शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

थायलंडचे ‘रामाकेईन’ हे भारतीय ‘रामायन’चं; शेषशयन देशमुख यांची माहिती

By निशांत वानखेडे | Updated: January 29, 2024 21:48 IST

राजवाड्याच्या दाेन किमी भिंतीवर काेरली आहे रामकथा

नागपूर : पूर्वीचा ‘सियाम’ म्हणजेच आताचे थायलंड हे रामपूजक हाेते व त्या देशातील अनेक अवशेषांवरून याचे पुरावे मिळतात. संपूर्ण बाैद्ध असलेल्या तेथील राजवंशाला ‘राम’ राजेशाही म्हणून ओळखले जाते. थायलंडचे सध्याचे राजे ‘किंग महावजिरालाेंग काॅन’ हे ‘रामा-१०’ म्हणून ओळखले जात असून व तेथील ‘रामाकेईन’ हा ग्रंथ म्हणजे भारतीय रामायण हाेय, अशी माहिती विदर्भ संशाेधन मंडळाचे संयाेजक, पुरातत्व व इतिहास अभ्यासक डाॅ. शेषशयन देशमुख यांनी दिली.

विदर्भ संशाेधन मंडळातर्फे हाेणाऱ्या मासिक संगाेष्ठीमध्ये ‘थाई के राम’ विषयावर डाॅ. देशमुख यांनी प्रकाश टाकला. थायलंडची राजधानी बॅंकाकमध्ये किंग महावजिरालाेंग काॅन यांचा राजवाडा आहे. त्यांच्या विस्तीर्ण अशा राजमहालाच्या २ किलाेमीटर पाेर्चवर संपूर्ण रामकथा काेरली आहे. वास्तविक म्हणजे पूर्वी अयाेथ्या ही सियामची राजधानी हाेती. १७ व्या शतकात म्यानमार व थायलंडमध्ये युद्ध व्हायचे. १७६२ मध्ये एका युद्धात म्यानमारने अयाेथ्या राजधानी उध्वस्त केली. त्यामुळे तेथील राजधानी बॅंकाकला हलविण्यात आली. युद्धात ‘रामकेईन’ हा ग्रंथसुद्धा नष्ट झाला हाेता. हा वारसा संरक्षित रहावा म्हणून राजवाड्याच्या पाेर्चच्या भिंतीवर संपूर्ण रामकथा असलेले चित्र काढले. १६ फूट उंच व २ किमी लांब या भिंतीवर १७८ चित्रांमधून राम जन्मापासून ते राम-रावण युद्धापर्यंतचे प्रसंग काढले आहेत. हे भित्तीचित्र २०० वर्ष जुने आहे. १९३९ मध्ये सियामचे नाव बदलून थायलंड असे करण्यात आले. किंग वजिरालाेंग काॅन यांचे वडील ‘रामा-९’ यांचे २०१६ साली निधन झाले व वजिरालाेंग काॅन यांचा २०१९ साली राज्याभिषेक करण्यात आला.

थायलंड हा देश बाैद्ध आहे. तेथील चक्री राजवंशाचे राजा चुलालाेक उर्फ ‘रामा-१’ यांनी एम्राॅल्ड म्हणजे पाचूच्या खड्यापासून माेठे बुद्ध विहार बांधले, जे सर्वात माेठे विहार मानले जाते. बॅंकाकमध्येच दुसऱ्या एका विहारात साडेपाच टन साेन्याची बुद्ध मूर्ती जगप्रसिद्ध आहे व कडेकाेट बंदाेबस्तात आहे. असे असले तरी तेथील लाेक सर्व धर्मीयांचा आदर करतात व रामाप्रमाणेच विष्णू, हरिहर व नारायण यांच्याही अनेक मूर्ती संरक्षित केल्या आहेत.

रामकेईनचा संस्कृत अनुवाद

भारतातील संस्कृत पंडित सत्यमूर्ती शास्त्री यांनी ‘रामकेईन’ या ग्रंथाचा संस्कृतमध्ये अनुवाद केला असून त्या ग्रंथाला ‘रामकीर्ती’ या नावाने ओळखले जाते.

भारतात संवर्धनाबाबत उदासीनता

डाॅ. देशमुख यांनी सांगितले, मुंबईचे अंबरनाथ मंदिर १००० वर्षे जुने आहे. हे मंदिर एएसआयद्वारे संरक्षित असूनही तेथील अनेक मूर्ती खंडित हाेत आहेत. एका दृश्यातील ‘लिंगाेत्भव’ रुपातील शिवाच्या मूर्तीमधील विष्णूची मूर्तीच गायब झाली. भारतात वारसा संवर्धनाबाबत उदासीनता असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘इंटरनॅशनल असाेसिएशन फाॅर हिस्टरी ऑफ रिलिजन’ या संघटनेत जगभरातील सदस्य आहेत पण एकही भारतीय नाही, ही खंतही त्यांनी व्यक्त केली.