शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनातील 'ते' पहिले बलिदान

By आनंद डेकाटे | Updated: August 4, 2023 06:15 IST

मराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद दिन विशेष : पाच भीमसैनिक पोलिसांच्या गोळीबारात शहीद : 'त्या' घटनेला ४५ वर्षे पूर्ण

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ ऑगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील इंदोरा १० नंबर पूल येथे ५ भीम सैनिक पोलिसांच्या बेछुट गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाला ४५ वर्षे पूर्ण झाली.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान सभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या ठराव एकमताने पारित झाल्यानंतर मराठवाड्यातील दलितांवर हल्ले, जाळपोळ सुरू झाली होती. या अत्याचाराच्या निषेधार्थ पहिल्यांदा आंबेडकरी बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील जनता रस्त्यावर उतरली होती.

४ आगस्ट १९७८ रोजी आंबेडकरी समाजाचा उत्स्फूर्त मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता. या मोर्चातून परतत असलेल्या नागरिकांवर इंदोरा १० नंबर पूल येथे पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात रतन लक्ष्मण मेंढे, किशोर बाळकृष्ण भाकळे, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फझल हुसेन हे शहीद झाले, तर गोळीबारात जखमी झालेल्या अविनाश अर्जून डोंगरे या ११ वर्षांच्या कोवळ्या मुलाचा रूग्णालयात मृत्यू झाला. असे ५ लोक नामांतरासाठी शहीद झाले होते.

पुढच्याच वर्षी महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर १९७९रोजी नागपुरात नामांतराच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पुन्हा विशाल मोर्चा काढला होता. त्या वेळीही पोलिसांनी पुन्हा गोळीबार केला. त्यात दिलीप सूर्यभान रामटेके, ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, रोशन बोरकर व डोमाजी भिकाजी कुत्तरमारे हे ४ भीमसैनिक शहीद झालेनागपुरातील शहिदांसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी नामांतरासाठी २७ भीमसैनिक शहीद झाले. या शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंदोरा १० नंबर पूल येथे उभारलेल्या स्मारकावर सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरलेली आहेत. नामांतरासाठी प्रदीर्घ आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठरावाची अंमलबजावणी केली. तेव्हापासून १४ जानेवारीला नामांतर दिवस पाळला जातो.

नामांतर लढा एक जाज्वल्य इतिहास

नामांतर लढा म्हणजे देशाच्या सामाजिक समतेच्या चळवळीतील सुवर्णाक्षरात नोंदला गेलेला जाज्वल्य इतिहासच आहे. या आंदोलनाच्या उभारणीत आणि यशात नागपूर शहराचे बलिदान मोलाचे आहे. या चळवळीत आत्माहुती देणाऱ्या शहिदांच्या त्यामुळेच नामांतर साकार झाले आहे.

- अनिल वासनिक, नामांतर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादnagpurनागपूरAurangabadऔरंगाबाद