शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

निवडणुका लवकर होतील याबाबत अजूनही साशंकताच; आयोगाकडून कधी मिळणार हिरवी झेंडी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:56 IST

उमेदवार बाशिंग बांधून : निवडणुकीसाठी मनपाची तयारी पूर्ण

नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यांत निघाली पाहिजे. यानंतर चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी दिले होते. त्यामुळे नागपूरसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असे वाटत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच नागपूर महापालिकेच्या निवडणूक विभागाने तयारी केली होती. मात्र ४ आठवडे लोटूनही राज्य निवडणूक आयोगाकडून कुठलेही निर्देश आलेले नाही. त्यामुळे निवडणुका लवकरच होतील, याबाबत अजूनही साशंकताच आहे. 

महायुतीचे सरकार २०१७ प्रमाणेच प्रभागरचना ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार विचाराधीन आहे. त्यामुळे नागपूर महापालिका क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच ३८ प्रभागांत १५१ नगरसेवकांची संख्या राहण्याची शक्यता आहे. प्रभागरचना झाल्यानंतर आयोग आरक्षण व मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करेल. २०११ च्या जनगणनेनुसार २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभागरचना होती. त्यावेळी ३८ प्रभाग होते. त्यात १५१ नगरसेवक निवडून आले. ३७ प्रभागात ४ नगरसेवक निवडून आले. प्रभाग ३८ मध्ये तीन नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय ५ नगरसेवकांना नामनियुक्त सदस्य म्हणून निवडण्यात आले होते. आगामी मनपा निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसार होणार असून, चार सदस्यीय प्रभाग रचना राहणार असल्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी यासंदर्भात निकाल देत चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. 

महानगरपालिकेची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी झाली आहे. निवडणूक आयोगाकडून अजून निर्देश मिळालेले नाहीत. प्रभाग रचना चार सदस्यीय राहण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून नोटिफिकेशन निघाल्यानंतर महानगरपालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागेल, असे मनपा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. २७ टक्के आरक्षणानंतर टक्केवारी ५० च्या वर दुसरीकडे आयोगही ओबीसी आरक्षणावरून संभ्रमात आहे. ५० टक्केवर आरक्षण जाता कामा नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे आहे. पण महापालिकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिल्यास आरक्षणाची टक्केवारी ५० च्या वर जात आहे. निवडणुका पुढे ढकलण्याला राज्य सरकारकडे ऑपरेशन सिंदूर हा पर्यायही आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाकडून निवडणुकीच्या संदर्भात हिरवी झेंडी मिळाल्यानंतरच आरोग्य सक्रिय होईल, असे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांचे म्हणणे आहे.

कार्यकर्त्यांचा होणार हिरमोडसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते बाशिंग बांधून बसले आहेत. काहींनी वार्डात संपर्क सुरू केला आहे. नेत्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शविली आहे. त्यांनाही अपेक्षा होती की ४ आठवड्यांत निवडणूक आयोग अधिसूचना काढेल, मात्र ४ आठवडे संपायला एकच दिवस शिल्लक आहे. तीन वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा व माजी नगरसेवकांचा पुन्हा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

हिरवी झेंडी मिळाल्यानंतरच आयोग होईल सक्रियसर्वोच्च न्यायालयाने ४ आठवड्यांत अधिसूचना काढून ४ महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले खरे. पण निवडणूक आयोगाला राज्य सरकारची मदत मिळाल्याशिवाय आयोगही अधिसूचना काढू शकत नाही. सध्या मुंबईत राजकीय उलथापालथ सुरू आहे. राज्य सरकारच्या प्रतिनिधींचे मुंबई सर करण्याकडे लक्ष आहे.

टॅग्स :nagpurनागपूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024