शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी जीवनासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:21 IST

सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय उरला नाही, असे प्रतिपादन सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ डॉ. सुमेध जाजू यांनी केले.

ठळक मुद्देबीजोत्सवाचा समारोप नागपूरकरांचा विषमुक्त धान्याला भरघोस प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतीमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्यांचा शिरकाव आणि त्यावर रासायनिक खते व कीटनाशकांचा वाढता वापर यामुळे अनेक प्रकारचे नवीन आजार बळावले आहेत. कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व किडनीच्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.रासायनिक कीटनाशकांमुळे शेतात राबणारे शेतकरी, मजूर यांच्यासह दररोज ताटात हे विष घेणाऱ्या सामान्य नागरिकांनाही याचे भीषण परिणाम भोगावे लागत आहेत. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी आज सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय उरला नाही, असे प्रतिपादन सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ डॉ. सुमेध जाजू यांनी केले.गेल्या तीन दिवसांपासून नागपूरकरांना रासायनिक विष सोडून सेंद्रिय अन्नाकडे प्रोत्साहित करणाऱ्या बीजोत्सव कृषी प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. प्रदर्शनात शेतकऱ्यांनी आणलेल्या धान्यापासून सर्व प्रकारचे जिन्नस भरभरून खरेदी केले. शेवटच्या दिवसांपर्यंत शेतकºयांचा बहुतेक माल संपला होता. यावरून नागपूरकर सेंद्रिय आहाराबाबत जागृत होत असल्याचेच दिसून येते. अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात डॉ. जाजू यांनी रासायनिक खते, कीटनाशक मधील नायट्रोजन, मोनो क्रोटो फॉस, ग्लायकोसेट, एंडोसल्फान अशा विषारी घटकांमुळे शरीरावर हळुहळू कसे दुष्परिणाम होत आहेत, याचे प्रात्याक्षिकच मांडले. सेवाग्राम येथील त्यांच्या रुग्णालयात दरवर्षी कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतात काम करणारे ३५० च्यावर लोक उपचारासाठी येतात व त्यातून २०० रुग्णांना कधी कधी महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. हे कीटकनाशक भूजलही प्रदूषित करतात. शिवाय अन्नाद्वारे शरीरात येणाºया या रासायनिक घटकांमुळे हृदय, किडनी व इतर अवयवांचे काम मंदावते. गर्भस्थ मातांना गंभीर आजार होतात तर शिशुंच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होतात. यातील बहुतेक कीटकनाशकावर इतर देशांमध्ये बंदी आहे. श्रीलंकेने संपूर्ण बंदी घातल्याने कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे होणारे मृत्यूदर ५० टक्क्याने कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.युरोपियन युनियनच्या बहुतेक देशांमध्ये या कीटनाशकांवर बंदी आहे. भारतात मात्र या विषाचा सर्रासपणे वापर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कीटकनाशकांच्या विदेशी कंपन्यांच्या दबावात भारत सरकार नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत असल्याची टीका त्यांनी केली.या सत्रांमध्ये सचिन बारब्दे यांनी ‘आदिवासींची खाद्यसंस्कृती व पोषण’ या विषयावर मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रात अनेजा व रुपिंदर नंदा यांनी नागपुरात त्यांच्या वस्तीत चालविलेल्या कम्युनिटी फार्मिंगचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.यावेळी वसंत फुटाणे, डॉ. सतीश गोगुलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या संपूर्ण आयोजनात कीर्ती मंगरुळकर, शेतीतज्ज्ञ अमिताभ पावडे, सुषमा खोब्रागडे, हर्षल अवचट, अश्विनी औरंगाबादकर, अतुल उपाध्याय, प्राची माहूरकर आकाश नवघरे, सजल कुलकर्णी आदींनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

टॅग्स :agricultureशेती