शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

-तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:06 IST

जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘डील’ नव्हे तर मोठा भ्रष्टाचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल विमान करारावरून काँग्रेसने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हा करार नाही तर एक मोठा भ्रष्टाचारच आहे. जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. नागपुरात ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी रविवारी वरील वक्तव्य केले.‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमाला ‘नागपूर प्रेस क्लब’चे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, उपाध्यक्ष जोसेफ राव, सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी, संजय तिवारी, विशाल मुत्तेमवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. भारत व फ्रान्स यांच्यात २००८ मध्ये झालेल्या सुरक्षा कराराचा हवाला देऊन राफेल विमान खरेदीचा तपशील देण्यास मोदी सरकारने नकार दिला आहे. अगोदर केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी प्रत्येक विमान ६७० कोटी रुपयांच्या किमतीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर नेमकी किंमत सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले व अखेर गोपनीयतेचा हवाला देत रक्षामंत्र्यांनी काहीच माहिती दिली नाही. जो फायदा देशातील ‘हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड’ला मिळायला हवा होता, तो आता फ्रान्समधील ‘डेसॉल्ट’ व ‘रिलायन्स डिफेन्स इंडस्ट्रीज’ला मिळणार आहे. जी कंपनी सायकलदेखील बनवत नाही, तिला विमान बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या एकूण करारामुळे बाहेरील कंपन्यांना विविध माध्यमातून एक लाख करोड रुपयांचा फायदा होणार आहे. हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाही तर काय, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. राफेल प्रकरणाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह असून, संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी संचालन केले तर जोसेफ राव यांनी आभार मानले.

‘त्यांच्या’साठी ‘सोशल मीडिया’च संहारक ठरेल२०१९ मधील निवडणुकींच्या प्रचारासाठी आम्ही केवळ ‘सोशल मीडिया’वर अवलंबून नाही. आम्ही सर्व माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपाच्या ‘ट्रोल आर्मी’वर त्यांच्याच मंत्री सुषमा स्वराज यांनी टीका केली होती. ज्या ‘सोशल मीडिया’मुळे हे लोक वर आले, तेच माध्यम त्यांच्यासाठी संहारक ठरेल, असे प्रतिपादनदेखील प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.

शिवसेनेवर साधला निशाणाराज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांचा खरा चेहरा समोर आला. महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी असलेल्या एका पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करण्यात येते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी तटस्थ राहून ते आपल्या जबाबदारीपासून दूर पळाले, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेचे थेट नाव न घेता निशाणा साधला. राफेल करारामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा काही केंद्रीय मंत्र्यांचादेखील सहभाग असल्याने त्यांच्यावरदेखील जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेदेखील त्या म्हणाल्या.नेमके नुकसान तरी किती?राफेल करारामुळे देशाचे नेमके किती नुकसान झाले, याबाबत काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याची बाब यावेळी समोर आली. या करारामुळे देशाचे थेट ४१ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. तर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी मागील आठवड्यात यामुळे ४८ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. याबाबत चतुर्वेदी यांना विचारणा केली असता सरकारकडून दिलेल्या आकडेवारीवरून आम्ही नुकसान सांगत असल्याचे स्पष्ट केले. मात्र सरकारने आकडेवारीच जाहीर केली नसल्याने नेमके नुकसान झाले तरी किती, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस