शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

-तर 'रिकनेक्शन'साठी दुप्पट पैसे! वीज नियामक आयोगाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:14 IST

थकबाकीमुळे वीज कापली गेली तर पुन्हा कनेक्शन जोडून घेण्यासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागतील. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या दर वृद्धी याचिकेवर दिलेल्या निर्णयात रिकनेक्शन शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थकबाकीमुळे वीज कापली गेली तर पुन्हा कनेक्शन जोडून घेण्यासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागतील. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या दर वृद्धी याचिकेवर दिलेल्या निर्णयात रिकनेक्शन शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. महावितरणने वीज ग्राहकांना यापासून वाचण्यासाठी नियमितपणे वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे.जे वीज ग्राहक बिल भरत नाहीत, त्यांचे वीज कनेक्शन महावितरणतर्फे कापले जाते. थकीत रक्कम, दंड आणि रिकनेक्शन शुल्क भरल्यानंतर कापलेला वीजपुरवठा पुन्हा जोडला जातो. हे रिकनेक्शन शुल्क अनेक वर्षांपासून स्थिर होते. महावितरणने हे शुल्क वाढवण्याची मागणी केली होती, ती मंजूर करण्यात आली आहे. आता सिंगल फेज घरगुती ग्राहकांसाठी १०० रुपयांऐवजी २०० रुपये द्यावे लागतील. तर थ्री फेज कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी २०० रुपयांऐवजी ४०० रुपये मोजावे लागतील. हे शुल्क तेव्हाचे आहेत, जेव्हा वीज मीटरवरून कापण्यात येईल. जर थेट खांबावरून वीज कापली गेली तर सिंगल फेजसाठी १०० रुपयांच्या मोबदल्यात ३०० रुपये आणि थ्री फेजसाठी २०० नव्हे तर थेट ५०० रुपये भरावे लागतील. भूमिगत कनेक्शनसाठी आता हेच शुल्क द्यावे लागेल. एच.टी. कनेक्शन (औद्योगिक ग्राहक) यांच्यासाठी हे दर ८०० रुपयांवरून ३ हजार रुपये करण्यात आले आहे.मीटरची जागा बदलण्यासाठी लागणार हजार रुपयांपर्यंतचे शुल्कमीटरची जागा बदलण्यासाठी लागणाऱ्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. सध्या हे शुल्क ३५० रुपये होते. परंतु आयोगाने आता सिंगल फेज मीटरसाठी ३८५ रुपये शुल्क केले आहे. थ्री फेजसाठी हेच शुल्क १००० रुपये करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर