शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"...तर भाजपची व्यावसायिक संघटना होण्याची भिती"; आयात उमेदवारांना प्राधान्य देत असल्याने मुनगंटीवार नाराज, दिल्लीत भूमिका मांडणार

By योगेश पांडे | Updated: October 25, 2024 14:10 IST

"...जर असे प्रकार होत राहिले व प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले गेले तर पक्षाची सेवाभावी संघटना ही ओळख दूर होऊन व्यावसायिक संघटना अशीच प्रतिमा निर्माण होईल."

नागपूर : भाजपमध्ये काही जागांवर आयात उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून चंद्रपूर विधानसभेच्या जागेवर तर अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उघड नाराजी व्यक्त केली आहे. आयात उमेदवारांना प्राधान्य देत असल्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांची भावना मांडण्यासाठी ते रवाना झाले आहेत.

चंद्रपूर विधानसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असेल हे स्पष्ट झालेले नाही. किशोर जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून आहेत. तर मुनगंटीवार यांचे समर्थक ब्रिजभूषण पाझारे यांनीदेखील या जागेवर दावेदारी केली आहे. या जागेचा तिढा कायम असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. जोरगेवार यांचा पक्षप्रवेश झाला तर मुनगंटीवार यांचा त्याला विरोध राहणार आहे. जोरगेवार यांना विरोध करण्यासाठी मुनगंटीवार यांनी उघड पुढाकार घेतला आहे. दिल्लीला जाताना त्यांनी त्यांची भूमिका मांडली.  पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका हे वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिल्लीला जात आहे. चंद्रपूर विधानसभेत ज्याने पाच वर्ष काम केले त्याला तिकीट दिले पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटते. अन्यथा भविष्यात कुणीही पक्षासाठी काम करणार नाही. आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट दिले तर कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी निर्माण होईल. पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो नेत्यांचा अधिकार आहे. मात्र त्यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांची नाराजी पोहोचविली गेली पाहिजे. जर असे प्रकार होत राहिले व प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले गेले तर पक्षाची सेवाभावी संघटना ही ओळख दूर होऊन व्यावसायिक संघटना अशीच प्रतिमा निर्माण होईल.

सातशे कार्यकर्त्यांनी माझी भेट घेऊन त्यांची नाराजी मांडली. त्यांच्या आग्रहामुळेच मी दिल्लीत जात आहे. वारंवार निष्ठा व पक्ष बदलविणाऱ्यांना तिकीट दिली तर इतर कार्यकर्तेदेखील निष्ठा बदलवतील. चंद्रपुरात ब्रिजभुषण पाझारे हे १९९० पासून पक्षाचे काम करत आहेत. जर अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष राहिला नाही, तर चुकीचा संदेश जाईल. अशा स्थितीत पक्ष व कार्यकर्त्यांना संघटित ठेवणे कठीण जाईल. उमेदवार आयात करणे गुन्हा नाही. जेथे पक्ष कमकुवत आहे तेथे अशी पावले उचलली पाहिजे. पक्ष मजबूत असलेल्या मतदारसंघात असे करणे योग्य नाही. तेथील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलायच्या का असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा