शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

तर निवडणुकीत सरकारचे नाक दाबू : गोवारी समाजाचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:05 IST

११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारींना अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात अध्यादेश काढायचा आहे. ९० दिवस न्यायालयाचा निर्णय होऊन झाले आहे. मात्र सरकारच्या हालचाली मंदावल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गोवारींच्या संदर्भात निर्णय न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत गोवारी समाज सरकारचे नाक दाबल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा गोवारी समाजाने श्रद्धांजली सभेत दिला.

ठळक मुद्देश्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लाखो गोवारी बांधव स्मारकावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारींना अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात अध्यादेश काढायचा आहे. ९० दिवस न्यायालयाचा निर्णय होऊन झाले आहे. मात्र सरकारच्या हालचाली मंदावल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गोवारींच्या संदर्भात निर्णय न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत गोवारी समाज सरकारचे नाक दाबल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा गोवारी समाजाने श्रद्धांजली सभेत दिला. 

आदिवासी गोवारी समाज संघटना व श्रद्धांजली सभेचे आयोजक कैलास राऊत यांच्या अध्यक्षतेत श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या सभेला आमदार डॉ. परिणय फुके, झेड. आर. दुधकवर, शालिक नेवारे, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे, हेमराज नेवारे, सुरेंद्र राऊत, दामोदर नेवारे, प्रभू काळसर्पे, संजय हांडे, विलास यसनसुरे, बबलू राऊत आदी उपस्थित होते. 
२४ एप्रिल १९८४ चा जी.आर. रद्द करून ‘गोंडगोवारी’ यात कॉमा द्यावा, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाचा भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मोर्चाला भेट द्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. मोर्चा त्यासाठी अडून बसला होता. मोर्चेकऱ्यांचा संताप वाढत होता, अशात पोलिसांकडून लाठीमार सुरू झाला. हवेत फायरिंग झाले. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या घटनेनंतर शासनाने गोवारी समाजाला एसबीसीमध्ये २ टक्के आरक्षण दिले पण त्यातही ३९ उच्च जातींचा 
समावेश केल्याने गोवारींना त्याचा फायदा झाला नाही. शासनाने शहीद गोवारी बांधवांच्या स्मृतीत झिरो माईल चौकात गोवारी शहीद स्मारक उभारले. दरवर्षी २३ नोव्हेंबरला विदर्भासह राज्यातील विविध भागातून गोवारी बांधव स्मारकावर येतात. चेंगराचेंगरीत शहीद झालेल्या आपल्या आप्तेष्टांना साश्रुनयनाने श्रद्धांजली अर्पण करतात आणि या घटनेच्या आठवणी मनात साठवून आपापल्या गावी परत जातात.तर खरी श्रद्धांजली ठरेल 
न्यायालयाचा निकालानंतर गोवारी समाजाची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने गोवारी बांधव स्मारकावर आले होते. श्रद्धांजली कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार, काहीतरी घोषणा करणार अशी अपेक्षा गोवारी बांधवांना होती. अख्खा समाज स्मारक परिसरात एकवटला होता. पण काही कारणास्तव मुख्यमंत्री येऊ शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी समाजबांधवांच्या अपेक्षा लक्षात घेता, लवकरात लवकर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास शहीद गोवारींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी व्यक्त केली.५० हजारावर गोवारी बांधवांनी दिली श्रद्धांजली 
२३ नोव्हेंबर हा दिवस गोवारी बांधव काळा दिवस म्हणून पाळतात. विदर्भातील कानाकोपऱ्यातून दुर्गम भागातून गोवारी बांधव नागपुरातील शहीद स्मारकावर पोहचतात. यावर्षी ५० हजारावर गोवारी बांधव स्मारकावर जमले होते. घटनास्थळी बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. अतिशय शांततेत साश्रुनयनाने शहिदांना नमन केले. घटनेच्या आठवणी ताज्या झाल्याने अनेकांचे डोळे पाणावले. पण समाज मौन होता. न्यायाच्या प्रतीक्षेत सरकारपुढे आपल्या भावना व्यक्त करून शांततेत आपापल्या गावी परतला.गडकरींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्मारकस्थळी जाऊन ११४ शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, गुड्डू त्रिवेदी, हाजी अब्दुल कादिर, अर्चना डेहणकर, रमेश वानखेडे, चंदन गोस्वामी यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :nagpurनागपूर