शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारीच आपसांत भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 14:19 IST

अध्यक्ष बर्वेंनी शिकविला डेकोरम, तर कंभाले म्हणाले खुर्ची सोडा!

नागपूर :जिल्हा परिषदेत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सदस्यांत सुरू असलेल्या वादाचे पडसात सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांनी पदाधिकाऱ्यांनी निधी पळविल्याचा आरोप केला. यावर अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी कंभाले यांना बैठकीचा डेमोरम पाळण्याचा सल्ला दिला, तर कंभाले यांनी पलटवार करीत तुमची मानसिकता नसेल तर पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी करून अध्यक्षांना चांगलेच कोंडीत पकडले.

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी १७ सामूहिक निधीचे वितरण सम प्रमाणात करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ५ कोटी ८० लाखांच्या निधीपैकी अध्यक्ष व उपाध्यक्षांनी प्रत्येकी ५० लाख, कृषी सभापतींनी ३० लाख, तर सभापतींनी प्रत्येकी २० लाखांचा निधी पळवून सदस्यांना १० लाखांचाही निधी मिळाला नसल्याचा आरोप नाना कंभाले यांनी बैठकीत केला. विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनीही निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप केला.

विरोधकांसोबतच सत्तापक्षातील काही सदस्यांनी निधी वाटपावरून आक्रमक भूमिका घेतल्याने रश्मी बर्वे नाराज झाल्या. त्यांनी कंभाले यांना बैठकीचा डेकोरम कायम ठेवण्याचा सल्ला दिला. यावर कंभाले संतप्त झाले. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. सर्व सदस्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पदाधिकारीच निधी पळवत असतील तर सदस्यांनी न्याय कुणाला मागावा, असा सवाल त्यांनी केला. यावरून बर्वे व कंभाले यांच्यात चांगलीच वादावादी झाली. यातून सत्तापक्षात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. याचे पडसाद अगामी जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीत पडण्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.

ठरल्यानुसारच निधी वाटप

सर्वसाधारण सभेत ठरल्यानुसारच सदस्यांना विकासकामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी वाटप केला जात आहे. त्यामुळे सदस्यांवर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचे अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी पत्रकारांना सांगितले.

मान्सूनपूर्व नियोजन नसल्याने शेतीचे नुकसान

मागील दोन-अडीच वर्षांत जिल्ह्यातील तलाव दुरुस्तीसाठी कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही. नाले व तलावाचे खोलीकरण झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पदाधिकारी व प्रशासनाने याबाबत वेळीच नियोजन केले असते, तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते असा आरोप विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर