शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

यशाला शॉर्टकट नसतो : बनवारीलाल पुरोहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:34 IST

कोणतेही यश मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यशाला कधीच शॉर्टकट नसतो. अशाच प्रदीर्घ संघर्षातून नागपुरातील पत्रकारांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नवपत्रकारांनी हा यशाचा मार्ग लक्षात ठेवावा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

ठळक मुद्देस्व. अनिलकुमार स्मृती पुरस्कार : जोसेफ राव, धर्मेंद्र जोरे सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणतेही यश मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यशाला कधीच शॉर्टकट नसतो. अशाच प्रदीर्घ संघर्षातून नागपुरातील पत्रकारांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नवपत्रकारांनी हा यशाचा मार्ग लक्षात ठेवावा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जोसेफ राव आणि धर्मेंद्र जोरे या दोन ज्येष्ठ पत्रकारांना स्व. अनिलकुमार स्मृती पुरस्कार देऊन राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती होते. व्यासपीठावर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, राहुल पांडे उपस्थित होते. यावेळी २१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ या स्वरूपाचा पुरस्कार देऊन दोन्ही ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना राज्यपाल पुढे म्हणाले, समर्पणातूनच पत्रकारितेचे क्षेत्र मोठे झाले आहे. शिफारशीतून पत्रकारिता क्षेत्र चालत नाही. विदर्भातील पत्रकारितेचा स्तर मोठा असून येथील पत्रकारांचा राज्यात दबदबा आहे. आज तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरी त्या काळात मर्यादित तंत्रज्ञानाच्या बळावर केलेली पत्रकारिता बरीच मूल्ये शिकवून गेली आहे. स्व. अनिलकुमार यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. त्यांनी आयुष्यभर समर्पितपणे पत्रकारिता केली. मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. समारंभाला ज्येष्ठ पत्रकारांसह तरुण पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवपत्रकारांना संदेश देताना ते म्हणाले, जुन्यांचे अनुभव ऐका, त्यातून स्वत:ला घडवा. पत्रकारिता ही समाजसेवेची संधी आहे. मनाला नियंत्रित ठेवण्याचा हा मार्ग आहे, जो महात्मा गांधीनी सांगितला होता. काळ जरा वेगळा आहे, पारदर्शी राहा. समाज आणि कुटुंबाच्या मनात विश्वास निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.आढावा ग्रंथ तयार कराआजवर पत्रकार संघाने ज्या पत्रकारांना स्व. अनिलकुमार स्मृती पुरस्कार दिले, त्या सर्व पत्रकारांचे कार्य मोठे आहे. या सर्वांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणारा स्मृतिग्रंथ काढा, अशी सूचना राज्यपाल पुरोहित यांनी केली. पत्रकारितेतील पुढच्या पिढीसाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सत्काराला उत्तर देताना धर्मेंद्र जोरे म्हणाले, हा आपणासाठी कौटुंबिक सोहळा आहे. पत्रकाराचे काम कुरिअरमॅनसारखे आहे. समाजापर्यंत तंतोतंत माहिती पोहचविण्याचे आव्हान यात असते. समाजमाध्यमांच्या आजच्या काळात खातरजमा करूनच समाजापर्यंत माहिती पोहचेल, याचेही समाजभान आवश्यक आहे. व्यक्त होण्यावर कालही निर्बंध होते, आजही आहेत. त्यासाठी शालजोडीतून लेखन करण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले. दुसरे सत्कारमूर्ती जोसेफ राव यांनीही मनोगत व्यक्त केले.अजय संचेती यांनी आपल्या मनोगतामधून अनिलकुमार यांच्या कार्याचा गौरव केला. पत्रकारितेचे मूल्य जोपासणाऱ्या दोन्ही पत्रकारांना हा पुरस्कार दिल्याने चीज झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. सत्कारमूर्र्तींचा परिचय राहुल पांडे यांनी करून दिला. संचालन रेखा दंडिगे यांनी तर आभार वर्षा बासू यांनी मानले.

 

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर