शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

‘आरएसएस’च्या संस्था खोक्यातून उभ्या झाल्या, हा त्यामागील इशारा; वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2022 20:23 IST

Nagpur News, Prakash Ambedkar ‘आरएसएस’च्या संस्था खोक्यातून उभ्या झाल्या, हा त्यामागील इशारा होता, तो समजून घ्या. यामुळेच चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार करायचा आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले.

नागपूर : भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या विधानामागे ‘आरएसएस’च्या संस्था खोक्यातून उभ्या झाल्या, हा त्यामागील इशारा होता, तो समजून घ्या. यामुळेच चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार करायचा आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले.

महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या इशारा महामोर्चाने मंगळवारी विधिमंडळावर धडक दिली. पोलिसांनी मॉरेस कॉलेज टी पॉइंटवर हा मोर्चा अडविल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी ते मोर्चेकरांना संबोधित करीत होते.

आंबेडकर म्हणाले, एवढे दिवस चंद्रकांत पाटील यांच्या मनात हे खदखदत होते. अखेर खरे काय ते त्यांच्या तोंडात आले. यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. आंबेडकर सरकारवर निशाणा साधत म्हणाले, हे सरकार लोकांच्या प्रश्नांमध्ये न गुंतता स्वत:च्याच प्रश्नांमध्ये गुंतले आहे.

-काय खरं काय खोटं, हे सरकार सांगत नाही

आंबेडकर म्हणाले, आपल्यातून अचानक निघून गेलेल्या व्यक्तींच्या नावावरून राजकारण सुरू आहे. त्या कशा गेल्या यावरून वाद सुरू आहे. दुर्दैवाने केंद्र शासनाच्या संस्था त्यात तपास करत आहेत. हे सरकारही काय खरं, काय खोटं हे सांगायला तयार नाही. प्रामाणिक सरकार असते आणि ज्यामध्ये थोडीशी माणुसकी शिल्लक असती तर त्यांनी डॉक्टरांचा आणि पोलिसांचा अहवाल समोर आणला असता. टीव्हीवरून सुरु असलेल्या तर्कहीन चर्चा थांबल्या असत्या.

-सत्ता म्हणजे अमरपट्टा नाही

सत्ता पाच वर्षांसाठी राहते. परंतु आमच्या शिवाय कोणीच राज्य करू शकत नाही, असे सातत्याने बिंबवून सत्तेला अमरपट्टा करण्याचे काम सुरू आहे. अशांचा आपणच विचार करायला हवा. लोकशाही धोक्यात आली आहे.

-सरकार शिंदे चालवतात की फडणवीस?

पूर्वी आंदोलन करताना सत्ताधारी चर्चेला बोलवत असत. पण आताचे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतात की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतात हेच कळत नाही. पूर्वी आम्ही फक्त मुख्यमंत्र्याकडेच जायचो.आता आम्हाला एक प्रश्न दोन माणसांकडे घेऊन जावा लागतो. त्यातही उपमुख्यमंत्री हा शब्द वापरला तर तुमचे काम झाले नाही म्हणून समजा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी