शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयाद्याच नाहीत, मग निवडणुकीची घाई का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 20:35 IST

Chandrakant Patil, media, Nagpur news

ठळक मुद्देआयोगाकडून अपेक्षेपेक्षा अगोदरच घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका मार्च महिन्यात होतील, असे वाटले होते. इतक्या लवकर त्यांची घोषणा अपेक्षित नव्हती. अद्याप मतदार याद्यांची घोषणा व्हायची आहे. अशास्थितीत निवडणुकीची घाई का करण्यात आली, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. मंगळवारी दुपारी त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा एकूण कार्यक्रम हा साधारणत: ४५ दिवसाचा असतो. मात्र निवडणूक आयोगाने केवळ २५ दिवसाचाच कार्यक्रम घोषित केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नऊ जिल्हे येतात. १३ तारखेला नामांकन अर्जाची छाननी झाल्यानंतर केवळ १७ दिवसात इतक्या जिल्ह्यात संपर्क कसा करणार, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही निवेदन देणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

 

राज्यात आणीबाणी आहे असेच घोषित करा

राज्यात सत्तेत असलेल्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्याबाबत काहीही म्हटले तरी ते चालते. पण तुम्हाला मात्र कुणीच काही म्हणायचे नाही. असे असेल तर एकदाचे घोषितच करा की महाराष्ट्रात आणीबाणी आहे. राज्यातील जनता दंडुकेशाही सहन करणार नाही, या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

सरकारकडून मराठा आणि ओबीसीत वाद लावण्याचा प्रयत्न

आमची सत्ता असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले होते. आम्ही न्यायालयातदेखील आरक्षण टिकविले. मात्र महाविकास आघाडीला ते करता आले नाही. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी त्यांची गत झाली आहे. जातीयवाद निर्माण करून सरकार चालविणे हेच त्यांचे धोरण आहे. सरकारकडूनच ओबीसी व मराठ्यांमध्ये वाद लावण्यात येत आहे. मंत्री असलेले विजय वडेट्टीवार हेच दररोज ओबीसींच्या समर्थनार्थ वक्तव्य करत आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी लावला.

 

मिठागरावर घाला घालण्याचाच प्रकार

कांजूरमार्ग येथे मेट्रोचे कारशेड जेथे उभारणार आहे ती मिठागाराची जागा आहे. मिठागरे संपल्याने पर्यावरणाला धोका आहे. मुळात ती केंद्राची जागा आहे. आम्ही २०१५ मध्ये गरिबांच्या घरांसाठी पर्यावरणाच्या कारणामुळेच ती मिळाली नव्हती. सत्ताधारी आरेचे जंगल वाचवायला निघाले होते. मात्र दुसरीकडे ते मिठागारावर घाला घालत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMediaमाध्यमे