शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

औषधांच्या स्ट्रीपमध्ये गोळ्याच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:06 IST

डॉक्टरांनी एखाद्या आजारासाठी लिहून दिलेल्या औषध स्ट्रीपच्या (१० गोळ्या) स्वरुपात रुग्णाने घरी नेल्यानंतर त्यात गोळ्याच नसल्यास रुग्णांना कसा मनस्ताप होतो, याचा प्रत्यक्ष एका नागरिकाला आला. त्यांना गुरुवारी रात्री आणि सकाळी औषधाविना राहावे लागले.

ठळक मुद्देरुग्णाला मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉक्टरांनी एखाद्या आजारासाठी लिहून दिलेल्या औषध स्ट्रीपच्या (१० गोळ्या) स्वरुपात रुग्णाने घरी नेल्यानंतर त्यात गोळ्याच नसल्यास रुग्णांना कसा मनस्ताप होतो, याचा प्रत्यक्ष एका नागरिकाला आला. त्यांना गुरुवारी रात्री आणि सकाळी औषधाविना राहावे लागले.प्राप्त माहितीनुसार, एका नागरिकाने मुंबईतील ज्युपिटर बायोलॅब प्रा.लि. कंपनीच्या अ‍ॅसिडिटी आजारावरील ‘ज्युपिसिड-४०’ या १० गोळ्यांच्या तीन स्ट्रीप (एक स्ट्रीप १० गोळ्या) आणि सोबतच अन्य अशी एकूण १०२९ रुपये किमतीची औषधे गुरुवारी सदर येथील एका फार्मसीतून खरेदी केली. फार्मसिस्टवर विश्वास ठेवून त्यांनी ही औषधे घरी नेली. औषध सेवन करण्याची वेळ झाली तेव्हा पॅक स्ट्रीपमध्ये एकही गोळी नव्हती. रात्र झाल्याने फार्मसीमध्ये परत जाणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांना औषधाविना राहावे लागले. गोळी न घेतल्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास रात्री आणि सकाळी उद्भवला. अ‍ॅसिडिटीची गोळी असल्यामुळे सहन केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारात फार्मसिस्टचा काहीही दोष नाही. उत्पादक ते वितरक आणि विक्रेत्यांच्या माध्यमातून विकण्यात येणाऱ्या गोळ्या रुग्णांपर्यंत पोहोचतात. रुग्ण औषधे खरेदी करताना स्ट्रीमध्ये गोळ्या आहेत की नाही हे तपासून पाहात नाहीत. पण असा प्रकार घडल्यानंतर रुग्ण थेट फार्मसिस्टला दोष देतो. हा प्रकार रुग्णांना मनस्ताप देणारा आहे. अशा प्रकारासाठी कंपनीची थेट चौकशी करावी, अशी मागणी नागरिकाने लोकमतशी बोलताना केली.

टॅग्स :medicineऔषधंnagpurनागपूर