शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अंतुले, निलंगेकर, जोशी, देशमुखांसारखी नैतिकता शिंदे सरकारमध्ये नाही - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 11:16 IST

सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण

नागपूर : ए. आर. अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, मनोहर जोशी, विलासराव देशमुख या माजी मुख्यमंत्र्यांवर जेव्हा न्यायालयाने ताशेरे ओढले किंवा प्रसारमाध्यमांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली असता पदाचे राजीनामे दिले व सत्ता सोडली. ती महाराष्ट्राची राजकीय नैतिकता होती. आता मात्र बेकायदेशीर सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे. ते कायदा मानण्यास तयारच नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नैतिकताच नाही, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी डॉ. देशपांडे सभागृहात विश्लेषण केले. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री आ. सुनील केदार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, जि. प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी आ. दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, भूपेश थलकर आदी उपस्थित होते.

यावेळी आव्हाड म्हणाले, व्हीपची नियुक्ती राजकीय पक्षाद्वारे केली जाते. भारत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती चुकीची होती. तुटलेल्या गटाने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देता येणार नाही, असे सर्वोेच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना फक्त अपात्रतेवर निर्णय घ्यायचा आहे. शिवसेनेच्या तुटलेल्या गटाने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देता येणार नाही. शिवसेनेचे प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोेधात मतदान करण्याचा व्हीप बजावला होता. तो व्हीप एकनाथ शिंदे यांनाही बंधनकारक आहे. त्यामुळे शिंदे यांचे गटनेतेपददेखील बेकायदेशीर ठरते, असे आव्हाड यांनी सांगितले. केवळ आमदार खरेदी करून सत्ता स्थापन केली जात असेल तर उद्या दोन उद्योगपती येतील व १५० आमदार खरेदी करून सत्ता बसवतील. मग लोकशाहीला अर्थ काय, असा सवाल करीत या बेकायदेशीर सरकारविरोधात बोला, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

देवेंद्रजींना निकाल कळला आहे

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कळला आहे. त्यामुळे ते आता या विषयावर काहीच बोलत नाहीत. शिंदे यांनी आज केलेल्या जाहिरातबाजीमुळे या केसचा निकाल लवकर लागला पाहिजे, अशी फडणवीस यांचीदेखील इच्छा असेल, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. न्यायव्यवस्था आपल्या हातातच आहे, अशी भावना काही लोकांची झाली आहे, असा चिमटाही त्यांनी घेतला.

सरकार पाडण्यासाठीच राज्यपालांची नियुक्ती

- महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी राजकीय प्यादा बनून हालचाली केल्या, असा आरोपही आव्हाड यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणJitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे