शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

नागपुरात सिकलसेल-थॅलेसेमियाचा धोका वाढला

By सुमेध वाघमार | Updated: May 22, 2025 17:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सिकलसेल निर्मूलन अभियान सुरू असतानाच नागपूर येथून चिंता वाढवणारे आकडे समोर आले.

सुमेध वाघमारे, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सिकलसेल निर्मूलन अभियान सुरू असतानाच, नागपूर येथून चिंता वाढवणारे आकडे समोर आले. मेयो आणि मेडिकलने मिळून १ लाख ३४ हजार ४०८ लोकांची सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी केली असता, त्यात ३.५८ टक्के, म्हणजेच ४ हजार ८१७ लोक सिकलसेलचे वाहक (कॅरियर) तर २६७ लोक सिकलसेलचे पीडित (ग्रस्त) असल्याचे निदान झाले आहे. याशिवाय, थॅलेसेमियाचे २१६ रुग्णही आढळून आले आहेत. या दोन्ही आजाराचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतात एकूण १.८० कोटी सिकलसेल वाहक आणि १४ लाख सिकलसेल पीडित होते. महाराष्ट्रात १६ हजार ६७४ पीडित आणि २ लाख ९ हजार ६८४ वाहक होते. मागील १३ वर्षांत या आकडेवारीत मोठी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. आई-वडिलांकडून मुलांना नकळत दिला जाणारा हा आनुवंशिक आजार रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारात आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर महानगरपालिका आणि इतर संबंधित विभागांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) यांनी शहर व ग्रामीण भागात सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेतून सिकलसेल रुग्णांची वाढती संख्या समोर आली आहे. 

मेयोच्या तपासणीत १,८३७ सिकलसेल वाहकमेयो रुग्णालयाने सिकलसेल आणि थॅलेसेमिया तपासणीची मोहीम हाती घेतली होती. वर्षभरात शहर व ग्रामीण भागातील ५८९ ठिकाणी ५ ते ५५ वर्षे वयोगटातील ४३ हजार ५०० लोकांची तपासणी करण्यात आली. यात १९ हजार १२३ महिला आणि २४ हजार ३७७ पुरुषांचा समावेश होता. या तपासणीत १ हजार ८३७ लोक सिकलसेलचे वाहक (एएस) असल्याचे, तर ५८ लोक सिकलसेलने पीडित (एसएस) असल्याचे निदान झाले. तसेच, १८३ लोकांना थॅलेसेमिया असल्याचे आढळून आले.

मेडिकलच्या तपासणीत २,९८० सिकलसेल वाहकमेडिकल रुग्णालयाने एका वर्षाच्या कालावधीत १५०० पेक्षा जास्त ठिकाणी ५ ते ५५ वर्षे वयोगटातील ९० हजार ९०८ लोकांची सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी केली. यात ३८ हजार ५०१ पुरुष आणि ५२ हजार ४०७ महिलांचा समावेश होता. या तपासणीत २ हजार ९८० लोक सिकलसेलचे वाहक (एएस) असल्याचे, तर २०९ लोक सिकलसेलने पीडित (एसएस) असल्याचे निदान झाले. थॅलेसेमियाचे ३३ रुग्णही आढळून आले. तपासणी प्रक्रियेनंतर सर्व सहभागी व्यक्तींना सिकलसेल स्टेटस आयडी कार्ड वितरित करण्यात आले. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी व्यापक तपासणी आवश्यक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचनेवरून सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी मोहीम राबवण्यात आली. यातून मिळालेल्या आकडेवारीवरून नागपूर जिल्ह्यात सिकलसेल आणि थॅलेसेमियाची समस्या किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. या दोन्ही आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी व्यापक तपासणी व जनजागृती मोहिम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आहे. -डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता मेयो

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र