शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

- तर चॅरिटी वकिलांवर आत्महत्येची वेळ येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 21:16 IST

धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज आणखी काही महिने बंद राहिल्यास या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या वकिलांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत चॅरिटी बार असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : चॅरिटी बार असोसिएशनने मांडली कैफियत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज आणखी काही महिने बंद राहिल्यास या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या वकिलांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत चॅरिटी बार असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.कोरोना संक्रमणामुळे धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज गेल्या दोन महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय करणाºया वकिलांचे अर्थार्जन थांबले आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. वकिली हा प्रतिष्ठित व्यवसाय आहे आणि वकिलांना समाजामध्ये मानाचे स्थान असते. त्यांच्याकडे सन्मानाने बघितले जाते. परिणामी, वकील रेशनकरिता रांगेत उभे राहू शकत नाही किंवा कुणाकडे मदतीसाठी हात पसरू शकत नाही. कोरोनामुळे वकिलांवर अत्यंत वाईट परिस्थिती ओढवली आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वकिलांचे अर्थार्जन सुरू होण्यासाठी धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज तातडीने सुरू करण्यात यावे. वकिलांना स्वत:च्या जबाबदारींची जाणिव आहे. त्यामुळे न्यायिक कामकाज सुरू झाल्यानंतर ते शारीरिक अंतर व अन्य नियमांचे काटेकोर पालन करतील. तसेच, ते पक्षकार व इतरांनाही नियमांचे पालन करायला लावतील असे संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद गोडे व सचिव श्रीगणेश अभ्यंकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :advocateवकिलnagpurनागपूर