शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विहीरीत पडणाऱ्या जनावरांच्या पुरेशा नोंदीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST

नागपूर : वन्यजीवांच्या रक्षणावर सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करीत असले तरी वनविभागाचे नियोजन व्याघ्रकेंद्रीच असल्याचे दिसत आहे. केवळ वाघाभोवती ...

नागपूर : वन्यजीवांच्या रक्षणावर सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करीत असले तरी वनविभागाचे नियोजन व्याघ्रकेंद्रीच असल्याचे दिसत आहे. केवळ वाघाभोवती सर्व यंत्रणा आणि नियोजन फिरत असल्याने अन्य प्राण्यांच्या जीविताकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसत आहे. विनाकठड्याच्या विहिरींवर कठडे बांधण्याची योजना दहा वर्षे जुनी असली तरी अनेक ठिकाणी हे काम झालेच नाही. सातत्याने घटना घडत असल्या तरी मरणाऱ्या अन्य प्राण्यांची नोंद मात्र वनविभागाकडे नाही.

विनाकठड्यांच्या विहिरींमुळे राज्यात आजवर किती जनावरांचे मृत्यू झाले याची माहिती घेण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे संपर्क साधला असता, अशी आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. केवळ वाघांचीच मागील तीन वर्षांची अद्ययावत माहिती या कार्यालयाकडे आहे. त्यामुळे अन्य वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू वनविभागासाठी महत्त्वाचे नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेच्या माध्यमातून मागील पाच ते सहा वर्षापासून विहिरीवर कठडे बांधण्यासाठी पैसे देण्याची तरतूद आहे. मात्र शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचलेली नाही. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत कठडे बांधण्याची तरतूद आहे. त्यामधूनही फारसे निष्पन्न झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही योजनांमधून विहिरी बांधून दिल्या जातात. बरेचदा खर्च वाचविण्यासाठी कठडे बांधण्याचे टाळले जाते, असाही अनुभव आहे. अशा विहिरी दुर्दैवाने वन्यजीवांसाठी घातक ठरतात.

...

आरएफओला करता आले ते वनविभागाला का नाही?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील वानाडोंगरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी २०१९ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून १० लाख रुपयांमधून वानाडोंगरी वनपरिक्षेत्रातील व जंगलालगतच्या सर्व खासगी, सरकारी ३९ विहिरींवर कठडे बांधून काढले. यासाठी त्यांनी शेतकऱ्यांकडून पैसाही घेतला नाही. कठडे बांधल्यापासून या घटना शून्यावर आल्या आहे. मात्र वनविभागाने वानाडोंगरीचा कित्ता गिरवला नाही. एवढेच नाही तर त्यांच्या कार्याची म्हणावी तशी दखलही वन विभागातील वरीष्ठांनी घेतली नाही. खरे तर राज्यभर अशाप्रकारे काम करायला हवे होते. एका आरएफओला करता आले, ते वनविभागाला का करता येऊ नये, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

...

१० वर्षांपूर्वी काढण्यात आले होते परिपत्रक

यासाठी योजना असल्या तरी वनविभागाच्या प्रयत्नांमध्ये जोम नाही. २०१९ ते चालू मे-२०२१ या काळात विहिरीत पडून ६ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. अन्य प्राण्यांची नोंदच नाही. प्रत्यक्षात अस्वल, रानडुक्कर, हरीण आदी प्राणी अनेकदा विहिरीत पडल्याच्या घटना आहेत. १० वर्षापूर्वी कठडे बांधण्यासाठी परिपत्रक निघाले होते. कामाचा अहवालही मागविला होता. मात्र हा विषय कुणी फारसा गांभीर्याने घेतला नाही.

...