शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

निरोगी जीवनासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:21 IST

सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय उरला नाही, असे प्रतिपादन सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ डॉ. सुमेध जाजू यांनी केले.

ठळक मुद्देबीजोत्सवाचा समारोप नागपूरकरांचा विषमुक्त धान्याला भरघोस प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतीमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्यांचा शिरकाव आणि त्यावर रासायनिक खते व कीटनाशकांचा वाढता वापर यामुळे अनेक प्रकारचे नवीन आजार बळावले आहेत. कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व किडनीच्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.रासायनिक कीटनाशकांमुळे शेतात राबणारे शेतकरी, मजूर यांच्यासह दररोज ताटात हे विष घेणाऱ्या सामान्य नागरिकांनाही याचे भीषण परिणाम भोगावे लागत आहेत. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी आज सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय उरला नाही, असे प्रतिपादन सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ डॉ. सुमेध जाजू यांनी केले.गेल्या तीन दिवसांपासून नागपूरकरांना रासायनिक विष सोडून सेंद्रिय अन्नाकडे प्रोत्साहित करणाऱ्या बीजोत्सव कृषी प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. प्रदर्शनात शेतकऱ्यांनी आणलेल्या धान्यापासून सर्व प्रकारचे जिन्नस भरभरून खरेदी केले. शेवटच्या दिवसांपर्यंत शेतकºयांचा बहुतेक माल संपला होता. यावरून नागपूरकर सेंद्रिय आहाराबाबत जागृत होत असल्याचेच दिसून येते. अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात डॉ. जाजू यांनी रासायनिक खते, कीटनाशक मधील नायट्रोजन, मोनो क्रोटो फॉस, ग्लायकोसेट, एंडोसल्फान अशा विषारी घटकांमुळे शरीरावर हळुहळू कसे दुष्परिणाम होत आहेत, याचे प्रात्याक्षिकच मांडले. सेवाग्राम येथील त्यांच्या रुग्णालयात दरवर्षी कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतात काम करणारे ३५० च्यावर लोक उपचारासाठी येतात व त्यातून २०० रुग्णांना कधी कधी महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. हे कीटकनाशक भूजलही प्रदूषित करतात. शिवाय अन्नाद्वारे शरीरात येणाºया या रासायनिक घटकांमुळे हृदय, किडनी व इतर अवयवांचे काम मंदावते. गर्भस्थ मातांना गंभीर आजार होतात तर शिशुंच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होतात. यातील बहुतेक कीटकनाशकावर इतर देशांमध्ये बंदी आहे. श्रीलंकेने संपूर्ण बंदी घातल्याने कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे होणारे मृत्यूदर ५० टक्क्याने कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.युरोपियन युनियनच्या बहुतेक देशांमध्ये या कीटनाशकांवर बंदी आहे. भारतात मात्र या विषाचा सर्रासपणे वापर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कीटकनाशकांच्या विदेशी कंपन्यांच्या दबावात भारत सरकार नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत असल्याची टीका त्यांनी केली.या सत्रांमध्ये सचिन बारब्दे यांनी ‘आदिवासींची खाद्यसंस्कृती व पोषण’ या विषयावर मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रात अनेजा व रुपिंदर नंदा यांनी नागपुरात त्यांच्या वस्तीत चालविलेल्या कम्युनिटी फार्मिंगचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.यावेळी वसंत फुटाणे, डॉ. सतीश गोगुलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या संपूर्ण आयोजनात कीर्ती मंगरुळकर, शेतीतज्ज्ञ अमिताभ पावडे, सुषमा खोब्रागडे, हर्षल अवचट, अश्विनी औरंगाबादकर, अतुल उपाध्याय, प्राची माहूरकर आकाश नवघरे, सजल कुलकर्णी आदींनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

टॅग्स :agricultureशेती