शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पळून आलेल्या दिल्लीतील मुलींचे खुद्द पोलीस अधीक्षकांनी केले समुपदेशन

By नरेश डोंगरे | Updated: December 28, 2024 23:10 IST

दिल्लीहून सुसाट निघाली चेन्नई एक्सप्रेस : नागपूर रेल्वे पोलिसांनी दाखविला रेड सिग्नल

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मनासारखे वागण्यासाठी पालकांकडून मोकळीक मिळत नसल्याने दिल्लीतील दोन मुलींनी थेट चेन्नई एक्सप्रेस धरली. बेभान अवस्थेत घर सोडून निघालेल्या या दोघींची माहिती कळताच त्यांना रेल्वे पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले. त्यानंतर रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांनी खुद्द या मुलींचे समुपदेशन करून त्यांचे भवितव्य सुरक्षित केले.सोना आणि मोना (नाव काल्पनिक, वय १५ वर्षे) या दोघी नॉर्थ दिल्लीतील नरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्या दोघी वर्ग मैत्रीणी आहेत.

पालकांकडून  फिरायला जाऊ दिले जात नाही. कुणाशी बोलण्याची मोकळीक नाही आणि मोबाईलही वापरू दिला जात नाही. सततची शारिरिक आणि मानसिक कोंडी होत असल्याने या दोघी कंटाळल्या होत्या. तारुणाच्या उंबरठ्यावर आल्या असताना मनसारखे काहीच करू दिले जात नसल्याने त्यांनी घरच्यांकडून होणारी कोंडी फोडण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार, संधी साधून शुक्रवारी सायंकाळी त्यांनी घर सोडले. रात्री या दोघी दिल्ली चेन्नई अशी तिकिट घेत तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये बसल्या. दरम्यान, मुली गायब झाल्याचे लक्षात येताच दोन्हीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. चाैकशीत त्या तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये बसल्याचे स्पष्ट होताच रेल्वे पोलिसांना तसा अलर्ट देण्यात आला. त्यांचे वर्णनही कळविण्यात आले. त्यामुळे सतर्क झालेल्या रेल्वे पोलिसांनी नजर रोखली. शनिवारी दुपारी १.१५ च्या सुमारास या दोघी प्रतिक्षालयात बसून दिसताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. नाव,गाव, पत्ता विचारल्यानंतर नॉर्थ दिल्लीतून पळून गेलेल्या त्या, या दोघीच असल्याचे स्पष्ट होताच रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे तेथे पोहचल्या. त्यांनी मुलींची वास्तपूस्त केली. कुठे जाणार, काय करणार, कशा करणार, याबाबत काहीच निश्चित नव्हते. समाजकंटकांच्या नजरेस या दोघी पडल्या असत्या तर त्यांचे आयुष्य बर्बाद झाले असते. हे त्या दोघींच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पालकांना माहिती देऊन नागपूरला बोलवून घेण्यात आले. निरीक्षणगृहात रवानगीपालकांना येण्यास विलंब होणार याची जाणिव असल्यामुळे या दोघींना पाटणकर चाैकातील शासकीय निरीक्षण गृहात ठेवण्यात आले. त्या दोघींचे पालक येथे आल्यानंतर त्यांचेही समुपदेशन करून मुलींना ताब्यात दिले जाणार आहे. ही कामगरी जीआरपीचे एपीआय सुनील उईके, पीएसआय थॉमस, हवलदार संजय पटले, मजहर अली आणि ममता तिवारी यांनी बजावली.

टॅग्स :nagpurनागपूर