शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

नाटक आहे तोपर्यंत अडगळ असणार नाही : वामन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:47 IST

जोपर्यंत या जगात नाटक जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही बाबतीत अडगळ असणार नाही , नाटक हे आदिम आहे आणि जोपर्यंत नाटक करणारा एक माणूस आणि नाटक पाहणारा ,ऐकणारा एक माणूस अशी दोन माणसं जोपर्यंत आपल्या समाजात आहेत तोपर्यंत नाटकाला मरण नाही असे विचार ज्येष्ठ रंगकर्मी ,दिग्दर्शक प्राचार्य वामन केंद्रे यांनी मांडले. शनिवारी नाट्यसंमेलनात सुरेश भट सभागृहात नाटक जगण्याची समृद्ध अडगळ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात नाट्यकर्मींनी नाटकावर होणाऱ्या अनिर्बंध घुसघोरीचा निषेध केला.

ठळक मुद्देपरिसंवादात मान्यवरांनी मांडले प्रखर विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :जोपर्यंत या जगात नाटक जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही बाबतीत अडगळ असणार नाही , नाटक हे आदिम आहे आणि जोपर्यंत नाटक करणारा एक माणूस आणि नाटक पाहणारा ,ऐकणारा एक माणूस अशी दोन माणसं जोपर्यंत आपल्या समाजात आहेत तोपर्यंत नाटकाला मरण नाही असे विचार ज्येष्ठ रंगकर्मी ,दिग्दर्शक प्राचार्य वामन केंद्रे यांनी मांडले. शनिवारी नाट्यसंमेलनात सुरेश भट सभागृहात नाटक जगण्याची समृद्ध अडगळ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात नाट्यकर्मींनी नाटकावर होणाऱ्या अनिर्बंध घुसघोरीचा निषेध केला.या परिसंवादाला नाटककार अतुल पेठे, अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि रंगकर्मी आशुतोष पोतदार यांनी सहभाग घेतला. नाटककार शफाअत खान यांनी या परिसंवादाचं सूत्रसंचालन केलं. मुळात सध्याच्या नाटकावर बोलणारे लोक कमी झालेत, मराठी नाटक आपली मूळ ओळख विसरत चालला आहे यावर या सर्व मान्यवरांनी परिसंवादात प्रकाश टाकला. नाटकासाठी अडगळ ही कधीच पोषक नसते. मात्र या अडगळीचा वापर करून अनेकजण नाटकासारख्या विशाल महासागरात उगीच लुडबुड करत असतात. या चुटुपुट लुडबुड करणाऱ्या लोकांना एक तर नाटकाचं महत्व त्यातील आत्मभान समजेनासं झाल्यामुळे नाटकाला विरोधाचं एक ग्रहण लागलंय असं नाटककार अतुल पेठे यांनी आपलं मत मांडलं. नाटक ही एक कला आहे आणि प्रत्येक नाटककाराला आपलं म्हणणं मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे विवेकाची कास धरलेली समृध्दी या नाटकाच्या विकास मॉडलेला समाजानेही तितकंच आपलंसं करायला हवं ही बाब अतुल पेठे यांनी बोलताना अधिक गडद केली.मराठी रंगभूमीला बालरंगभूमीची एक खूप मोठी परंपरा आहे. मात्र आजचं बालनाट्य काही अंशी बदललं आहे. आधीच्या काळात नाटक बघताना किंवा समजून घेताना लहान मुलांच्या समोर धर्म,जात,समाज हे घटक मुळातच विचार करण्यासाठी नसायचे. मात्र सध्याची मुलं ही सोशल मिडियावर जे पाहतात किंवा टीव्हीवर जे पाहतात त्याचं अनुकरण करतात त्यामुळे बालनाट्यात हे विषय घेताना पालकांचं आणि मुळात मुलांचंच स्वातंत्र्य फार मिळत नाही. आणि असे विषय घेऊ नका मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो ही ठेवणीतील वाक्यंही सर्रास बालनाट्य करणाºया ग्रुपमधून ऐकायला मिळतात. मुळात बालनाट्यांचे प्रयोग हे जास्तीत जास्त प्रमाणात होण्याची गरज आहे. सरकारने सर्व शाळांना एकत्रित करून त्या त्या शाळांमध्ये बालनाट्यांचे प्रयोग करून मुलांच्या जीवनात बदल घडवणारे नाट्यप्रयोग करण्याची गरज असल्याचे मत अभिनेत्री विभावरी देशपांडेने यावेळी मांडले.नाटकातील समृद्ध अडगळ ही दूर होण्याची मुळातच गरज आहे. कारण जर एक नाटककार म्हणून मी माझं नाटक माझ्या घरच्यांनाच आवडलंच नाही तर मी या समोरच्या जगाला मी माझं नाटक कोणत्या अर्थांनं पटवून देणार आहे ह्याचा विचार आपल्याला सर्वांनाच करण्याची एक प्रकारे गरज आहे. व्यावसायिक दृष्ट्या नाटक करून फक्त त्याला धंदेवाईक रंगभूमीचं स्वरूप येणार असेल तर ती अडगळ तात्काळ मोडित काढण्याची गरज आहे. नाटकावर बोलणारे कमी झालेत ,नाटकावर टीका करणारे मात्र वाढलेत पण त्याच नाटकावर काही चांगले करू पाहणारे मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत तेव्हा ही अडगळ दूर करूनच समृध्द नाटकाचा वसा जपता येणार आहे असं मत नाटककार आशुतोष पोतदार यांनी या परिसंवादात मांडले. परिसंवादाला ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष किर्ती शिलेदार,अभिनेते मोहन जोशी, अविनाश नारकर,ऐश्वर्या नारकर आणि मोठ्या संख्येने नागपूरकरांनी उपस्थित राहत चांगला प्रतिसाद दिला.

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी