शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारीच आपसांत भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 14:19 IST

अध्यक्ष बर्वेंनी शिकविला डेकोरम, तर कंभाले म्हणाले खुर्ची सोडा!

नागपूर :जिल्हा परिषदेत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सदस्यांत सुरू असलेल्या वादाचे पडसात सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांनी पदाधिकाऱ्यांनी निधी पळविल्याचा आरोप केला. यावर अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी कंभाले यांना बैठकीचा डेमोरम पाळण्याचा सल्ला दिला, तर कंभाले यांनी पलटवार करीत तुमची मानसिकता नसेल तर पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी करून अध्यक्षांना चांगलेच कोंडीत पकडले.

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी १७ सामूहिक निधीचे वितरण सम प्रमाणात करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ५ कोटी ८० लाखांच्या निधीपैकी अध्यक्ष व उपाध्यक्षांनी प्रत्येकी ५० लाख, कृषी सभापतींनी ३० लाख, तर सभापतींनी प्रत्येकी २० लाखांचा निधी पळवून सदस्यांना १० लाखांचाही निधी मिळाला नसल्याचा आरोप नाना कंभाले यांनी बैठकीत केला. विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनीही निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप केला.

विरोधकांसोबतच सत्तापक्षातील काही सदस्यांनी निधी वाटपावरून आक्रमक भूमिका घेतल्याने रश्मी बर्वे नाराज झाल्या. त्यांनी कंभाले यांना बैठकीचा डेकोरम कायम ठेवण्याचा सल्ला दिला. यावर कंभाले संतप्त झाले. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. सर्व सदस्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पदाधिकारीच निधी पळवत असतील तर सदस्यांनी न्याय कुणाला मागावा, असा सवाल त्यांनी केला. यावरून बर्वे व कंभाले यांच्यात चांगलीच वादावादी झाली. यातून सत्तापक्षात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. याचे पडसाद अगामी जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीत पडण्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.

ठरल्यानुसारच निधी वाटप

सर्वसाधारण सभेत ठरल्यानुसारच सदस्यांना विकासकामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी वाटप केला जात आहे. त्यामुळे सदस्यांवर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचे अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी पत्रकारांना सांगितले.

मान्सूनपूर्व नियोजन नसल्याने शेतीचे नुकसान

मागील दोन-अडीच वर्षांत जिल्ह्यातील तलाव दुरुस्तीसाठी कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही. नाले व तलावाचे खोलीकरण झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पदाधिकारी व प्रशासनाने याबाबत वेळीच नियोजन केले असते, तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते असा आरोप विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर