शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

-तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:06 IST

जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘डील’ नव्हे तर मोठा भ्रष्टाचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल विमान करारावरून काँग्रेसने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हा करार नाही तर एक मोठा भ्रष्टाचारच आहे. जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. नागपुरात ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी रविवारी वरील वक्तव्य केले.‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमाला ‘नागपूर प्रेस क्लब’चे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, उपाध्यक्ष जोसेफ राव, सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी, संजय तिवारी, विशाल मुत्तेमवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. भारत व फ्रान्स यांच्यात २००८ मध्ये झालेल्या सुरक्षा कराराचा हवाला देऊन राफेल विमान खरेदीचा तपशील देण्यास मोदी सरकारने नकार दिला आहे. अगोदर केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी प्रत्येक विमान ६७० कोटी रुपयांच्या किमतीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर नेमकी किंमत सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले व अखेर गोपनीयतेचा हवाला देत रक्षामंत्र्यांनी काहीच माहिती दिली नाही. जो फायदा देशातील ‘हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड’ला मिळायला हवा होता, तो आता फ्रान्समधील ‘डेसॉल्ट’ व ‘रिलायन्स डिफेन्स इंडस्ट्रीज’ला मिळणार आहे. जी कंपनी सायकलदेखील बनवत नाही, तिला विमान बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या एकूण करारामुळे बाहेरील कंपन्यांना विविध माध्यमातून एक लाख करोड रुपयांचा फायदा होणार आहे. हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाही तर काय, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. राफेल प्रकरणाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह असून, संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी संचालन केले तर जोसेफ राव यांनी आभार मानले.

‘त्यांच्या’साठी ‘सोशल मीडिया’च संहारक ठरेल२०१९ मधील निवडणुकींच्या प्रचारासाठी आम्ही केवळ ‘सोशल मीडिया’वर अवलंबून नाही. आम्ही सर्व माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपाच्या ‘ट्रोल आर्मी’वर त्यांच्याच मंत्री सुषमा स्वराज यांनी टीका केली होती. ज्या ‘सोशल मीडिया’मुळे हे लोक वर आले, तेच माध्यम त्यांच्यासाठी संहारक ठरेल, असे प्रतिपादनदेखील प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.

शिवसेनेवर साधला निशाणाराज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांचा खरा चेहरा समोर आला. महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी असलेल्या एका पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करण्यात येते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी तटस्थ राहून ते आपल्या जबाबदारीपासून दूर पळाले, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेचे थेट नाव न घेता निशाणा साधला. राफेल करारामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा काही केंद्रीय मंत्र्यांचादेखील सहभाग असल्याने त्यांच्यावरदेखील जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेदेखील त्या म्हणाल्या.नेमके नुकसान तरी किती?राफेल करारामुळे देशाचे नेमके किती नुकसान झाले, याबाबत काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याची बाब यावेळी समोर आली. या करारामुळे देशाचे थेट ४१ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. तर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी मागील आठवड्यात यामुळे ४८ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. याबाबत चतुर्वेदी यांना विचारणा केली असता सरकारकडून दिलेल्या आकडेवारीवरून आम्ही नुकसान सांगत असल्याचे स्पष्ट केले. मात्र सरकारने आकडेवारीच जाहीर केली नसल्याने नेमके नुकसान झाले तरी किती, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस