शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

डाळी कडाडल्या; तूर डाळ १६५ रुपये किलो, ताटातून वरण गायब

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 30, 2023 16:03 IST

स्टॉकिस्टांवर धाडी टाकण्याची मागणी, होऊ शकते निर्यात बंदी

नागपूर : भाजीपाला आणि इंधन दरवाढीने गृहिणींचे किचनचे बजेट बिघडलेले असून त्यात डाळींची भर पडली आहे. ऑगस्टमध्ये सर्वच डाळींच्या किमती कडाडल्या आहेत. श्रावण महिन्यात तूर डाळ दर्जानुसार १५० ते १६५ किलो तर उडीद, मूग या डाळींनी शंभरी गाठली आहे. दरवाढीमुळे खिशाला भुर्दंड बसत असल्याने नागरिकामध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने मोठ्या कंपन्यांवर धाडी टाकून स्टॉक बाहेर आणावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

दोन महिन्यात तूर डाळ २५ रुपयांची महाग

डाळींचे नवीन पीक फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येणार आहे. तोपर्यंत स्वयंपाकघरात महाग डाळींचाच उपयोग करावा लागणार आहे. वरण असो वा अन्य पदार्थांमध्ये डाळींचा उपयोग होतो. पण आता महागड्या डाळींमुळे ताटातून वरण गायब झाले आहे. गेल्या दोन महिन्यात तूर डाळ २५, उडीद मोगर २० रुपये, मूग मोगर ३०, हरभरा डाळ २५ आणि मसूर डाळ ६ रुपयांनी महाग झाली आहे. सद्यस्थितीत डाळीचे दर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. यंदा प्रारंभी मुसळधार पावसाने कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. केंद्र सरकारने डाळींवर निर्यात बंदी केली तरच दर कमी होतील, असे मत कळमना येथील होलसेल धान्य विक्रेते रमेश उमाटे यांनी व्यक्त केले. डाळींचे खरेदीदार ५० टक्के असल्याचे उमाटे यांनी सांगितले. 

डाळवर्गीय पिकांकडे वळला शेतकरी

केंद्र सकरारने हमीभाव वाढविल्याने शेतकरी डाळवर्गीय पीक लागवडीकडे वळला आहे. यंदा डाळी प्रचंड महाग होतील, एवढेही पीक कमी आलेले नाही. त्यानंतरही तूर आणि अन्य डाळींचे भाव का वाढत आहेत, हे एक आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्याचे पीक घेतले जाते. राजस्थान व मध्य प्रदेशातून डाळींचा पुरवठा होतो. त्यानंतरही डाळी महागच आहेत. डाळीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर कमी होण्याची चिन्हे नसल्याचे रमेश उमाटे यांनी सांगितले.

कंपन्यांकडे जास्त साठा, धाडी टाकाव्यात

मोठ्या कंपन्यांकडे लाखो टन साठा असल्याचा ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. सरकार मोठ्या कंपन्यांवर कारवाई करत नाही. त्याचा भुर्दंड सामान्यांवर बसत आहे. दर अचानक वाढल्याने ग्राहकांना डाळींसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. दर आवाक्यात आणण्यासाठी सरकारने तालुका आणि जिल्हास्तरावरील स्टॉकिस्टवर धाडी टाकाव्यात. अनेक दालमील मालकांनी भूमिगत टाक्यात तूरीचा साठा केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त माल आहे. अतोनात नफा कमविण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सामान्य पिचला जात आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक दालमीलची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी गजानन पांडे यांनी केले आहे.

डाळी दोन महिन्यांपूर्वीचे भाव आताचे भाव (प्रतिकिलो)

तूर १२८-१४० १५०-१६५हरभरा ५३-५५ ७२-८०मसूर ७५-८० ८२-८६उडीद मोगर ९०-१२० १०८-१४०मूग मोगर ९०-९५ १०८-१२४

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर