शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

माओवाद्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही :स्मिता गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:08 IST

आम्ही आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करत असल्याचा दावा माओवाद्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. आदिवासींचे मूलभूत हक्क नाकारुन केवळ शोषण करण्यातच त्यांना धन्यता वाटते, असे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ. स्मिता गायकवाड यांनी केले. धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर त्यांनी बुधवारी व्याख्यान दिले.

ठळक मुद्देशहरी नक्षलवादाच्या आव्हानावर टाकला प्रकाश

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : आम्ही आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करत असल्याचा दावा माओवाद्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. आदिवासींचे मूलभूत हक्क नाकारुन केवळ शोषण करण्यातच त्यांना धन्यता वाटते, असे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ. स्मिता गायकवाड यांनी केले. धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर त्यांनी बुधवारी व्याख्यान दिले.आर.एस.मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.उल्हास औरंगाबादकर, प्राचार्य संध्या नायर प्रामुख्याने उपस्थित होते. माओवाद्यांना विकास किंवा आदिवासींचे भले नको आहे. त्यांना केवळ राजकीय सत्ता हवी आहे. माओवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांत आदिवासींना कधीच नेतृत्व मिळाले नाही. त्यांच्या हाती केवळ बंदुकाच देण्यात आल्या. ज्या प्रमाणे माओवादी देशातील सुरक्षारक्षक व आदिवासींना जीवे मारतात, त्यातून त्यांचा विकृतपणा दिसून येतो. शहरी नक्षलवाद हा नवीन नाही. माओवादी चळवळीला रसद पुरविणे, आर्थिक मदत करणे, प्रपोगंडा करणे इत्यादी कामे या शहरी नक्षलवादातूनच होतात. शहरी नक्षलवाद हा देशासमोरील मोठे आव्हानच असून त्यांची ओळख करणे कठीण बाब आहे. असे कॅ.गायकवाड म्हणाल्या.‘आयसिस’, अलकायदाच्या रांगेत माओवादी‘सीपीआय’ (एम) वर देशात बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या दहशातवादाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनुसार धोकादायक संघटनांच्या यादीत ‘‘आयसिस’, ‘बोको हरम’, तालिबान व ‘अल कायदा’ नंतर माओवादी ‘सीपीआय’ (एम)चा पाचवा क्रमांक आहे, असा दावा कॅ.गायकवाड यांनी केला.प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारामाओवाद्यांचे मूळ ध्येय हे देशातील संविधानाला उलथून स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी १९४९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माओवादी हे संविधानासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात, असा इशारा दिला होता. त्यांचेच नाव पुढे करुन माओवादी दलितांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाला न मानणारे हे माओवादी आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने दलितांना ‘टार्गेट’ करत. मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे माओवादी देशाचे मित्र असल्याचे वक्तव्य देतात. प्रकाश आंबेडकरांना जनतेनेच प्रश्न विचारायला हवा, असे कॅ. गायकवाड म्हणाल्या.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर