शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

-ते करताहेत मूक प्राण्यांची तृष्णातृप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:04 IST

अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच या संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड शाखांनी शहरात १५१ ठिकाणी पाण्याचे टाके ठेवण्याचा उपक्रम हातात घेतला आहे.

ठळक मुद्देपुलक जन चेतना मंचचा उपक्रमठिकठिकाणी ठेवले जाताहेत पाण्याचे टाके

राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यामध्ये अनेक सामाजिक संस्था पाणपोई सुरू करतात. त्यामुळे सोबत पाणी न घेता घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना तहान भागविण्यासाठी जास्त भटकंती करावी लागत नाही. त्यांना कोणत्याही ठिकाणी सहज पाणी मिळून जाते. अशी सोय मूक प्राण्यांसाठीही करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेता अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच या संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड शाखांनी शहरात १५१ ठिकाणी पाण्याचे टाके ठेवण्याचा उपक्रम हातात घेतला आहे. आतापर्यंत विविध वस्त्यांमध्ये २५ टाके ठेवण्यात आले आहेत. टाके नि:शुल्क दिले जात आहेत.शरद मचाले, कुलभूषण डहाळे, नरेश मचाले, रमेश उदेपूरकर, अनंत शिवणकर व प्रकाश उदेपुरकर हे या उपक्रमाचे संयोजक आहेत. मूक प्राण्यांची सेवा हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे हा सेवाभाव जपण्याची मनातून इच्छा असणाऱ्यांनाच या संस्था टाके देत आहे. तसेच, संस्थांचे कार्यकर्ते वस्त्यावस्त्यांमध्ये फिरून इच्छुक व्यक्तीच्या घरापुढे टाके ठेवत आहेत. टाक्यात पाणी भरणे व टाक्याची नियमित सफाई करणे ही जबाबदारी संबंधित व्यक्तीकडे सोपविली जात आहे. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाचा प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुलक सागर महाराज यांच्या जन्मदिवसापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड येथील शाखा कार्यालयापुढे पहिले पाण्याचे टाके ठेवण्यात आले. त्यानंतर रमणा मारोती, शेषनगर, तुळशीबाग, झेंडा चौक महाल, गणेशपेठ, बजाजनगर इत्यादी वस्त्यांमध्ये टाके देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी सिद्ध होत आहे. गायी, म्हशी, कुत्रे, बकºया इत्यादी मूक प्राणी टाक्यातील पाणी पिऊन तृष्णा तृप्त करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई