शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

परिवर्तनासाठी दबावगट असावा

By admin | Updated: October 10, 2014 01:00 IST

हल्लीच्या मरगळलेल्या वातावरणात राज मेहर यांची कविता खऱ्या अर्थाने कविता वाटतात. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या बुरसट संकल्पनेला नाकारण्याचे धैर्य कवीने दाखविले आहे. साहित्यात आणि कवितेच्या

भारत पाटणकर : राज मेहर यांच्या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन नागपूर : हल्लीच्या मरगळलेल्या वातावरणात राज मेहर यांची कविता खऱ्या अर्थाने कविता वाटतात. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या बुरसट संकल्पनेला नाकारण्याचे धैर्य कवीने दाखविले आहे. साहित्यात आणि कवितेच्या क्षेत्रात कवींना अपेक्षित परिवर्तन करायचे असेल तर अशा समविचारी कवींचा एक दबावगट तयार केला पाहिजे, असे मत बाराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. निर्मिती विचार मंच, कोल्हापूरतर्फे नागपुरातील राज मेहर यांच्या ‘ओळीनंतरच्या ओळी’ आणि ‘तुझी कविता तुझ्याचसाठी’ या दोन काव्यसंग्रहाच्या द्वितीयावृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सावित्रीबार्इंच्या जीवनकार्याच्या अभ्यासक अमेरिकेतील लेखिका डॉ. गेल अ‍ॅम्वेट यांच्या हस्ते या दोन्ही आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. गेल यांनी यावेळी छोटेखानी भाषणातून राज मेहर यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कवितांचे अर्थ समजून घेत त्यांनी या कविता अतिशय प्रगल्भ असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी एका काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात अनेक कवींनी कविता सादर केल्या. संचालन प्रसिद्ध कवी किरण भिंगारदिवे यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ पुस्तकनिर्मितीच्या क्षेत्रातील अनिल म्हमाने यांच्या बीजभाषणाने झाली. डॉ. शिवाजीराव पाटील यांच्या काव्यवाचन व धन्यवाद प्रस्तावाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)