शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

निरोगी जीवनासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:21 IST

सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय उरला नाही, असे प्रतिपादन सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ डॉ. सुमेध जाजू यांनी केले.

ठळक मुद्देबीजोत्सवाचा समारोप नागपूरकरांचा विषमुक्त धान्याला भरघोस प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतीमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्यांचा शिरकाव आणि त्यावर रासायनिक खते व कीटनाशकांचा वाढता वापर यामुळे अनेक प्रकारचे नवीन आजार बळावले आहेत. कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व किडनीच्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.रासायनिक कीटनाशकांमुळे शेतात राबणारे शेतकरी, मजूर यांच्यासह दररोज ताटात हे विष घेणाऱ्या सामान्य नागरिकांनाही याचे भीषण परिणाम भोगावे लागत आहेत. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी आज सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय उरला नाही, असे प्रतिपादन सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ डॉ. सुमेध जाजू यांनी केले.गेल्या तीन दिवसांपासून नागपूरकरांना रासायनिक विष सोडून सेंद्रिय अन्नाकडे प्रोत्साहित करणाऱ्या बीजोत्सव कृषी प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. प्रदर्शनात शेतकऱ्यांनी आणलेल्या धान्यापासून सर्व प्रकारचे जिन्नस भरभरून खरेदी केले. शेवटच्या दिवसांपर्यंत शेतकºयांचा बहुतेक माल संपला होता. यावरून नागपूरकर सेंद्रिय आहाराबाबत जागृत होत असल्याचेच दिसून येते. अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात डॉ. जाजू यांनी रासायनिक खते, कीटनाशक मधील नायट्रोजन, मोनो क्रोटो फॉस, ग्लायकोसेट, एंडोसल्फान अशा विषारी घटकांमुळे शरीरावर हळुहळू कसे दुष्परिणाम होत आहेत, याचे प्रात्याक्षिकच मांडले. सेवाग्राम येथील त्यांच्या रुग्णालयात दरवर्षी कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतात काम करणारे ३५० च्यावर लोक उपचारासाठी येतात व त्यातून २०० रुग्णांना कधी कधी महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. हे कीटकनाशक भूजलही प्रदूषित करतात. शिवाय अन्नाद्वारे शरीरात येणाºया या रासायनिक घटकांमुळे हृदय, किडनी व इतर अवयवांचे काम मंदावते. गर्भस्थ मातांना गंभीर आजार होतात तर शिशुंच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होतात. यातील बहुतेक कीटकनाशकावर इतर देशांमध्ये बंदी आहे. श्रीलंकेने संपूर्ण बंदी घातल्याने कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे होणारे मृत्यूदर ५० टक्क्याने कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.युरोपियन युनियनच्या बहुतेक देशांमध्ये या कीटनाशकांवर बंदी आहे. भारतात मात्र या विषाचा सर्रासपणे वापर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कीटकनाशकांच्या विदेशी कंपन्यांच्या दबावात भारत सरकार नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत असल्याची टीका त्यांनी केली.या सत्रांमध्ये सचिन बारब्दे यांनी ‘आदिवासींची खाद्यसंस्कृती व पोषण’ या विषयावर मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रात अनेजा व रुपिंदर नंदा यांनी नागपुरात त्यांच्या वस्तीत चालविलेल्या कम्युनिटी फार्मिंगचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.यावेळी वसंत फुटाणे, डॉ. सतीश गोगुलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या संपूर्ण आयोजनात कीर्ती मंगरुळकर, शेतीतज्ज्ञ अमिताभ पावडे, सुषमा खोब्रागडे, हर्षल अवचट, अश्विनी औरंगाबादकर, अतुल उपाध्याय, प्राची माहूरकर आकाश नवघरे, सजल कुलकर्णी आदींनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

टॅग्स :agricultureशेती