शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:42 IST

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहेत. लोकांमध्ये ते गेले नाहीत आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे१४ दिवसात एक लाख लोकांचे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहेत. लोकांमध्ये ते गेले नाहीत आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.नागपुरात पूर्वी जे चार व्यक्ती कोरोनाबाधित होते त्यांच्यापैकी एक रुग्ण पूर्णत: बरा झाला असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. अन्य तीन रुग्णही बरे होत असून पुढील काही दिवसांत त्यांनाही घरी पाठविण्यात येईल. हे चारही रुग्ण परदेशातून आलेले होते. नव्याने जे पॉझिटिव्ह आढळले आहे, त्यांच्यातील एक व्यक्ती आपल्या व्यवस्थापकासह दिल्लीला गेला होता. तेथून आल्यानंतर घरातील काहींच्या संपर्कात ते आले. त्या सर्वांची तपासणी करण्यात आली असून जे-जे पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.मनपाची चमू आता पुन्हा एकदा लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनच्या कोअर एरियामध्ये सर्वेक्षण करत आहे. पुढील १४ दिवसांपर्यंत मनपाच्या १८५ चमू २७,४६३ घरात राहणाऱ्या एक लाख लोकांचे सर्वेक्षण करणार आहे. सध्या आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरापासून एक कि.मी. त्रिज्येच्या परिसरातील ही घरे आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेले व्यक्ती आढळतील त्यांच्यावर मनपाच्या आरोग्य विभागाची चमू लक्ष ठेवेल. असाच सर्व्हे आता संपूर्ण शहरातही सुरू असून सुमारे ४९५ चमू यासाठी कार्यरत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढे