शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची - ताराचंद्र खांडेकर 

By आनंद डेकाटे | Updated: July 13, 2023 14:53 IST

स्मृतिशेष एल.आर. बाली यांना श्रद्धांजली

नागपूर : आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची आहे. आंबेडकरी समाजातील बुद्धिजीवी हा सजग असला पाहिजे. त्याने आंदोलन व आंदोलनातील नायकाची दिशा निश्चित केली पाहिजे. आवळे बाबू, बरि. राजाभाऊ खोब्रागडे, एल. आर. बाली हे आंदोलनाचे बुद्धिजीवी नेता होते. एल. आर.बाली यांच्या जाण्याने मोठी सामाजिक हानी झाली असून संविधानिक मूल्य जोपासणारा समता सैनिक दलाचा समर्पित शिलेदार हरवला आहे, अशी भावना ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केली.

हिंदी मोरभवनच्या अर्पण सभागृहात स्मृतिशेष एल. आर. बाली यांच्या श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अण्ड लिटरेचर, समता सैनिक दल, रिपब्लिकन लोकप्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम, हरिश चहांदे, रिपाइंचे नेते भूपेश थुलकर, नाटककार दादाकांत धनविजय यांनीही आपले विचार व्यक्त केले.

भदंत नागदीपंकर, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुदेश भोवले, हरिश जानोरकर, डॉ. आर. डी. कोसे, चंद्रबोधी, पाटील यांनी श्रद्धांजलीपर शोक संवेदना व्यक्त केल्या. ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी एल. आर. बाली यांच्या कार्य कर्तुत्वाचा आढावा घेणारा पाठविलेला संदेश मच्छिंद्र चोरमारे यांनी वाचला.

- एल.आर. बाली आंबेडकरी चळवळीचे दीपस्तंभ

यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, एल. आर. बालींच्या त्यागाचा आलेख नव्या पिढी समोर मांडला पाहिजे. बालींनी स्वकेंद्रीपणा कधीही स्वीकारला नाही. आंदोलनाला पुरक असणारं लेखन त्यांनी केले. आयुष्यभर निरपेक्ष जगलेले बाली हे आंबेडकरी चळवीचे दीपस्तंभ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर