शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

कळमन्यात लाखोच्या फळांची चोरी : नारे-निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 20:59 IST

कळमना फळे बाजारात यंदाच्या हंगामात फळे चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या घटनांवर प्रशासकाला नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी आडतिया आणि व्यापाºयांनी फळांचा लिलाव बंद पाडून बाजारात प्रशासनाविरोधात नारे-निदर्शने केली.

ठळक मुद्देआडतिया, व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडला, कळमन्यात अस्वच्छतेचा कळस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना फळे बाजारात यंदाच्या हंगामात फळे चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या घटनांवर प्रशासकाला नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी आडतिया आणि व्यापाºयांनी फळांचा लिलाव बंद पाडून बाजारात प्रशासनाविरोधात नारे-निदर्शने केली.प्राप्त माहितीनुसार, दरवर्षी फळे चोरीच्या घटना घडतातच, पण यंदा यात वाढ झाली आहे. या संदर्भात प्रशासक राजेश भुसारी आणि कळमना पोलिसांना माहिती दिली आहे. यावर नियंत्रण आणण्यात दोघांनाही अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी नारे-निदर्शने करण्यात आली. त्यानंतरही फळे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांच्या कार्यालयात प्रशासक राजेश भुसारी, कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, आडतिये, व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चोरीच्या घटनांवर आळा घालण्याचे आश्वासन प्रशासक आणि पोलिसांनी दिले. त्यानंतरच लिलाव प्रक्रिया पार पडली.आनंद डोंगरे म्हणाले, एक टन मोसंबी ३० हजार रुपयांची होते. चिखली आणि लगतच्या भागातील असामाजिक तत्त्व व गुंड प्रवृत्तीचे लोक रात्री सुरक्षा रक्षक आणि शेतकऱ्यांना शस्त्रे दाखवून फळे चोरून नेतात. ते संख्येने जास्त असल्याने त्यांच्यावर आळा घालणे सुरक्षा रक्षकांनाही कठीण जाते. अशा घटनांची माहिती पोलिसांनाही दिली आहे. पण आतापर्यंत चोरटे सापडले नाहीत. तसे पाहिल्यास ५०० रुपयांचा कृषी माल सेस दिल्याविना कळमन्याच्या गेटबाहेर जात नाही. असे असताना चोरटे लाखोंचा माल चोरटे कसा घेऊन जातात, यावर प्रश्नचिन्ह आहे. प्रशासक आश्वासन देण्यापलीकडे काहीच करीत नाहीत. पाच वर्षांनंतर गेल्या महिन्यात कळमन्याच्या मुख्यदारातून ये-जा सुरू झाली आहे. चिखली गेटकडून चोरटे शस्त्राच्या जोरावर माल बाहेर नेतात. यात शेतकºयांचे जास्त नुकसान होते.बाजारात अस्वच्छताकळमन्यात संपूर्ण विदर्भासह नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यातून मोसंबी आणि संत्र्याची आवक वाढली आहे. मोसंबीचे जवळपास २०० आणि संत्र्याचे ५० ते ६० टेम्पो दररोज येत आहेत. त्यामुळे खराब माल बाजारात पडून राहतो. त्याची उचल करण्यात येत नसल्याने बाजारात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासकाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे फळे बाजारात अस्वच्छतेचा कळस झाल्याचे डोंगरे म्हणाले.बैठकीत १०० पेक्षा जास्त अडतिया, २५० व्यापारी आणि खरेदीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर