शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मतदारयाद्याच नाहीत, मग निवडणुकीची घाई का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 20:35 IST

Chandrakant Patil, media, Nagpur news

ठळक मुद्देआयोगाकडून अपेक्षेपेक्षा अगोदरच घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका मार्च महिन्यात होतील, असे वाटले होते. इतक्या लवकर त्यांची घोषणा अपेक्षित नव्हती. अद्याप मतदार याद्यांची घोषणा व्हायची आहे. अशास्थितीत निवडणुकीची घाई का करण्यात आली, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. मंगळवारी दुपारी त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा एकूण कार्यक्रम हा साधारणत: ४५ दिवसाचा असतो. मात्र निवडणूक आयोगाने केवळ २५ दिवसाचाच कार्यक्रम घोषित केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नऊ जिल्हे येतात. १३ तारखेला नामांकन अर्जाची छाननी झाल्यानंतर केवळ १७ दिवसात इतक्या जिल्ह्यात संपर्क कसा करणार, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही निवेदन देणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

 

राज्यात आणीबाणी आहे असेच घोषित करा

राज्यात सत्तेत असलेल्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्याबाबत काहीही म्हटले तरी ते चालते. पण तुम्हाला मात्र कुणीच काही म्हणायचे नाही. असे असेल तर एकदाचे घोषितच करा की महाराष्ट्रात आणीबाणी आहे. राज्यातील जनता दंडुकेशाही सहन करणार नाही, या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

सरकारकडून मराठा आणि ओबीसीत वाद लावण्याचा प्रयत्न

आमची सत्ता असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले होते. आम्ही न्यायालयातदेखील आरक्षण टिकविले. मात्र महाविकास आघाडीला ते करता आले नाही. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी त्यांची गत झाली आहे. जातीयवाद निर्माण करून सरकार चालविणे हेच त्यांचे धोरण आहे. सरकारकडूनच ओबीसी व मराठ्यांमध्ये वाद लावण्यात येत आहे. मंत्री असलेले विजय वडेट्टीवार हेच दररोज ओबीसींच्या समर्थनार्थ वक्तव्य करत आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी लावला.

 

मिठागरावर घाला घालण्याचाच प्रकार

कांजूरमार्ग येथे मेट्रोचे कारशेड जेथे उभारणार आहे ती मिठागाराची जागा आहे. मिठागरे संपल्याने पर्यावरणाला धोका आहे. मुळात ती केंद्राची जागा आहे. आम्ही २०१५ मध्ये गरिबांच्या घरांसाठी पर्यावरणाच्या कारणामुळेच ती मिळाली नव्हती. सत्ताधारी आरेचे जंगल वाचवायला निघाले होते. मात्र दुसरीकडे ते मिठागारावर घाला घालत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMediaमाध्यमे