शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तर भारतीय अर्थव्यवस्थेला होईल ३० टक्के लाभ ; हेमंत चौधरींचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:06 IST

प्लास्टिकच्या समस्येसह जलप्रदुषण व वायुप्रदुषणाची गंभीर समस्या देशात आहे. त्यावर केंद्र आणि विविध राज्यातील शासनाद्वारे राबविणाऱ्या योजनांवर कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र हा मोठा आजार झाल्यानंतर उपचार करण्यासारखा प्रकार असून त्याने समस्या सुटण्याची शक्यता नाही. त्यासाठी आजार होउच नये म्हणून प्रतिबंध घालणे हा उपाय करणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापन व प्रदुषणाची समस्या सोडविण्यासाठी ‘उत्पादन-वापर-पुनर्वापर-रिसायकल’ ही वतुळाकार अर्थव्यवस्था स्वीकारावी लागेल. याद्वारे प्रदुषणाची समस्या सुटेलच, व्यवस्थापनाचा खर्च वाचेल व देशाच्या अर्थव्यवस्थेत ३० टक्के भर पडेल, असा विश्वास ऑस्ट्रेलिया अनिवासी भारतीय हेमंत चौधरी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देभारतात घनकचरा व्यवस्थापनासाठी समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिकच्या समस्येसह जलप्रदुषण व वायुप्रदुषणाची गंभीर समस्या देशात आहे. त्यावर केंद्र आणि विविध राज्यातील शासनाद्वारे राबविणाऱ्या योजनांवर कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र हा मोठा आजार झाल्यानंतर उपचार करण्यासारखा प्रकार असून त्याने समस्या सुटण्याची शक्यता नाही. त्यासाठी आजार होउच नये म्हणून प्रतिबंध घालणे हा उपाय करणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापन व प्रदुषणाची समस्या सोडविण्यासाठी ‘उत्पादन-वापर-पुनर्वापर-रिसायकल’ ही वतुळाकार अर्थव्यवस्था स्वीकारावी लागेल. याद्वारे प्रदुषणाची समस्या सुटेलच, व्यवस्थापनाचा खर्च वाचेल व देशाच्या अर्थव्यवस्थेत ३० टक्के भर पडेल, असा विश्वास ऑस्ट्रेलिया अनिवासी भारतीय हेमंत चौधरी यांनी व्यक्त केला.हेमंत चौधरी मूळचे नागपूरचे रहिवासी असून गुरुवारी वनराई फाउंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘सर्क्युलर इकानॉमी इन इंडिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडिलेडजवळील परिसरात त्यांच्या संस्थेद्वारे राबविलेल्या प्रकल्पाबाबत त्यांनी प्रोजेक्टरवर सविस्तर माहिती दिली. वर्तमानात हिरवागार दिसणारा हा प्रदेश जगातील मोठा वाळवंटीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. पाण्याचे दुर्भिक्ष, भूमीप्रदुषणासारख्या समस्या येथेही भीषण होत्या. परिसरातून वाहणाऱ्या मुरे डार्लिंग नदीचे प्रदुषित पाणी वापरणेही शक्य नव्हते. मात्र येथील धोरण निर्माते, प्रशासनिक संस्था, कायदे अमलात आणणारे, तंत्रज्ञान पुरवठादार, उद्योजक, निवेशक, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित समन्वयाने योजना आखली. त्यातून जलसंचयानाचे, नियमन, घनकचरा व्यवस्थापन, रिसायकल युनिटचे अनेक प्रकल्प राबविले. पाण्याचा कमीतकमी वापर करून सौर उर्जेवर शेती सुरू केली. आज हा प्रदेश निवासाच्या दृष्टीने सर्वात सुंदर प्रदेश म्हणून नावाजला जात असल्याचे त्यांनी सांगितले.भारतात अनेक समस्या असल्या तरी हे आव्हान पूर्ण करणे कठीण नसल्याचे ते म्हणाले. त्यासाठी प्रत्येकाची मानसिकता निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मात्र प्रशासनिक संस्था, सरकार व लोक गंभीरतेने तसे करीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. २०१२ साली गुजरातच्या अहमदाबाद येथे असा प्रकल्प राबविण्याची योजना आखण्यात आली. मात्र कागदी घोडे चालविण्यापुढे काहीच न झाल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ तंत्रज्ञानाने ते शक्य नाही. भारतातील व इतर देशातील कचऱ्यात फरक आहे. त्याचा अभ्यास करून तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार, प्रशासन, एनजीओ व लोकांनी एकत्रित काम करण्याची मानसिकता तयार होणे आवश्यक असल्याचे मत चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी गिरीश गांधी, गोपाळराव ठोसर, शशिकांत चौधरी, ज्युतिका चौधरी आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Vanraiवनराईnagpurनागपूर