शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनासाठी दबावगट असावा

By admin | Updated: October 10, 2014 01:00 IST

हल्लीच्या मरगळलेल्या वातावरणात राज मेहर यांची कविता खऱ्या अर्थाने कविता वाटतात. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या बुरसट संकल्पनेला नाकारण्याचे धैर्य कवीने दाखविले आहे. साहित्यात आणि कवितेच्या

भारत पाटणकर : राज मेहर यांच्या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन नागपूर : हल्लीच्या मरगळलेल्या वातावरणात राज मेहर यांची कविता खऱ्या अर्थाने कविता वाटतात. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या बुरसट संकल्पनेला नाकारण्याचे धैर्य कवीने दाखविले आहे. साहित्यात आणि कवितेच्या क्षेत्रात कवींना अपेक्षित परिवर्तन करायचे असेल तर अशा समविचारी कवींचा एक दबावगट तयार केला पाहिजे, असे मत बाराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. निर्मिती विचार मंच, कोल्हापूरतर्फे नागपुरातील राज मेहर यांच्या ‘ओळीनंतरच्या ओळी’ आणि ‘तुझी कविता तुझ्याचसाठी’ या दोन काव्यसंग्रहाच्या द्वितीयावृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सावित्रीबार्इंच्या जीवनकार्याच्या अभ्यासक अमेरिकेतील लेखिका डॉ. गेल अ‍ॅम्वेट यांच्या हस्ते या दोन्ही आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. गेल यांनी यावेळी छोटेखानी भाषणातून राज मेहर यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कवितांचे अर्थ समजून घेत त्यांनी या कविता अतिशय प्रगल्भ असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी एका काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात अनेक कवींनी कविता सादर केल्या. संचालन प्रसिद्ध कवी किरण भिंगारदिवे यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ पुस्तकनिर्मितीच्या क्षेत्रातील अनिल म्हमाने यांच्या बीजभाषणाने झाली. डॉ. शिवाजीराव पाटील यांच्या काव्यवाचन व धन्यवाद प्रस्तावाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)