शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

थिएटर्स हाऊसफुल्ल, मात्र बॉक्स ऑफिसचे गणित बिघडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 07:00 IST

Nagpur News १८-१९ महिन्यांचा लॉकडाऊन भोगल्यानंतर सिनेमागृह अनलॉक झाले आणि सिनेमांचे प्रदर्शन सुरू झाले. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे चित्रपटगृह आणि चित्रपट निर्मात्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकाही मल्टिप्लेक्स अजूनही बंदच ५० टक्के आसनक्षमतेचा परिणाम

प्रवीण खापरे

नागपूर : लक्ष्मीपूजनापासून तब्बल १९ महिने बंद असलेली चित्रपटगृहे उघडली आणि चित्रपटांचे प्रदर्शन सुरू झाले. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे चित्रपटगृह आणि चित्रपट निर्मात्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२० मार्च २०२० ते २२ ऑक्टोबर २०२१ असा १८-१९ महिन्यांचा लॉकडाऊन भोगल्यानंतर सिनेमागृह अनलॉक झाले आणि लक्ष्मीपूजनापासून चित्रपटगृहांमध्ये सिनेमांचे प्रदर्शन सुरू झाले. त्यामुळे थिएटर्स मालक, संचालकांसोबतच चित्रपट निर्माते, अभिनेते व या उद्योगाशी संबंधित सर्वच कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असतानाही ५० टक्के आसनक्षमतेचे निर्बंध असल्यामुळे बॉक्स ऑफिसचे गणित बिघडणार आहे. शिवाय, कोरोना संक्रमणानंतर आणि लॉकडाऊन उठल्यानंतर लागलीच प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याची कल्पना नसल्याने अनेक मल्टिप्लेक्स समूहांनी मुंबई, पुणे वगळता इतर शहरांतील स्क्रीन अद्यापही ओपन केलेल्या नाहीत. याचा फटका चित्रपटांना अपेक्षित गल्ला जमविण्यावर पडणार आहे. नागपुरात कार्निव्हल सिनेमाचे स्क्रीन अद्यापही बंदच आहेत.

अर्धे प्रेक्षक आधीच गायब

नवा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर रसिकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे रसिकांच्या प्रतिसादाचा पहिला वीकेंड (शुक्रवार, शनिवार, रविवार) महत्त्वाचा ठरतो. चित्रपटाच्या पब्लिक ओपिनियननुसार नंतर चित्रपटाकडे वळणारी गर्दी निर्धारित होत असते. त्यामुळेच साधारणत: पहिल्या वीकेंडला स्टार पॉवर्स असलेल्या सिनेमांना चिक्कार गर्दी असते. त्याला लाभ चित्रपटगृहांना होतो. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे रसिकांची अर्धी गर्दी आधीच गायब झालेली आहे.

बॉक्स ऑफिसला तोटा

५० टक्के आसनक्षमतेमुळे अर्धी गर्दी आधीच संपुष्टात आली आहे. कोरोनात रखडलेले अनेक सिनेमे रांगेत आहेत आणि एकापाठोपाठ दर आठवड्याला ते सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे एका सिनेमाचा अपेक्षित गल्ला भरण्यापूर्वीच दुसऱ्या सिनेमाकडे प्रेक्षक वळणार आहेत. त्याचा फटका चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसला बसणार आहे.

चित्रपटगृहे आधीच संकटात

गेल्या १८-१९ महिन्यापासून चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स बंद होते. या काळात शासनाने पाणी, वीज, मनोरंजन कर, जीएसटीमध्ये कसलीच सवलत दिली नाही. त्यात ५० टक्के आसनक्षमतेचे निर्बंध असल्याने वीकेंडचा लाभही मिळणार नाही. शिवाय, संक्रमणाच्या धास्तीने अजूनही प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतील की नाही, ही शंका आहे. अशात तोटा हा ठरलेलाच आहे. म्हणून नागपुरातील कार्निव्हल सिनेमाच्या स्क्रीन अद्याप बंदच आहेत.

- राजेश राऊत, व्यवस्थापक, कार्निव्हल सिनेमा, नागपूर

.................

टॅग्स :cinemaसिनेमा