शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नाण्यांची ‘लिंक’ लागता लागेना

By admin | Updated: April 8, 2016 02:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याच्या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.

नागपूर विद्यापीठ : माजी विभागप्रमुखांच्या स्पष्टीकरणावर कुलगुरू असमाधानीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याच्या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. विभागाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीकडून विविध दावे करण्यात येत आहेत. माजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप मेश्राम यांची कुलगुरूंनी चौकशी केली. परंतु त्यांच्या स्पष्टीकरणावर समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच नाणे प्रकरणामुळे आता खुद्द कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे देखील संभ्रमात पडले आहेत. १९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली दोनशेहून अधिक नाणी विभागात आता नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. याबाबतचा चौकशी अहवालदेखील गायब झाला असून या प्रकरणातील गूढ वाढले आहे. यानंतर विद्यापीठ प्रशासन चांगलेच हादरले आहे. डॉ. प्रदीप मेश्राम गेल्या सोमवारपासून विनापरवानगी तसेच कुणालाही न कळविता सुटीवर गेले होते. कुलगुरूंनी कडक पवित्रा घेतल्यावर डॉ. मेश्राम यांनी बुधवार व गुरुवार अशी दोन दिवस त्यांच्यासमोर हजेरी लावली. गुरुवारी कुलगुरूंनी डॉ. मेश्राम यांच्यासोबतच विभागातील ‘क्राफ्टमन’ सहारकर तसेच छायाचित्रकार वंदना खेडीकर यांनादेखील बोलविले व प्रत्येकाला विचारणा केली. माजी विभागप्रमुख डॉ. गुप्त यांनी याबाबत कुठलीही माहिती दिली नव्हती व ही नाणी मी कधीही हाताळली नाही, असा दावा डॉ. मेश्राम यांनी सुरुवातीला केला. परंतु त्यांचे या नाण्यांवरच संशोधन असल्याचे कुलगुरूंनी म्हणताच डॉ. मेश्राम अडखळले. डॉ. गुप्त यांनी २००४ साली तर डॉ. मेश्राम यांनी त्यानंतर काही वर्षांनी या नाण्यांची छायाचित्रे काढण्यास सांगितली होती. सहारकर यांच्या माध्यमातून ही नाणी माझ्याकडे पाठविली होती, असे खेडीकर यांनी सांगितले. याबाबतचे लेखी पुरावेदेखील आपल्याकडे असल्याचे त्यांनी कुलगुरूंना सांगितले. सहारकर यांनी ही नाणी आपल्या ‘कस्टडी’त कधीही नव्हते, असा दावा केला. त्यामुळे एकूणच नेमके कोण खरे बोलत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)अद्याप पोलीस तक्रार नाहीदेशाची मौलिक संपत्ती असलेली नाणी गायब झाल्याचे प्रकरण गंभीर आहे. परंतु त्यावर अद्यापही विद्यापीठाने पोलीस तक्रार केलेली नाही. सर्व कागदपत्रे तसेच संबंधितांची लेखी उत्तरे आली की त्यावर विचार करू असे कुलगुरूंनी सांगितले. डॉ.प्रदीप मेश्राम या महिन्यात निवृत्त होणार आहेत. तेव्हा त्यांचे नाव या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी कुलगुरूंवर काही अधिकाऱ्यांचा दबाव असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. परंतु आपल्यावर कुणाचेही दडपण नाही. वेळ पडली तर कठोर कारवाई करू असे ते म्हणाले.सुटीवर असताना कार्यभार कसा सोपविला?तत्कालीन विभागप्रमुख डॉ.प्रदीप मेश्राम यांनी केवळ प्रशासकीय पदभार सोपविला होता, असा दावा आताच्या विभागप्रमुख डॉ.प्रीती त्रिवेदी यांनी केला होता. मुळात डॉ.मेश्राम हे डिसेंबर २०१३ मध्ये एक महिन्याच्या रजेवर गेले होते. रजेवर असतानादेखील १० डिसेंबर रोजी ते विभागात आले व कार्यभार सोपविला अशी नोंद आहे. जर डॉ.मेश्राम रजेवर होते तर कार्यभार कसा काय सोपविला याचे कुठलेही उत्तर त्यांच्याकडे नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.