमधील गावांच्या नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे घुगे यांनी सांगितले.

यावर्षीही पाणीपुरवठ्याचे कार्य सुरू करण्यात येत असल्याचे घुगे यांनी स्पष्ट केले. सध्या काही पाणवठ्यात पाणी आहे तर अनेक सुकलेले आहेत. १५ एप्रिलनंतर येथील परिस्थिती भीषण हाेणार आहे. त्यानुसार पाणवठे स्वच्छ करण्याचे व बाेअरवेल दुरुस्तीचे काम वनविभाग व गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पाणीपुरवठ्याचे काम सुरू हाेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एका जंगलातून दुसरीकडे भ्रमण करताना वन्यप्राण्यांसाठी मुनिया वनक्षेत्रातून जाणारा एकमेव मार्ग आहे. या पाणवठ्यांचे पाणी केवळ वन्य प्राण्यांचीच तहान भागवते असे नाही तर गावातील पाळीव प्राणीही आपली तृष्णा भागवतात. येथील बाेअरवेलचे पाणी वाटसरूंनाही लाभदायक ठरणारे आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यातून या कार्याला गती मिळाली आहे.

- विजय घुगे, ग्रामायण निसर्ग विज्ञान संस्था