शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

नागपूर महापालिकेच्या वाचनालयातही नाही पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:19 IST

शहरात सुरू असलेला पाणीटंचाईचा फटका मनपाच्या वाचनालयालाही बसला आहे. वाचनालयातील पाणी संपल्यामुळे ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना स्वत:च पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहे.

ठळक मुद्देग्रंथपालांनी दिल्या विद्यार्थ्यांना स्वत:च पाण्याची सोय करण्याच्या सूचना

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : शहरात सुरू असलेला पाणीटंचाईचा फटका मनपाच्या वाचनालयालाही बसला आहे. वाचनालयातील पाणी संपल्यामुळे ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना स्वत:च पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहे. 

नागपूर महानगरपालिकाद्वारे संचालित असलेल्या उत्तर नागपुरातील डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय व श्रीमती उषाराणी महिला वाचनालय, अशोकनगर येथे दररोज ३०० ते ४०० विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाकरिता येतात. हे वाचनालय २४ तास सुरू असणारे नागपूर शहरातील प्रतिष्ठित वाचनालय आहे. येथे संपूर्ण शहरासह ग्रामीण भागातीलही विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाकरिता येतात. गेल्या आठवडाभरापासून पाणीटंचाईमुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात तर तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड नागरिकांची आहे. याच पार्श्वभूमीवर वाचनालयाचे सहा. ग्रंथपाल खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, वाचनालयास पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत: पाण्याची सोय करावी. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासंबंधी प्रश्न निर्माण झाला आहे. वाचनालयात पिण्याच्या पाण्याचा साठा करणारी टाकी लहान असून त्यात फक्त एकाच दिवसाचे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. खंडित पाणीपुरवठ्यामुळे टाकी रिकामी राहत आहे. वाचनालयात पिण्याच्या पाण्याची टाकी बदलवून मोठी टाकी लावण्यात यावी व वाचनालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम लावण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पहिल्यांदाच २४ तास सुरू असणाऱ्या मनपाच्या या वाचनालयावर पाणीकपातीमुळे काही दिवस कोरडेच राहण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाlibraryवाचनालयwater shortageपाणीकपात