शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनोरंजनाचे साहित्य खूप झाले, आता वेदनाही लिहा - शरद निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 12:50 IST

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय संमेलनाच्या समारोपीय सत्रात अध्यक्षस्थानातून निंबाळकर बोलत होते.

ठळक मुद्देपहिल्या मायमराठी साहित्य संमेलनाचा समारोप

नागपूर : मनोरंजनाचे साहित्य खूप लिहिले गेले, वाचले गेले... आता, त्यापलीकडे जाऊन दु:खाला वेदनेचे रूप देणाऱ्या साहित्याची निर्मिती होणे, ते लिहिले जाणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले.

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय संमेलनाच्या समारोपीय सत्रात अध्यक्षस्थानातून निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, जिल्हाधिकारी आर. विमला, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, विष्णू मनोहर, डॉ. दत्तात्रय वाटमोडे, डॉ. विजया मारोतकर, विशाला देवतळे, डॉ. वडते, डॉ. भारती खापेकर उपस्थित होते.

जाती-जातीचे साहित्य खूप लिहिले गेले. मात्र, आता जे माझे तेच तुझे असा भाव निर्माण करणारे सेक्युलर साहित्य निर्माण व्हावे. सेक्युलर साहित्य, हा शब्दच या संमेलनाची देणगी असल्याचे कौतुक डॉ. शरद निंबाळकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी डॉ. सुरेश खोंडे, आशा पांडे, डॉ. स्मिता वंजारी, मनोज बालपांडे, वैशाली कोहळे, मंगेश बावसे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अरुणा भाेंडे यांनी केले तर आभार विजया मारोतकर यांनी मानले.

अभिजात भाषा, हा भगव्याच्या अस्मितेचा सवाल - सबनीस

मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळावी, असे शेकडो प्रस्ताव सादर झाले तरीदेखील दिल्ली हादरली नाही. अभिजात भाषेची मागणी ही काळजाची आहे आणि काळीज दिल्लीला हलवणारे असेल तर मोदींनाही ती मागणी पूर्ण करावीच लागेल. शेवटी मराठी हा लोकमान्य, सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याच्या अस्मितेचा सवाल असल्याचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.

साहित्य म्हणजे, रिकामटेकडेपणाचे कार्य नव्हे - शोभणे

वर्तमानात आयुष्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे रिकामा वेळ म्हणून अनेकांना साहित्यिक होण्याची हौस लागली आहे. मात्र, साहित्य हे रिकामटेकडेपणाचे काम नसून साहित्यनिर्मितीत गुंतण्यापूर्वी आधी साहित्य वाचन महत्त्वाचे असल्याचे मत कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी गायले गाणे

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी समारोपीय सत्रात आपल्या भाषणाच्या वेळी ‘पल पल खुशियो से भरा हैं जीवन, हर मोड पे मिल जाते हैं बाहे फैलाये, छोटी छोटी खुशियाँ’ ही स्वरचित कविता व ‘जीवलगा’ हे चित्रपट गीत सादर करत स्वत:तील साहित्य व कलारसिकतेचे दर्शन घडविले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक