शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

- तर चॅरिटी वकिलांवर आत्महत्येची वेळ येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 21:16 IST

धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज आणखी काही महिने बंद राहिल्यास या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या वकिलांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत चॅरिटी बार असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : चॅरिटी बार असोसिएशनने मांडली कैफियत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज आणखी काही महिने बंद राहिल्यास या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या वकिलांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत चॅरिटी बार असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.कोरोना संक्रमणामुळे धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज गेल्या दोन महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय करणाºया वकिलांचे अर्थार्जन थांबले आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. वकिली हा प्रतिष्ठित व्यवसाय आहे आणि वकिलांना समाजामध्ये मानाचे स्थान असते. त्यांच्याकडे सन्मानाने बघितले जाते. परिणामी, वकील रेशनकरिता रांगेत उभे राहू शकत नाही किंवा कुणाकडे मदतीसाठी हात पसरू शकत नाही. कोरोनामुळे वकिलांवर अत्यंत वाईट परिस्थिती ओढवली आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वकिलांचे अर्थार्जन सुरू होण्यासाठी धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज तातडीने सुरू करण्यात यावे. वकिलांना स्वत:च्या जबाबदारींची जाणिव आहे. त्यामुळे न्यायिक कामकाज सुरू झाल्यानंतर ते शारीरिक अंतर व अन्य नियमांचे काटेकोर पालन करतील. तसेच, ते पक्षकार व इतरांनाही नियमांचे पालन करायला लावतील असे संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद गोडे व सचिव श्रीगणेश अभ्यंकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :advocateवकिलnagpurनागपूर