शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

थिएटर्स हाऊसफुल्ल, मात्र बॉक्स ऑफिसचे गणित बिघडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 07:00 IST

Nagpur News १८-१९ महिन्यांचा लॉकडाऊन भोगल्यानंतर सिनेमागृह अनलॉक झाले आणि सिनेमांचे प्रदर्शन सुरू झाले. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे चित्रपटगृह आणि चित्रपट निर्मात्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकाही मल्टिप्लेक्स अजूनही बंदच ५० टक्के आसनक्षमतेचा परिणाम

प्रवीण खापरे

नागपूर : लक्ष्मीपूजनापासून तब्बल १९ महिने बंद असलेली चित्रपटगृहे उघडली आणि चित्रपटांचे प्रदर्शन सुरू झाले. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे चित्रपटगृह आणि चित्रपट निर्मात्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२० मार्च २०२० ते २२ ऑक्टोबर २०२१ असा १८-१९ महिन्यांचा लॉकडाऊन भोगल्यानंतर सिनेमागृह अनलॉक झाले आणि लक्ष्मीपूजनापासून चित्रपटगृहांमध्ये सिनेमांचे प्रदर्शन सुरू झाले. त्यामुळे थिएटर्स मालक, संचालकांसोबतच चित्रपट निर्माते, अभिनेते व या उद्योगाशी संबंधित सर्वच कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असतानाही ५० टक्के आसनक्षमतेचे निर्बंध असल्यामुळे बॉक्स ऑफिसचे गणित बिघडणार आहे. शिवाय, कोरोना संक्रमणानंतर आणि लॉकडाऊन उठल्यानंतर लागलीच प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याची कल्पना नसल्याने अनेक मल्टिप्लेक्स समूहांनी मुंबई, पुणे वगळता इतर शहरांतील स्क्रीन अद्यापही ओपन केलेल्या नाहीत. याचा फटका चित्रपटांना अपेक्षित गल्ला जमविण्यावर पडणार आहे. नागपुरात कार्निव्हल सिनेमाचे स्क्रीन अद्यापही बंदच आहेत.

अर्धे प्रेक्षक आधीच गायब

नवा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर रसिकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे रसिकांच्या प्रतिसादाचा पहिला वीकेंड (शुक्रवार, शनिवार, रविवार) महत्त्वाचा ठरतो. चित्रपटाच्या पब्लिक ओपिनियननुसार नंतर चित्रपटाकडे वळणारी गर्दी निर्धारित होत असते. त्यामुळेच साधारणत: पहिल्या वीकेंडला स्टार पॉवर्स असलेल्या सिनेमांना चिक्कार गर्दी असते. त्याला लाभ चित्रपटगृहांना होतो. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे रसिकांची अर्धी गर्दी आधीच गायब झालेली आहे.

बॉक्स ऑफिसला तोटा

५० टक्के आसनक्षमतेमुळे अर्धी गर्दी आधीच संपुष्टात आली आहे. कोरोनात रखडलेले अनेक सिनेमे रांगेत आहेत आणि एकापाठोपाठ दर आठवड्याला ते सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे एका सिनेमाचा अपेक्षित गल्ला भरण्यापूर्वीच दुसऱ्या सिनेमाकडे प्रेक्षक वळणार आहेत. त्याचा फटका चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसला बसणार आहे.

चित्रपटगृहे आधीच संकटात

गेल्या १८-१९ महिन्यापासून चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स बंद होते. या काळात शासनाने पाणी, वीज, मनोरंजन कर, जीएसटीमध्ये कसलीच सवलत दिली नाही. त्यात ५० टक्के आसनक्षमतेचे निर्बंध असल्याने वीकेंडचा लाभही मिळणार नाही. शिवाय, संक्रमणाच्या धास्तीने अजूनही प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतील की नाही, ही शंका आहे. अशात तोटा हा ठरलेलाच आहे. म्हणून नागपुरातील कार्निव्हल सिनेमाच्या स्क्रीन अद्याप बंदच आहेत.

- राजेश राऊत, व्यवस्थापक, कार्निव्हल सिनेमा, नागपूर

.................

टॅग्स :cinemaसिनेमा