शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शांतता साधनाने नाही साधनेने मिळते

By admin | Updated: September 21, 2014 01:12 IST

मनाला शांती साधनाने नाही तर साधनेने मिळते. साधन तत्कालीन सुख देते पण साधना चिरंतन आनंद देते, असे मत मुनीश्री सुवीरसागर यांनी शनिवारी व्यक्त केले. चिटणीस पार्क, महाल येथे महाराजांच्या भव्य

मुनीश्री सुवीरसागर : श्री सैतवाळ जैन संघटन मंडळनागपूर : मनाला शांती साधनाने नाही तर साधनेने मिळते. साधन तत्कालीन सुख देते पण साधना चिरंतन आनंद देते, असे मत मुनीश्री सुवीरसागर यांनी शनिवारी व्यक्त केले. चिटणीस पार्क, महाल येथे महाराजांच्या भव्य प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मनाला शांतता कशी मिळेल, या विषयावर महाराज प्रवचन देत होते. सुवीर संस्कार मंच आणि चातुर्मास कमेटी सकल जैन समाज यांच्यावतीने महाराजांच्या प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराज म्हणाले, संतांच्या पादप्रक्षालनाने सर्व पापांचे प्रक्षालन होते. आकांक्षा निर्माण झाली तर मन सातत्याने अशांत राहते. शांतता आपल्याजवळच असते. शांतता बाहेर शोधण्याची मुळातच गरज नसते. एकाग्रतेने ईश्वराचे नामस्मरण केले तर शांतीचा अनुभव होतो. आज आपण आपलीच संस्कृती विसरत चाललो आहोत. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून शाळांमध्ये संस्कृत शिकविले गेले पाहिजे. यातूनच आपली संस्कृती आपण सांभाळू शकू. संग्रह करण्याची वृत्ती सोडून आपल्या गरजेपुरतेच आपण आपल्याजवळ बाळगले पाहिजे. पण आपल्या गरजा आपणच सातत्याने वाढवित असतो. मुनी आणि संतासाठी योग्य व्यवस्था करण्याचा प्रयत्न समाजाने केला पाहिजे. कारण संत आपल्या जीवनाचे सार आपल्याला सांगून योग्य मार्गाने नेत असतात. मुनी सुवीरसागरजी यांनी प्रवचनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीची प्रशंसा केली. महाराज म्हणाले, आपली संस्कृती लोप पावते आहे. पहिले अतिथी देवो भव असायचे. आता कुत्र्यांपासून सावधान असे घरांवर लिहिले असते. ही प्रवचनमाला चिटणीस पार्क, महाल येथे सुरु असून रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी प्रभु की पुकार विषयावर महाराजांचे प्रवचन सकाळी ८ वाजता होणार आहे. या प्रवचनाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)