शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डाळी कडाडल्या; तूर डाळ १६५ रुपये किलो, ताटातून वरण गायब

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 30, 2023 16:03 IST

स्टॉकिस्टांवर धाडी टाकण्याची मागणी, होऊ शकते निर्यात बंदी

नागपूर : भाजीपाला आणि इंधन दरवाढीने गृहिणींचे किचनचे बजेट बिघडलेले असून त्यात डाळींची भर पडली आहे. ऑगस्टमध्ये सर्वच डाळींच्या किमती कडाडल्या आहेत. श्रावण महिन्यात तूर डाळ दर्जानुसार १५० ते १६५ किलो तर उडीद, मूग या डाळींनी शंभरी गाठली आहे. दरवाढीमुळे खिशाला भुर्दंड बसत असल्याने नागरिकामध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने मोठ्या कंपन्यांवर धाडी टाकून स्टॉक बाहेर आणावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

दोन महिन्यात तूर डाळ २५ रुपयांची महाग

डाळींचे नवीन पीक फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येणार आहे. तोपर्यंत स्वयंपाकघरात महाग डाळींचाच उपयोग करावा लागणार आहे. वरण असो वा अन्य पदार्थांमध्ये डाळींचा उपयोग होतो. पण आता महागड्या डाळींमुळे ताटातून वरण गायब झाले आहे. गेल्या दोन महिन्यात तूर डाळ २५, उडीद मोगर २० रुपये, मूग मोगर ३०, हरभरा डाळ २५ आणि मसूर डाळ ६ रुपयांनी महाग झाली आहे. सद्यस्थितीत डाळीचे दर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. यंदा प्रारंभी मुसळधार पावसाने कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. केंद्र सरकारने डाळींवर निर्यात बंदी केली तरच दर कमी होतील, असे मत कळमना येथील होलसेल धान्य विक्रेते रमेश उमाटे यांनी व्यक्त केले. डाळींचे खरेदीदार ५० टक्के असल्याचे उमाटे यांनी सांगितले. 

डाळवर्गीय पिकांकडे वळला शेतकरी

केंद्र सकरारने हमीभाव वाढविल्याने शेतकरी डाळवर्गीय पीक लागवडीकडे वळला आहे. यंदा डाळी प्रचंड महाग होतील, एवढेही पीक कमी आलेले नाही. त्यानंतरही तूर आणि अन्य डाळींचे भाव का वाढत आहेत, हे एक आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्याचे पीक घेतले जाते. राजस्थान व मध्य प्रदेशातून डाळींचा पुरवठा होतो. त्यानंतरही डाळी महागच आहेत. डाळीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर कमी होण्याची चिन्हे नसल्याचे रमेश उमाटे यांनी सांगितले.

कंपन्यांकडे जास्त साठा, धाडी टाकाव्यात

मोठ्या कंपन्यांकडे लाखो टन साठा असल्याचा ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. सरकार मोठ्या कंपन्यांवर कारवाई करत नाही. त्याचा भुर्दंड सामान्यांवर बसत आहे. दर अचानक वाढल्याने ग्राहकांना डाळींसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. दर आवाक्यात आणण्यासाठी सरकारने तालुका आणि जिल्हास्तरावरील स्टॉकिस्टवर धाडी टाकाव्यात. अनेक दालमील मालकांनी भूमिगत टाक्यात तूरीचा साठा केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त माल आहे. अतोनात नफा कमविण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सामान्य पिचला जात आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक दालमीलची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी गजानन पांडे यांनी केले आहे.

डाळी दोन महिन्यांपूर्वीचे भाव आताचे भाव (प्रतिकिलो)

तूर १२८-१४० १५०-१६५हरभरा ५३-५५ ७२-८०मसूर ७५-८० ८२-८६उडीद मोगर ९०-१२० १०८-१४०मूग मोगर ९०-९५ १०८-१२४

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर