शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जलद मूल्यांकनासाठी विद्यापीठाने घेतला प्राध्यापकांचा क्लास

By जितेंद्र ढवळे | Updated: May 7, 2024 17:47 IST

Nagpur : - प्र-कुलगुरू डॉ. दुधे यांनी दिल्या टिप्स

नागपूर : विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल निर्धारित कालावधीत लागण्यासाठी; तसेच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन योग्य पद्धतीने होण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या वतीने मंगळवारी प्राध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तीत शिक्षकांवर मूल्यांकनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांची उपस्थिती होती.

उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन गुणात्मक दृष्टीने उत्तम व्हावे, यासाठी विधी महाविद्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. दुधे यांनी दिली. मूल्यांकन करीत असताना शिक्षकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे मूल्यांकनाची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडण्यास मदत मिळेल असेही डॉ. दुधे म्हणाले. डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थित आणि सुरळीत होण्याकरिता प्राध्यापकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. सोबतच याविषयी अधिक माहिती दिली. आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी मूल्यांकन करताना विद्यार्थ्यांनी केलेले परिश्रम शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार व्यक्त करताना विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांनी विद्यार्थी हा केंद्रस्थानी असल्याने त्यांचेही हित जोपासले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. मूल्यांकन कार्यशाळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची संलग्नित सर्वच विधी महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षकगण उपस्थित होते.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठuniversityविद्यापीठnagpurनागपूर