शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीसाठी घातकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:51 IST

औष्णिक वीज केंद्रातील राखेत जमिनीला मारक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. या राखेमुळे शेती निरुपयोगी होत असून ही राख शेतीसाठी घातक आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : ‘औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीची राखरांगोळी करते काय?’ परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औष्णिक वीज केंद्रातील राखेत जमिनीला मारक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. या राखेमुळे शेती निरुपयोगी होत असून ही राख शेतीसाठी घातक आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात ‘औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीची राखरांगोळी करते काय?’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. व्यासपीठावर शेतकरी चळवळीचे नेते प्रा. शरद पाटील, पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार उपस्थित होते. प्रा. शरद पाटील म्हणाले, शेतीची माती सछिद्र असते. शेत पिकांच्या वाढीसाठी या छिद्रातून हवा आणि पाणी मिळते. परंतु औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीतील छिद्र बुजविते. पहिल्या वर्षी या राखेमुळे चांगले उत्पन्न मिळते. परंतु त्यानंतर या राखेचा वापर केल्यास जमीन निरुपयोगी होते. ही राख विकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. सुधीर पालीवाल म्हणाले, इंडोनेशियातून भारतात सर्वाधिक कोळसा येतो. इंडोनेशियात या राखेचा वापर केल्यास दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. औष्णिक वीज केंद्रातील राखेचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. डॉ. शरद पवार म्हणाले, औष्णिक वीज केंद्रातील राखेत १० प्रकारचे धोकादायक घटक आहेत. त्याचा मनुष्य आणि प्राण्यांवर दुष्परिणाम होतो. धान्यातून ते आपल्या पोटात जातात. ही राख एवढी घातक असताना त्याचा कोणताच अभ्यास झाला नाही. राख शेतीसाठी घातक आहे की नाही याचा शोध घेऊन तोपर्यंत ही राख शेतीसाठी वापरण्यात परवानगी देऊ नये असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील छोटा नागपूर या गावात समारंंभपूर्वक शेतकऱ्यांच्या शेतीत राख टाकण्यात आली. राख किती चांगली आहे, हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. पहिल्या वर्षी चांगले पीक आले. त्यानंतर त्या शेतीत काहीच पिकत नाही. शेती खराब करणाऱ्या या राखेचा विरोध करण्यासाठी विदर्भात दबावगट तयार होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश गांधी यांनी औष्णिक वीज केंद्रातील राख वापरणे घातक असल्याचे सांगून या विरोधात सर्वसामान्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक श्रीराम काळे यांनी केले. संचालन प्रदीप विटाळकर यांनी केले. आभार श्रीधर सोलव यांनी मानले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती