शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

तर निवडणुकीत सरकारचे नाक दाबू : गोवारी समाजाचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:05 IST

११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारींना अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात अध्यादेश काढायचा आहे. ९० दिवस न्यायालयाचा निर्णय होऊन झाले आहे. मात्र सरकारच्या हालचाली मंदावल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गोवारींच्या संदर्भात निर्णय न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत गोवारी समाज सरकारचे नाक दाबल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा गोवारी समाजाने श्रद्धांजली सभेत दिला.

ठळक मुद्देश्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लाखो गोवारी बांधव स्मारकावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारींना अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात अध्यादेश काढायचा आहे. ९० दिवस न्यायालयाचा निर्णय होऊन झाले आहे. मात्र सरकारच्या हालचाली मंदावल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गोवारींच्या संदर्भात निर्णय न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत गोवारी समाज सरकारचे नाक दाबल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा गोवारी समाजाने श्रद्धांजली सभेत दिला. 

आदिवासी गोवारी समाज संघटना व श्रद्धांजली सभेचे आयोजक कैलास राऊत यांच्या अध्यक्षतेत श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या सभेला आमदार डॉ. परिणय फुके, झेड. आर. दुधकवर, शालिक नेवारे, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे, हेमराज नेवारे, सुरेंद्र राऊत, दामोदर नेवारे, प्रभू काळसर्पे, संजय हांडे, विलास यसनसुरे, बबलू राऊत आदी उपस्थित होते. 
२४ एप्रिल १९८४ चा जी.आर. रद्द करून ‘गोंडगोवारी’ यात कॉमा द्यावा, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाचा भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मोर्चाला भेट द्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. मोर्चा त्यासाठी अडून बसला होता. मोर्चेकऱ्यांचा संताप वाढत होता, अशात पोलिसांकडून लाठीमार सुरू झाला. हवेत फायरिंग झाले. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या घटनेनंतर शासनाने गोवारी समाजाला एसबीसीमध्ये २ टक्के आरक्षण दिले पण त्यातही ३९ उच्च जातींचा 
समावेश केल्याने गोवारींना त्याचा फायदा झाला नाही. शासनाने शहीद गोवारी बांधवांच्या स्मृतीत झिरो माईल चौकात गोवारी शहीद स्मारक उभारले. दरवर्षी २३ नोव्हेंबरला विदर्भासह राज्यातील विविध भागातून गोवारी बांधव स्मारकावर येतात. चेंगराचेंगरीत शहीद झालेल्या आपल्या आप्तेष्टांना साश्रुनयनाने श्रद्धांजली अर्पण करतात आणि या घटनेच्या आठवणी मनात साठवून आपापल्या गावी परत जातात.तर खरी श्रद्धांजली ठरेल 
न्यायालयाचा निकालानंतर गोवारी समाजाची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने गोवारी बांधव स्मारकावर आले होते. श्रद्धांजली कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार, काहीतरी घोषणा करणार अशी अपेक्षा गोवारी बांधवांना होती. अख्खा समाज स्मारक परिसरात एकवटला होता. पण काही कारणास्तव मुख्यमंत्री येऊ शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी समाजबांधवांच्या अपेक्षा लक्षात घेता, लवकरात लवकर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास शहीद गोवारींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी व्यक्त केली.५० हजारावर गोवारी बांधवांनी दिली श्रद्धांजली 
२३ नोव्हेंबर हा दिवस गोवारी बांधव काळा दिवस म्हणून पाळतात. विदर्भातील कानाकोपऱ्यातून दुर्गम भागातून गोवारी बांधव नागपुरातील शहीद स्मारकावर पोहचतात. यावर्षी ५० हजारावर गोवारी बांधव स्मारकावर जमले होते. घटनास्थळी बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. अतिशय शांततेत साश्रुनयनाने शहिदांना नमन केले. घटनेच्या आठवणी ताज्या झाल्याने अनेकांचे डोळे पाणावले. पण समाज मौन होता. न्यायाच्या प्रतीक्षेत सरकारपुढे आपल्या भावना व्यक्त करून शांततेत आपापल्या गावी परतला.गडकरींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्मारकस्थळी जाऊन ११४ शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, गुड्डू त्रिवेदी, हाजी अब्दुल कादिर, अर्चना डेहणकर, रमेश वानखेडे, चंदन गोस्वामी यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :nagpurनागपूर