शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
2
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
3
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
4
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
5
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
6
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
7
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
8
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
9
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
10
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
11
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
12
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
13
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
14
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
15
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
16
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
17
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
18
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
19
कमाल! नोकरीसोबतच घराचीही जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
20
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनातील 'ते' पहिले बलिदान

By आनंद डेकाटे | Updated: August 4, 2023 06:15 IST

मराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद दिन विशेष : पाच भीमसैनिक पोलिसांच्या गोळीबारात शहीद : 'त्या' घटनेला ४५ वर्षे पूर्ण

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ ऑगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील इंदोरा १० नंबर पूल येथे ५ भीम सैनिक पोलिसांच्या बेछुट गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाला ४५ वर्षे पूर्ण झाली.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान सभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या ठराव एकमताने पारित झाल्यानंतर मराठवाड्यातील दलितांवर हल्ले, जाळपोळ सुरू झाली होती. या अत्याचाराच्या निषेधार्थ पहिल्यांदा आंबेडकरी बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील जनता रस्त्यावर उतरली होती.

४ आगस्ट १९७८ रोजी आंबेडकरी समाजाचा उत्स्फूर्त मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता. या मोर्चातून परतत असलेल्या नागरिकांवर इंदोरा १० नंबर पूल येथे पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात रतन लक्ष्मण मेंढे, किशोर बाळकृष्ण भाकळे, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फझल हुसेन हे शहीद झाले, तर गोळीबारात जखमी झालेल्या अविनाश अर्जून डोंगरे या ११ वर्षांच्या कोवळ्या मुलाचा रूग्णालयात मृत्यू झाला. असे ५ लोक नामांतरासाठी शहीद झाले होते.

पुढच्याच वर्षी महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर १९७९रोजी नागपुरात नामांतराच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पुन्हा विशाल मोर्चा काढला होता. त्या वेळीही पोलिसांनी पुन्हा गोळीबार केला. त्यात दिलीप सूर्यभान रामटेके, ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, रोशन बोरकर व डोमाजी भिकाजी कुत्तरमारे हे ४ भीमसैनिक शहीद झालेनागपुरातील शहिदांसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी नामांतरासाठी २७ भीमसैनिक शहीद झाले. या शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंदोरा १० नंबर पूल येथे उभारलेल्या स्मारकावर सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरलेली आहेत. नामांतरासाठी प्रदीर्घ आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठरावाची अंमलबजावणी केली. तेव्हापासून १४ जानेवारीला नामांतर दिवस पाळला जातो.

नामांतर लढा एक जाज्वल्य इतिहास

नामांतर लढा म्हणजे देशाच्या सामाजिक समतेच्या चळवळीतील सुवर्णाक्षरात नोंदला गेलेला जाज्वल्य इतिहासच आहे. या आंदोलनाच्या उभारणीत आणि यशात नागपूर शहराचे बलिदान मोलाचे आहे. या चळवळीत आत्माहुती देणाऱ्या शहिदांच्या त्यामुळेच नामांतर साकार झाले आहे.

- अनिल वासनिक, नामांतर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादnagpurनागपूरAurangabadऔरंगाबाद