शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

गुंडांच्या मनात वर्दीची भीती असलीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:24 IST

गुन्हेगार लहान असो की मोठा, त्याच्या मनात वर्दीची (पोलिसांची) भीती असलीच पाहिजे. दुसरीकडे पोलीस हा आपला मित्र आहे, सहकारी आहे, असा सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटला पाहिजे. भीती आणि विश्वासाचे समीकरण जुळवून नागपूरकरांना भयमुक्त सेवा देण्यावर आपण भर देणार आहो, असे मनोगत गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देभयमुक्त शहर बनविण्यावर भर : अतिरिक्त पोलीस आयुक्त गायकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगार लहान असो की मोठा, त्याच्या मनात वर्दीची (पोलिसांची) भीती असलीच पाहिजे. दुसरीकडे पोलीस हा आपला मित्र आहे, सहकारी आहे, असा सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटला पाहिजे. भीती आणि विश्वासाचे समीकरण जुळवून नागपूरकरांना भयमुक्त सेवा देण्यावर आपण भर देणार आहो, असे मनोगत गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.गायकर चार दिवसांपूर्वी पुण्याहून नागपुरात बदलून आले. यापूर्वी त्यांनी नागपूर शहरात प्रत्यक्ष सेवा दिलेली नाही. मात्र, विदर्भातील भंडारा तसेच मराठवाड्यातील लातूर, कोकणातील रायगड, ठाणे तसेच पोलीस प्रशिक्षण विभाग आणि सीआयडीत काम केलेले आहे. येथे रुजू होताच त्यांनी दैनंदिन कामकाज सांभाळताना पोलीस ठाण्यांना भेटी देऊन त्या भागातील गुन्हेगारी तसेच पोलिसांचे संख्याबळ समजून घेणे सुरू केले आहे. सोमवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तडीपार केलेले गुंड परत नागपुरात येतात, राहतात अन् गुन्हेगारीही करतात. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गुन्हेगारांना मोकाट वावरण्याची संधी मिळाल्यास ते उपद्रव करतील. सर्वसामान्यांना त्याचा त्रास वाढेल. नागरिकांना हा त्रासच होऊ नये म्हणून सराईत गुन्हेगारांना त्यांची जेथे (कारागृहात) जागा आहे, तेथेच पाठवण्यावर आपण भर देणार आहो. तडीपार गुंडांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांना खास सूचना देण्यात येतील. संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीएसारखी कारवाई झाली की ते कारागृहात पोहचतात. त्यामुळे आपोआपच गुन्हेगारी नियंत्रित होते. रस्त्यावर पोलीस दिसला की गुन्हेगार चरकतो. तो दुरूनच पळ काढतो. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रित करता येते आणि रस्त्यावर उतरल्याने पोलिसही नियमित नागरिकांच्या संपर्कात राहतो. नागरिकांशी त्याची जवळीकता वाढते. विश्वास जिंकता येतो. त्यासाठी वाहनातून गस्त घालण्यासोबतच ‘फूट पोलीस पेट्रोलिंग’वर भर देणार आहोत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे नागपूरला गुन्हेगारमुक्त शहर बनवायचे प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करणार असल्याचे गायकर म्हणाले.

विस्कळीत वाहतूक रस्त्यावर! उपराजधानीचा झपाट्याने विस्तार होत आहे. बाहेरचे गुन्हेगार येऊन येथे चोºया, घरफोडी, सोनसाखळी चोरीसारखे गुन्हे करीत आहेत. त्यावर अंकुश बसविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. शहराला गुन्हेगारमुक्त बनविण्यासोबतच अपघातमुक्त करण्याची पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांची संकल्पना आहे. त्यासाठी आपण वाहतूक पोलिसांची सध्याची कार्यपद्धती समजून घेणार आहोत. अपघातामागची कारणे जाणून अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू. नागपुरात रस्ते प्रशस्त आहेत, मात्र वाहतुकीची वारंवार कोंडी होते. त्यामागची कारणे शोधून लवकरच विस्कळीत वाहतूक रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न करू, असेही मत अतिरिक्त आयुक्त गायकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसCrimeगुन्हा