शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

कळमन्यात लाखोच्या फळांची चोरी : नारे-निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 20:59 IST

कळमना फळे बाजारात यंदाच्या हंगामात फळे चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या घटनांवर प्रशासकाला नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी आडतिया आणि व्यापाºयांनी फळांचा लिलाव बंद पाडून बाजारात प्रशासनाविरोधात नारे-निदर्शने केली.

ठळक मुद्देआडतिया, व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडला, कळमन्यात अस्वच्छतेचा कळस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना फळे बाजारात यंदाच्या हंगामात फळे चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या घटनांवर प्रशासकाला नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी आडतिया आणि व्यापाºयांनी फळांचा लिलाव बंद पाडून बाजारात प्रशासनाविरोधात नारे-निदर्शने केली.प्राप्त माहितीनुसार, दरवर्षी फळे चोरीच्या घटना घडतातच, पण यंदा यात वाढ झाली आहे. या संदर्भात प्रशासक राजेश भुसारी आणि कळमना पोलिसांना माहिती दिली आहे. यावर नियंत्रण आणण्यात दोघांनाही अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी नारे-निदर्शने करण्यात आली. त्यानंतरही फळे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांच्या कार्यालयात प्रशासक राजेश भुसारी, कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, आडतिये, व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चोरीच्या घटनांवर आळा घालण्याचे आश्वासन प्रशासक आणि पोलिसांनी दिले. त्यानंतरच लिलाव प्रक्रिया पार पडली.आनंद डोंगरे म्हणाले, एक टन मोसंबी ३० हजार रुपयांची होते. चिखली आणि लगतच्या भागातील असामाजिक तत्त्व व गुंड प्रवृत्तीचे लोक रात्री सुरक्षा रक्षक आणि शेतकऱ्यांना शस्त्रे दाखवून फळे चोरून नेतात. ते संख्येने जास्त असल्याने त्यांच्यावर आळा घालणे सुरक्षा रक्षकांनाही कठीण जाते. अशा घटनांची माहिती पोलिसांनाही दिली आहे. पण आतापर्यंत चोरटे सापडले नाहीत. तसे पाहिल्यास ५०० रुपयांचा कृषी माल सेस दिल्याविना कळमन्याच्या गेटबाहेर जात नाही. असे असताना चोरटे लाखोंचा माल चोरटे कसा घेऊन जातात, यावर प्रश्नचिन्ह आहे. प्रशासक आश्वासन देण्यापलीकडे काहीच करीत नाहीत. पाच वर्षांनंतर गेल्या महिन्यात कळमन्याच्या मुख्यदारातून ये-जा सुरू झाली आहे. चिखली गेटकडून चोरटे शस्त्राच्या जोरावर माल बाहेर नेतात. यात शेतकºयांचे जास्त नुकसान होते.बाजारात अस्वच्छताकळमन्यात संपूर्ण विदर्भासह नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यातून मोसंबी आणि संत्र्याची आवक वाढली आहे. मोसंबीचे जवळपास २०० आणि संत्र्याचे ५० ते ६० टेम्पो दररोज येत आहेत. त्यामुळे खराब माल बाजारात पडून राहतो. त्याची उचल करण्यात येत नसल्याने बाजारात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासकाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे फळे बाजारात अस्वच्छतेचा कळस झाल्याचे डोंगरे म्हणाले.बैठकीत १०० पेक्षा जास्त अडतिया, २५० व्यापारी आणि खरेदीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर