शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

-तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:06 PM

जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘डील’ नव्हे तर मोठा भ्रष्टाचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल विमान करारावरून काँग्रेसने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हा करार नाही तर एक मोठा भ्रष्टाचारच आहे. जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. नागपुरात ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी रविवारी वरील वक्तव्य केले.‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमाला ‘नागपूर प्रेस क्लब’चे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, उपाध्यक्ष जोसेफ राव, सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी, संजय तिवारी, विशाल मुत्तेमवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. भारत व फ्रान्स यांच्यात २००८ मध्ये झालेल्या सुरक्षा कराराचा हवाला देऊन राफेल विमान खरेदीचा तपशील देण्यास मोदी सरकारने नकार दिला आहे. अगोदर केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी प्रत्येक विमान ६७० कोटी रुपयांच्या किमतीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर नेमकी किंमत सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले व अखेर गोपनीयतेचा हवाला देत रक्षामंत्र्यांनी काहीच माहिती दिली नाही. जो फायदा देशातील ‘हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड’ला मिळायला हवा होता, तो आता फ्रान्समधील ‘डेसॉल्ट’ व ‘रिलायन्स डिफेन्स इंडस्ट्रीज’ला मिळणार आहे. जी कंपनी सायकलदेखील बनवत नाही, तिला विमान बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या एकूण करारामुळे बाहेरील कंपन्यांना विविध माध्यमातून एक लाख करोड रुपयांचा फायदा होणार आहे. हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाही तर काय, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. राफेल प्रकरणाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह असून, संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी संचालन केले तर जोसेफ राव यांनी आभार मानले.

‘त्यांच्या’साठी ‘सोशल मीडिया’च संहारक ठरेल२०१९ मधील निवडणुकींच्या प्रचारासाठी आम्ही केवळ ‘सोशल मीडिया’वर अवलंबून नाही. आम्ही सर्व माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपाच्या ‘ट्रोल आर्मी’वर त्यांच्याच मंत्री सुषमा स्वराज यांनी टीका केली होती. ज्या ‘सोशल मीडिया’मुळे हे लोक वर आले, तेच माध्यम त्यांच्यासाठी संहारक ठरेल, असे प्रतिपादनदेखील प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.

शिवसेनेवर साधला निशाणाराज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांचा खरा चेहरा समोर आला. महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी असलेल्या एका पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करण्यात येते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी तटस्थ राहून ते आपल्या जबाबदारीपासून दूर पळाले, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेचे थेट नाव न घेता निशाणा साधला. राफेल करारामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा काही केंद्रीय मंत्र्यांचादेखील सहभाग असल्याने त्यांच्यावरदेखील जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेदेखील त्या म्हणाल्या.नेमके नुकसान तरी किती?राफेल करारामुळे देशाचे नेमके किती नुकसान झाले, याबाबत काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याची बाब यावेळी समोर आली. या करारामुळे देशाचे थेट ४१ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. तर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी मागील आठवड्यात यामुळे ४८ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. याबाबत चतुर्वेदी यांना विचारणा केली असता सरकारकडून दिलेल्या आकडेवारीवरून आम्ही नुकसान सांगत असल्याचे स्पष्ट केले. मात्र सरकारने आकडेवारीच जाहीर केली नसल्याने नेमके नुकसान झाले तरी किती, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस