शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

मतदारयाद्याच नाहीत, मग निवडणुकीची घाई का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 20:35 IST

Chandrakant Patil, media, Nagpur news

ठळक मुद्देआयोगाकडून अपेक्षेपेक्षा अगोदरच घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका मार्च महिन्यात होतील, असे वाटले होते. इतक्या लवकर त्यांची घोषणा अपेक्षित नव्हती. अद्याप मतदार याद्यांची घोषणा व्हायची आहे. अशास्थितीत निवडणुकीची घाई का करण्यात आली, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. मंगळवारी दुपारी त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा एकूण कार्यक्रम हा साधारणत: ४५ दिवसाचा असतो. मात्र निवडणूक आयोगाने केवळ २५ दिवसाचाच कार्यक्रम घोषित केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नऊ जिल्हे येतात. १३ तारखेला नामांकन अर्जाची छाननी झाल्यानंतर केवळ १७ दिवसात इतक्या जिल्ह्यात संपर्क कसा करणार, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही निवेदन देणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

 

राज्यात आणीबाणी आहे असेच घोषित करा

राज्यात सत्तेत असलेल्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्याबाबत काहीही म्हटले तरी ते चालते. पण तुम्हाला मात्र कुणीच काही म्हणायचे नाही. असे असेल तर एकदाचे घोषितच करा की महाराष्ट्रात आणीबाणी आहे. राज्यातील जनता दंडुकेशाही सहन करणार नाही, या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

सरकारकडून मराठा आणि ओबीसीत वाद लावण्याचा प्रयत्न

आमची सत्ता असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले होते. आम्ही न्यायालयातदेखील आरक्षण टिकविले. मात्र महाविकास आघाडीला ते करता आले नाही. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी त्यांची गत झाली आहे. जातीयवाद निर्माण करून सरकार चालविणे हेच त्यांचे धोरण आहे. सरकारकडूनच ओबीसी व मराठ्यांमध्ये वाद लावण्यात येत आहे. मंत्री असलेले विजय वडेट्टीवार हेच दररोज ओबीसींच्या समर्थनार्थ वक्तव्य करत आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी लावला.

 

मिठागरावर घाला घालण्याचाच प्रकार

कांजूरमार्ग येथे मेट्रोचे कारशेड जेथे उभारणार आहे ती मिठागाराची जागा आहे. मिठागरे संपल्याने पर्यावरणाला धोका आहे. मुळात ती केंद्राची जागा आहे. आम्ही २०१५ मध्ये गरिबांच्या घरांसाठी पर्यावरणाच्या कारणामुळेच ती मिळाली नव्हती. सत्ताधारी आरेचे जंगल वाचवायला निघाले होते. मात्र दुसरीकडे ते मिठागारावर घाला घालत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMediaमाध्यमे