शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

विहीरीत पडणाऱ्या जनावरांच्या पुरेशा नोंदीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST

नागपूर : वन्यजीवांच्या रक्षणावर सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करीत असले तरी वनविभागाचे नियोजन व्याघ्रकेंद्रीच असल्याचे दिसत आहे. केवळ वाघाभोवती ...

नागपूर : वन्यजीवांच्या रक्षणावर सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करीत असले तरी वनविभागाचे नियोजन व्याघ्रकेंद्रीच असल्याचे दिसत आहे. केवळ वाघाभोवती सर्व यंत्रणा आणि नियोजन फिरत असल्याने अन्य प्राण्यांच्या जीविताकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसत आहे. विनाकठड्याच्या विहिरींवर कठडे बांधण्याची योजना दहा वर्षे जुनी असली तरी अनेक ठिकाणी हे काम झालेच नाही. सातत्याने घटना घडत असल्या तरी मरणाऱ्या अन्य प्राण्यांची नोंद मात्र वनविभागाकडे नाही.

विनाकठड्यांच्या विहिरींमुळे राज्यात आजवर किती जनावरांचे मृत्यू झाले याची माहिती घेण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे संपर्क साधला असता, अशी आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. केवळ वाघांचीच मागील तीन वर्षांची अद्ययावत माहिती या कार्यालयाकडे आहे. त्यामुळे अन्य वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू वनविभागासाठी महत्त्वाचे नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेच्या माध्यमातून मागील पाच ते सहा वर्षापासून विहिरीवर कठडे बांधण्यासाठी पैसे देण्याची तरतूद आहे. मात्र शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचलेली नाही. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत कठडे बांधण्याची तरतूद आहे. त्यामधूनही फारसे निष्पन्न झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही योजनांमधून विहिरी बांधून दिल्या जातात. बरेचदा खर्च वाचविण्यासाठी कठडे बांधण्याचे टाळले जाते, असाही अनुभव आहे. अशा विहिरी दुर्दैवाने वन्यजीवांसाठी घातक ठरतात.

...

आरएफओला करता आले ते वनविभागाला का नाही?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील वानाडोंगरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी २०१९ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून १० लाख रुपयांमधून वानाडोंगरी वनपरिक्षेत्रातील व जंगलालगतच्या सर्व खासगी, सरकारी ३९ विहिरींवर कठडे बांधून काढले. यासाठी त्यांनी शेतकऱ्यांकडून पैसाही घेतला नाही. कठडे बांधल्यापासून या घटना शून्यावर आल्या आहे. मात्र वनविभागाने वानाडोंगरीचा कित्ता गिरवला नाही. एवढेच नाही तर त्यांच्या कार्याची म्हणावी तशी दखलही वन विभागातील वरीष्ठांनी घेतली नाही. खरे तर राज्यभर अशाप्रकारे काम करायला हवे होते. एका आरएफओला करता आले, ते वनविभागाला का करता येऊ नये, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

...

१० वर्षांपूर्वी काढण्यात आले होते परिपत्रक

यासाठी योजना असल्या तरी वनविभागाच्या प्रयत्नांमध्ये जोम नाही. २०१९ ते चालू मे-२०२१ या काळात विहिरीत पडून ६ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. अन्य प्राण्यांची नोंदच नाही. प्रत्यक्षात अस्वल, रानडुक्कर, हरीण आदी प्राणी अनेकदा विहिरीत पडल्याच्या घटना आहेत. १० वर्षापूर्वी कठडे बांधण्यासाठी परिपत्रक निघाले होते. कामाचा अहवालही मागविला होता. मात्र हा विषय कुणी फारसा गांभीर्याने घेतला नाही.

...