शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मनोरंजनाचे साहित्य खूप झाले, आता वेदनाही लिहा - शरद निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 12:50 IST

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय संमेलनाच्या समारोपीय सत्रात अध्यक्षस्थानातून निंबाळकर बोलत होते.

ठळक मुद्देपहिल्या मायमराठी साहित्य संमेलनाचा समारोप

नागपूर : मनोरंजनाचे साहित्य खूप लिहिले गेले, वाचले गेले... आता, त्यापलीकडे जाऊन दु:खाला वेदनेचे रूप देणाऱ्या साहित्याची निर्मिती होणे, ते लिहिले जाणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले.

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय संमेलनाच्या समारोपीय सत्रात अध्यक्षस्थानातून निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, जिल्हाधिकारी आर. विमला, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, विष्णू मनोहर, डॉ. दत्तात्रय वाटमोडे, डॉ. विजया मारोतकर, विशाला देवतळे, डॉ. वडते, डॉ. भारती खापेकर उपस्थित होते.

जाती-जातीचे साहित्य खूप लिहिले गेले. मात्र, आता जे माझे तेच तुझे असा भाव निर्माण करणारे सेक्युलर साहित्य निर्माण व्हावे. सेक्युलर साहित्य, हा शब्दच या संमेलनाची देणगी असल्याचे कौतुक डॉ. शरद निंबाळकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी डॉ. सुरेश खोंडे, आशा पांडे, डॉ. स्मिता वंजारी, मनोज बालपांडे, वैशाली कोहळे, मंगेश बावसे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अरुणा भाेंडे यांनी केले तर आभार विजया मारोतकर यांनी मानले.

अभिजात भाषा, हा भगव्याच्या अस्मितेचा सवाल - सबनीस

मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळावी, असे शेकडो प्रस्ताव सादर झाले तरीदेखील दिल्ली हादरली नाही. अभिजात भाषेची मागणी ही काळजाची आहे आणि काळीज दिल्लीला हलवणारे असेल तर मोदींनाही ती मागणी पूर्ण करावीच लागेल. शेवटी मराठी हा लोकमान्य, सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याच्या अस्मितेचा सवाल असल्याचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.

साहित्य म्हणजे, रिकामटेकडेपणाचे कार्य नव्हे - शोभणे

वर्तमानात आयुष्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे रिकामा वेळ म्हणून अनेकांना साहित्यिक होण्याची हौस लागली आहे. मात्र, साहित्य हे रिकामटेकडेपणाचे काम नसून साहित्यनिर्मितीत गुंतण्यापूर्वी आधी साहित्य वाचन महत्त्वाचे असल्याचे मत कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी गायले गाणे

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी समारोपीय सत्रात आपल्या भाषणाच्या वेळी ‘पल पल खुशियो से भरा हैं जीवन, हर मोड पे मिल जाते हैं बाहे फैलाये, छोटी छोटी खुशियाँ’ ही स्वरचित कविता व ‘जीवलगा’ हे चित्रपट गीत सादर करत स्वत:तील साहित्य व कलारसिकतेचे दर्शन घडविले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक