शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
5
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
6
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
7
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
8
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
9
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
10
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
11
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
12
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
13
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
14
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
15
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
16
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
19
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
20
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

वन्यप्राण्यांसाठी ते करतात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST

नागपूर : उन्हाळा आला की जंगलातील पाणवठे सुकायला लागतात. वनविभागाद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते; पण ती अपुरी पडते. अशा ...

नागपूर : उन्हाळा आला की जंगलातील पाणवठे सुकायला लागतात. वनविभागाद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते; पण ती अपुरी पडते. अशा वेळी पाण्याच्या शाेधात प्राण्यांची जंगलाबाहेर येऊन गावांमध्ये भटकंती सुरू असते. शिवाय एका जंगलातून दुसरीकडे भटकंती करताना वाटेत पाण्यासाठी त्यांची धडपड हाेते. प्राण्यांची ही धडपड लक्षात घेत ग्रामायणच्या निसर्गविज्ञान टीमतर्फे वन्यजिवांच्या भ्रमणमार्गातील पाणवठ्यांवर टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्राण्यांची तृष्णा शमविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

ही व्यवस्था सांभाळणारे विजय घुगे यांनी या कार्याबद्दल माहिती दिली. निसर्ग विज्ञानच्या टीमने २०१५ पासून हे कार्य सुरू केले आहे. विशेषत: नुकतेच मुख्यमंत्र्यांनी संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा दिलेल्या मुनिया रिजर्व्ह फाॅरेस्टमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात ही व्यवस्था करण्यात येते. मुनिया हे वनक्षेत्र ९९५२ हेक्टर म्हणजे जवळपास १०० चाैरस किलाेमीटरमध्ये पसरले असून ताडाेबा, बाेर, उमरेड कर्हांडला व पेंच अभयारण्यादरम्यान भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. उन्हाळ्यात भटकंती करणारे प्राणी गावाकडे पाण्याच्या शाेधात येत असतात. मानव-वन्यजीव संघर्षाच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेत मुनियाच्या वनक्षेत्रात वनविभाग व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली. असलेल्या पाणवठ्यांची दुरुस्ती करण्यात आली. नंतर येथे टँकर लावून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यात काॅरिडाेरमधील गावांच्या नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे घुगे यांनी सांगितले.

यावर्षीही पाणीपुरवठ्याचे कार्य सुरू करण्यात येत असल्याचे घुगे यांनी स्पष्ट केले. सध्या काही पाणवठ्यात पाणी आहे तर अनेक सुकलेले आहेत. १५ एप्रिलनंतर येथील परिस्थिती भीषण हाेणार आहे. त्यानुसार पाणवठे स्वच्छ करण्याचे व बाेअरवेल दुरुस्तीचे काम वनविभाग व गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पाणीपुरवठ्याचे काम सुरू हाेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एका जंगलातून दुसरीकडे भ्रमण करताना वन्यप्राण्यांसाठी मुनिया वनक्षेत्रातून जाणारा एकमेव मार्ग आहे. या पाणवठ्यांचे पाणी केवळ वन्य प्राण्यांचीच तहान भागवते असे नाही तर गावातील पाळीव प्राणीही आपली तृष्णा भागवतात. येथील बाेअरवेलचे पाणी वाटसरूंनाही लाभदायक ठरणारे आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यातून या कार्याला गती मिळाली आहे.

- विजय घुगे, ग्रामायण निसर्ग विज्ञान संस्था