शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मनपा अर्थसंकल्पात उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:51 IST

मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी यंदाही कायम ठेवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५१ कोटी अधिक रकमेचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात मागील चार-पाच वर्षातील अर्थसंकल्पात असलेल्या योजनांचा समावेश असल्याने या घोषणा अमलात येणार की कागदावरच राहणार प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देघोषणा कागदावरच; वर्षानुवर्षे प्रकल्प प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी यंदाही कायम ठेवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५१ कोटी अधिक रकमेचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात मागील चार-पाच वर्षातील अर्थसंकल्पात असलेल्या योजनांचा समावेश असल्याने या घोषणा अमलात येणार की कागदावरच राहणार प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.अर्थसंकल्पातील ६० टक्के घोषणांची अंमलबजावणी होत नाही. महाल परिसरातील श्रीमंत राजे रघुजीराव भोसले, नगरभवन टाऊन हॉल बांधकामासाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. वर्ष २०१५-१६ मध्ये तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी अर्थसंकल्पात समावेश केला होता. वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊ त यांनी या कामासाठी ५ कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर २०१७-१८ व वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात प्रत्येकी १० कोटींची तरतूद करण्यात आली होती. वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पात विद्यमान अध्यक्ष पोहाणे यांनी सुद्धा १० कोटींची तरतूद केली आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षात या प्रकल्पाला सुरुवात झालेली नाही.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी स्मारकासाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु हा निधी खर्च होत नाही. वर्ष २०१५-१६ मध्ये या प्रकल्पासाठी दोन कोटींची तरतूद केली होती. यंदाही या प्रकल्पासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली. दरवर्षीच्या अर्थसंकल्पातील हा निधी अखर्चित असतो. बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्रासाठी वर्ष २०१५ पासून अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. ही परंपरा यंदाही कायम ठेवली असून यासाठी दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे.वर्दळीच्या व बाजार भागात शौचालयांची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याचा विचार करता महिलांसाठी विशेष शौचालये उभारण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी महिलांसाठी शौचालये उभारण्यासाठी शहरातील ५० स्थळांची निवड करण्यात आली होती. जेमतेम १५ शौचालयांची निर्मिती करण्यात आली. यंदाही अर्थसंकल्पात तरतूद आहे. परंतु शौचालयाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही.अभिन्यासाचा विकास कधी होणार५७२ व १९०० अभिन्यासातील (ले-आऊ ट)मधील विविध विकास कामांसाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु त्या प्रमाणात निधी खर्च केला जात नाही. गेल्या पाच वर्षात जवळपास १०० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र अजूनही या भागात रस्ते, सिवरेज व पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे.२०१५-१६ या वर्षात ३० कोटी, २०१६-१७ मध्ये २५ कोटी, २०१७-१८ मध्ये २० कोटी, २०१८-१९ या वर्षात २० कोटी तर २०१९-२० या वर्षात २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ५७२ व १९०० अभिन्यासाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहे.तलाव संवर्धनाची प्रतीक्षाचशहरात १३ तलाव आहेत. तलावांचे संवर्धन झाले तर टंचाईच्या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. तलाव पुनर्जीवन प्रकल्प राबविण्यासाठी अर्थसंक ल्पात तरतूद केली जाते. सोनेगाव व गांधीसागर तलावांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने २९.३२ कोटींचा निधी उपलब्ध केला. पांढराबोडी तलाव संवर्धनाला शासनाची मंजुरी आहे. नाईक तलावाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अंबाझरी व फुटाळा तलावांचे प्रस्ताव राष्ट्रीय सरोवर संवर्धन विभागाला पाठविले आहेत. दुसरीकडे दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तलाव संवर्धनासाठी तरतूद क रूनही तलावांची दुर्दशा संपलेली नाही. नंदग्रामचा प्रश्नही गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudget 2019अर्थसंकल्प 2019