शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संघाचा सामाजिक बदलावर भर, विविध वस्त्यांचा अभ्यास करणार; विदर्भातही शाखांची संख्या वाढीस

By योगेश पांडे | Updated: March 16, 2023 21:26 IST

२०२५ पर्यंत कार्यविस्ताराचेच प्रयत्न

नागपूर : २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या विस्तारावर भर देत प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट संघाने ठेवले आहे. विशेषत: या कालावधीत सामाजिक बदलांसाठी संघातर्फे प्रयत्न करण्यात येणार असून विविध वस्त्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. शंभरहून अधिक वस्त्यांमध्ये हे काम सुरू झाले आहे. अभ्यासातून समोर आलेल्या मुद्यांवर काम करून वस्त्यांमधील समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल.

संघाचे पश्चिम क्षेत्र कार्याधिकारी दीपक तामशेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अ.भा. प्रतिनिधी सभेचा तपशील ठेवला. संघ शाखांची संख्या एक लाखांहून अधिक करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. एका वर्षात शाखांची संख्या ८ हजार ५३४ ने ने वाढून ६८,६५१ झाली आहे. विदर्भातही संघटना विस्ताराची ब्ल्यू प्रिंट तयार करून संघ शाखांची संख्या २१०० हून अधिक करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

विदर्भात ८५९ हून आता १ हजार ३८ ठिकाणी संघाचे काम सुरू आहे. मागील वर्षी १,५६१ संघाच्या शाखा होत्या व आता ही संख्या १ हजार ८९० इतकी झाली आहे. तर साप्ताहिक मिलनांची संख्या ५२४ वरून ६१६ वर पोहोचली आहे. पुढील काळात संघातर्फे विस्तारावरच भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे, विश्व संवाद केंद्राचे अतुल पिंगळे, संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख डॉ.अमित कुशवाह, महानगर प्रचार प्रमुख ब्रजेश मानस प्रामुख्याने उपस्थित होते.

या गोष्टींवर भर

- सामाजिक समरसता- समृद्ध देशासाठी नवोपक्रम.- कुटुंब प्रबोधन- पर्यावरण संवर्धन (प्लास्टिक मुक्त, पाणी बचत)- स्वदेशी (भाषा, खाद्यपदार्थ, पोशाख यावर भर)

संघाचे यंदाचे तीन प्रमुख कार्यक्रम

-छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २ जूनपासून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.-भगवान महावीरांच्या अडीच हजार वर्षांच्या महानिर्वाणाचा वर्षभर कार्यक्रम.- स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त जागोजागीकार्यक्रम.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर