शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

विदर्भातील तीन शहरे जगात सर्वाधिक उष्ण; पारा ४५ पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 21:01 IST

Nagpur News जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिले तीन विदर्भातीलच आहेत. ४५.३ अंशासह ब्रह्मपुरी सर्वात टाॅपवर आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी, चंद्रपूर, अकाेला पहिल्या तीनमध्ये

 

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सूर्यदेव जणू विदर्भात मुक्कामी असल्याची स्थिती दिसून येत आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिले तीन विदर्भातीलच आहेत. ४५.३ अंशासह ब्रह्मपुरी सर्वात टाॅपवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर ४५.२ अंश व ४४.९ अंशांसह अकाेला तिसरे सर्वात उष्ण शहर ठरले आहे. जगातील पहिल्या १५ मध्ये अमरावती, वर्ध्यासह पाच शहरे विदर्भाचे आहेत. १५ अतिउष्ण शहरांमध्ये १३ शहरे भारतातीलच आहेत.

विदर्भात सर्वत्र कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. सूर्याच्या अतिनील चटक्यांनी नागरिकांना चांगलेच हाेरपळले असून, अंगाची लाहीलाही हाेत आहे. हवामान विभागाने १८ ते २० एप्रिलपर्यंत उष्ण लाटांचा इशारा दिला हाेता. बुधवारी नागपूर वगळता विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऱ्याने उसळी घेतली. नागपूरमध्ये ४३.२ अंशांची नाेंद करण्यात आली, जी मंगळवारच्या तुलनेत ०.४ अंश कमी आहे. मात्र, उन्हाच्या चटक्यांनी पारा ४५ अंश पार गेल्याची जाणीव नागरिकांना हाेत हाेती. ४२ अंशांसह केवळ गडचिराेली वगळता, इतर जिल्हे उच्चांकावर पाेहोचले आहेत. अमरावती व वर्धा ४४.२ अंश, गाेंदिया ४४ अंश आणि वाशिम ४३.५ अंशांवर पाेहोचले.

काही तज्ज्ञांच्या मते सूर्याच्या अतिनील किरणांचा सामना करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, २१ व २२ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह काेरडे वादळ येण्याची शक्यता आहे. मात्र, दाेन दिवस वातावरण बदलण्याची शक्यता नाही. उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारी शहरातील रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे.

टॅग्स :weatherहवामान