शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

मतदारयाद्याच नाहीत, मग निवडणुकीची घाई का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 20:35 IST

Chandrakant Patil, media, Nagpur news

ठळक मुद्देआयोगाकडून अपेक्षेपेक्षा अगोदरच घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका मार्च महिन्यात होतील, असे वाटले होते. इतक्या लवकर त्यांची घोषणा अपेक्षित नव्हती. अद्याप मतदार याद्यांची घोषणा व्हायची आहे. अशास्थितीत निवडणुकीची घाई का करण्यात आली, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. मंगळवारी दुपारी त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा एकूण कार्यक्रम हा साधारणत: ४५ दिवसाचा असतो. मात्र निवडणूक आयोगाने केवळ २५ दिवसाचाच कार्यक्रम घोषित केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नऊ जिल्हे येतात. १३ तारखेला नामांकन अर्जाची छाननी झाल्यानंतर केवळ १७ दिवसात इतक्या जिल्ह्यात संपर्क कसा करणार, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही निवेदन देणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

 

राज्यात आणीबाणी आहे असेच घोषित करा

राज्यात सत्तेत असलेल्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्याबाबत काहीही म्हटले तरी ते चालते. पण तुम्हाला मात्र कुणीच काही म्हणायचे नाही. असे असेल तर एकदाचे घोषितच करा की महाराष्ट्रात आणीबाणी आहे. राज्यातील जनता दंडुकेशाही सहन करणार नाही, या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

सरकारकडून मराठा आणि ओबीसीत वाद लावण्याचा प्रयत्न

आमची सत्ता असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले होते. आम्ही न्यायालयातदेखील आरक्षण टिकविले. मात्र महाविकास आघाडीला ते करता आले नाही. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी त्यांची गत झाली आहे. जातीयवाद निर्माण करून सरकार चालविणे हेच त्यांचे धोरण आहे. सरकारकडूनच ओबीसी व मराठ्यांमध्ये वाद लावण्यात येत आहे. मंत्री असलेले विजय वडेट्टीवार हेच दररोज ओबीसींच्या समर्थनार्थ वक्तव्य करत आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी लावला.

 

मिठागरावर घाला घालण्याचाच प्रकार

कांजूरमार्ग येथे मेट्रोचे कारशेड जेथे उभारणार आहे ती मिठागाराची जागा आहे. मिठागरे संपल्याने पर्यावरणाला धोका आहे. मुळात ती केंद्राची जागा आहे. आम्ही २०१५ मध्ये गरिबांच्या घरांसाठी पर्यावरणाच्या कारणामुळेच ती मिळाली नव्हती. सत्ताधारी आरेचे जंगल वाचवायला निघाले होते. मात्र दुसरीकडे ते मिठागारावर घाला घालत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMediaमाध्यमे