शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची - ताराचंद्र खांडेकर 

By आनंद डेकाटे | Updated: July 13, 2023 14:53 IST

स्मृतिशेष एल.आर. बाली यांना श्रद्धांजली

नागपूर : आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची आहे. आंबेडकरी समाजातील बुद्धिजीवी हा सजग असला पाहिजे. त्याने आंदोलन व आंदोलनातील नायकाची दिशा निश्चित केली पाहिजे. आवळे बाबू, बरि. राजाभाऊ खोब्रागडे, एल. आर. बाली हे आंदोलनाचे बुद्धिजीवी नेता होते. एल. आर.बाली यांच्या जाण्याने मोठी सामाजिक हानी झाली असून संविधानिक मूल्य जोपासणारा समता सैनिक दलाचा समर्पित शिलेदार हरवला आहे, अशी भावना ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केली.

हिंदी मोरभवनच्या अर्पण सभागृहात स्मृतिशेष एल. आर. बाली यांच्या श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अण्ड लिटरेचर, समता सैनिक दल, रिपब्लिकन लोकप्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम, हरिश चहांदे, रिपाइंचे नेते भूपेश थुलकर, नाटककार दादाकांत धनविजय यांनीही आपले विचार व्यक्त केले.

भदंत नागदीपंकर, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुदेश भोवले, हरिश जानोरकर, डॉ. आर. डी. कोसे, चंद्रबोधी, पाटील यांनी श्रद्धांजलीपर शोक संवेदना व्यक्त केल्या. ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी एल. आर. बाली यांच्या कार्य कर्तुत्वाचा आढावा घेणारा पाठविलेला संदेश मच्छिंद्र चोरमारे यांनी वाचला.

- एल.आर. बाली आंबेडकरी चळवळीचे दीपस्तंभ

यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, एल. आर. बालींच्या त्यागाचा आलेख नव्या पिढी समोर मांडला पाहिजे. बालींनी स्वकेंद्रीपणा कधीही स्वीकारला नाही. आंदोलनाला पुरक असणारं लेखन त्यांनी केले. आयुष्यभर निरपेक्ष जगलेले बाली हे आंबेडकरी चळवीचे दीपस्तंभ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर