शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

माओवाद्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही :स्मिता गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:08 IST

आम्ही आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करत असल्याचा दावा माओवाद्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. आदिवासींचे मूलभूत हक्क नाकारुन केवळ शोषण करण्यातच त्यांना धन्यता वाटते, असे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ. स्मिता गायकवाड यांनी केले. धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर त्यांनी बुधवारी व्याख्यान दिले.

ठळक मुद्देशहरी नक्षलवादाच्या आव्हानावर टाकला प्रकाश

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : आम्ही आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करत असल्याचा दावा माओवाद्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. आदिवासींचे मूलभूत हक्क नाकारुन केवळ शोषण करण्यातच त्यांना धन्यता वाटते, असे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ. स्मिता गायकवाड यांनी केले. धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर त्यांनी बुधवारी व्याख्यान दिले.आर.एस.मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.उल्हास औरंगाबादकर, प्राचार्य संध्या नायर प्रामुख्याने उपस्थित होते. माओवाद्यांना विकास किंवा आदिवासींचे भले नको आहे. त्यांना केवळ राजकीय सत्ता हवी आहे. माओवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांत आदिवासींना कधीच नेतृत्व मिळाले नाही. त्यांच्या हाती केवळ बंदुकाच देण्यात आल्या. ज्या प्रमाणे माओवादी देशातील सुरक्षारक्षक व आदिवासींना जीवे मारतात, त्यातून त्यांचा विकृतपणा दिसून येतो. शहरी नक्षलवाद हा नवीन नाही. माओवादी चळवळीला रसद पुरविणे, आर्थिक मदत करणे, प्रपोगंडा करणे इत्यादी कामे या शहरी नक्षलवादातूनच होतात. शहरी नक्षलवाद हा देशासमोरील मोठे आव्हानच असून त्यांची ओळख करणे कठीण बाब आहे. असे कॅ.गायकवाड म्हणाल्या.‘आयसिस’, अलकायदाच्या रांगेत माओवादी‘सीपीआय’ (एम) वर देशात बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या दहशातवादाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनुसार धोकादायक संघटनांच्या यादीत ‘‘आयसिस’, ‘बोको हरम’, तालिबान व ‘अल कायदा’ नंतर माओवादी ‘सीपीआय’ (एम)चा पाचवा क्रमांक आहे, असा दावा कॅ.गायकवाड यांनी केला.प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारामाओवाद्यांचे मूळ ध्येय हे देशातील संविधानाला उलथून स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी १९४९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माओवादी हे संविधानासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात, असा इशारा दिला होता. त्यांचेच नाव पुढे करुन माओवादी दलितांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाला न मानणारे हे माओवादी आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने दलितांना ‘टार्गेट’ करत. मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे माओवादी देशाचे मित्र असल्याचे वक्तव्य देतात. प्रकाश आंबेडकरांना जनतेनेच प्रश्न विचारायला हवा, असे कॅ. गायकवाड म्हणाल्या.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर