शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

नाटक आहे तोपर्यंत अडगळ असणार नाही : वामन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:47 IST

जोपर्यंत या जगात नाटक जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही बाबतीत अडगळ असणार नाही , नाटक हे आदिम आहे आणि जोपर्यंत नाटक करणारा एक माणूस आणि नाटक पाहणारा ,ऐकणारा एक माणूस अशी दोन माणसं जोपर्यंत आपल्या समाजात आहेत तोपर्यंत नाटकाला मरण नाही असे विचार ज्येष्ठ रंगकर्मी ,दिग्दर्शक प्राचार्य वामन केंद्रे यांनी मांडले. शनिवारी नाट्यसंमेलनात सुरेश भट सभागृहात नाटक जगण्याची समृद्ध अडगळ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात नाट्यकर्मींनी नाटकावर होणाऱ्या अनिर्बंध घुसघोरीचा निषेध केला.

ठळक मुद्देपरिसंवादात मान्यवरांनी मांडले प्रखर विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :जोपर्यंत या जगात नाटक जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही बाबतीत अडगळ असणार नाही , नाटक हे आदिम आहे आणि जोपर्यंत नाटक करणारा एक माणूस आणि नाटक पाहणारा ,ऐकणारा एक माणूस अशी दोन माणसं जोपर्यंत आपल्या समाजात आहेत तोपर्यंत नाटकाला मरण नाही असे विचार ज्येष्ठ रंगकर्मी ,दिग्दर्शक प्राचार्य वामन केंद्रे यांनी मांडले. शनिवारी नाट्यसंमेलनात सुरेश भट सभागृहात नाटक जगण्याची समृद्ध अडगळ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात नाट्यकर्मींनी नाटकावर होणाऱ्या अनिर्बंध घुसघोरीचा निषेध केला.या परिसंवादाला नाटककार अतुल पेठे, अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि रंगकर्मी आशुतोष पोतदार यांनी सहभाग घेतला. नाटककार शफाअत खान यांनी या परिसंवादाचं सूत्रसंचालन केलं. मुळात सध्याच्या नाटकावर बोलणारे लोक कमी झालेत, मराठी नाटक आपली मूळ ओळख विसरत चालला आहे यावर या सर्व मान्यवरांनी परिसंवादात प्रकाश टाकला. नाटकासाठी अडगळ ही कधीच पोषक नसते. मात्र या अडगळीचा वापर करून अनेकजण नाटकासारख्या विशाल महासागरात उगीच लुडबुड करत असतात. या चुटुपुट लुडबुड करणाऱ्या लोकांना एक तर नाटकाचं महत्व त्यातील आत्मभान समजेनासं झाल्यामुळे नाटकाला विरोधाचं एक ग्रहण लागलंय असं नाटककार अतुल पेठे यांनी आपलं मत मांडलं. नाटक ही एक कला आहे आणि प्रत्येक नाटककाराला आपलं म्हणणं मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे विवेकाची कास धरलेली समृध्दी या नाटकाच्या विकास मॉडलेला समाजानेही तितकंच आपलंसं करायला हवं ही बाब अतुल पेठे यांनी बोलताना अधिक गडद केली.मराठी रंगभूमीला बालरंगभूमीची एक खूप मोठी परंपरा आहे. मात्र आजचं बालनाट्य काही अंशी बदललं आहे. आधीच्या काळात नाटक बघताना किंवा समजून घेताना लहान मुलांच्या समोर धर्म,जात,समाज हे घटक मुळातच विचार करण्यासाठी नसायचे. मात्र सध्याची मुलं ही सोशल मिडियावर जे पाहतात किंवा टीव्हीवर जे पाहतात त्याचं अनुकरण करतात त्यामुळे बालनाट्यात हे विषय घेताना पालकांचं आणि मुळात मुलांचंच स्वातंत्र्य फार मिळत नाही. आणि असे विषय घेऊ नका मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो ही ठेवणीतील वाक्यंही सर्रास बालनाट्य करणाºया ग्रुपमधून ऐकायला मिळतात. मुळात बालनाट्यांचे प्रयोग हे जास्तीत जास्त प्रमाणात होण्याची गरज आहे. सरकारने सर्व शाळांना एकत्रित करून त्या त्या शाळांमध्ये बालनाट्यांचे प्रयोग करून मुलांच्या जीवनात बदल घडवणारे नाट्यप्रयोग करण्याची गरज असल्याचे मत अभिनेत्री विभावरी देशपांडेने यावेळी मांडले.नाटकातील समृद्ध अडगळ ही दूर होण्याची मुळातच गरज आहे. कारण जर एक नाटककार म्हणून मी माझं नाटक माझ्या घरच्यांनाच आवडलंच नाही तर मी या समोरच्या जगाला मी माझं नाटक कोणत्या अर्थांनं पटवून देणार आहे ह्याचा विचार आपल्याला सर्वांनाच करण्याची एक प्रकारे गरज आहे. व्यावसायिक दृष्ट्या नाटक करून फक्त त्याला धंदेवाईक रंगभूमीचं स्वरूप येणार असेल तर ती अडगळ तात्काळ मोडित काढण्याची गरज आहे. नाटकावर बोलणारे कमी झालेत ,नाटकावर टीका करणारे मात्र वाढलेत पण त्याच नाटकावर काही चांगले करू पाहणारे मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत तेव्हा ही अडगळ दूर करूनच समृध्द नाटकाचा वसा जपता येणार आहे असं मत नाटककार आशुतोष पोतदार यांनी या परिसंवादात मांडले. परिसंवादाला ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष किर्ती शिलेदार,अभिनेते मोहन जोशी, अविनाश नारकर,ऐश्वर्या नारकर आणि मोठ्या संख्येने नागपूरकरांनी उपस्थित राहत चांगला प्रतिसाद दिला.

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी