शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंतुले, निलंगेकर, जोशी, देशमुखांसारखी नैतिकता शिंदे सरकारमध्ये नाही - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 11:16 IST

सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण

नागपूर : ए. आर. अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, मनोहर जोशी, विलासराव देशमुख या माजी मुख्यमंत्र्यांवर जेव्हा न्यायालयाने ताशेरे ओढले किंवा प्रसारमाध्यमांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली असता पदाचे राजीनामे दिले व सत्ता सोडली. ती महाराष्ट्राची राजकीय नैतिकता होती. आता मात्र बेकायदेशीर सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे. ते कायदा मानण्यास तयारच नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नैतिकताच नाही, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी डॉ. देशपांडे सभागृहात विश्लेषण केले. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री आ. सुनील केदार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, जि. प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी आ. दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, भूपेश थलकर आदी उपस्थित होते.

यावेळी आव्हाड म्हणाले, व्हीपची नियुक्ती राजकीय पक्षाद्वारे केली जाते. भारत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती चुकीची होती. तुटलेल्या गटाने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देता येणार नाही, असे सर्वोेच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना फक्त अपात्रतेवर निर्णय घ्यायचा आहे. शिवसेनेच्या तुटलेल्या गटाने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देता येणार नाही. शिवसेनेचे प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोेधात मतदान करण्याचा व्हीप बजावला होता. तो व्हीप एकनाथ शिंदे यांनाही बंधनकारक आहे. त्यामुळे शिंदे यांचे गटनेतेपददेखील बेकायदेशीर ठरते, असे आव्हाड यांनी सांगितले. केवळ आमदार खरेदी करून सत्ता स्थापन केली जात असेल तर उद्या दोन उद्योगपती येतील व १५० आमदार खरेदी करून सत्ता बसवतील. मग लोकशाहीला अर्थ काय, असा सवाल करीत या बेकायदेशीर सरकारविरोधात बोला, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

देवेंद्रजींना निकाल कळला आहे

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कळला आहे. त्यामुळे ते आता या विषयावर काहीच बोलत नाहीत. शिंदे यांनी आज केलेल्या जाहिरातबाजीमुळे या केसचा निकाल लवकर लागला पाहिजे, अशी फडणवीस यांचीदेखील इच्छा असेल, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. न्यायव्यवस्था आपल्या हातातच आहे, अशी भावना काही लोकांची झाली आहे, असा चिमटाही त्यांनी घेतला.

सरकार पाडण्यासाठीच राज्यपालांची नियुक्ती

- महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी राजकीय प्यादा बनून हालचाली केल्या, असा आरोपही आव्हाड यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणJitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे