शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारीच आपसांत भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 14:19 IST

अध्यक्ष बर्वेंनी शिकविला डेकोरम, तर कंभाले म्हणाले खुर्ची सोडा!

नागपूर :जिल्हा परिषदेत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सदस्यांत सुरू असलेल्या वादाचे पडसात सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांनी पदाधिकाऱ्यांनी निधी पळविल्याचा आरोप केला. यावर अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी कंभाले यांना बैठकीचा डेमोरम पाळण्याचा सल्ला दिला, तर कंभाले यांनी पलटवार करीत तुमची मानसिकता नसेल तर पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी करून अध्यक्षांना चांगलेच कोंडीत पकडले.

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी १७ सामूहिक निधीचे वितरण सम प्रमाणात करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ५ कोटी ८० लाखांच्या निधीपैकी अध्यक्ष व उपाध्यक्षांनी प्रत्येकी ५० लाख, कृषी सभापतींनी ३० लाख, तर सभापतींनी प्रत्येकी २० लाखांचा निधी पळवून सदस्यांना १० लाखांचाही निधी मिळाला नसल्याचा आरोप नाना कंभाले यांनी बैठकीत केला. विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनीही निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप केला.

विरोधकांसोबतच सत्तापक्षातील काही सदस्यांनी निधी वाटपावरून आक्रमक भूमिका घेतल्याने रश्मी बर्वे नाराज झाल्या. त्यांनी कंभाले यांना बैठकीचा डेकोरम कायम ठेवण्याचा सल्ला दिला. यावर कंभाले संतप्त झाले. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. सर्व सदस्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पदाधिकारीच निधी पळवत असतील तर सदस्यांनी न्याय कुणाला मागावा, असा सवाल त्यांनी केला. यावरून बर्वे व कंभाले यांच्यात चांगलीच वादावादी झाली. यातून सत्तापक्षात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. याचे पडसाद अगामी जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीत पडण्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.

ठरल्यानुसारच निधी वाटप

सर्वसाधारण सभेत ठरल्यानुसारच सदस्यांना विकासकामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी वाटप केला जात आहे. त्यामुळे सदस्यांवर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचे अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी पत्रकारांना सांगितले.

मान्सूनपूर्व नियोजन नसल्याने शेतीचे नुकसान

मागील दोन-अडीच वर्षांत जिल्ह्यातील तलाव दुरुस्तीसाठी कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही. नाले व तलावाचे खोलीकरण झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पदाधिकारी व प्रशासनाने याबाबत वेळीच नियोजन केले असते, तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते असा आरोप विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर