शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पोलिस आयुक्तांचा संकल्प सव्वा महिन्यातच हवेत, चौकांमध्ये पुन्हा परतले भिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:04 IST

‘जी-२०’च्या तोंडावर राबवले होते ‘मिशन भिकारीबंदी’

नागपूर : मार्च महिन्यात नागपुरात झालेल्या ‘जी-२०’ समिटच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ‘मिशन भिकारीबंदी’ राबविण्यात आले होते. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात अधिसूचनादेखील जारी केली होती. मात्र, सव्वा महिन्यातच आयुक्तांचा संकल्प हवेत विरल्याचे चित्र असून, शहरातील काही चौकांमध्ये भिकारी परतल्याचे दिसून येत आहे. वर्दळीच्या चौकांमध्ये भीक मागणेदेखील सुरू झाले असून, ‘जी-२०’पुरताच हा दिखावा होता का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मागील अनेक वर्षांपासून नागपूर शहरात चौकाचौकांत उभे राहून भीक मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात नागरिकांकडून वारंवार ओरड होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र, मार्च महिन्यात ‘जी-२०’च्या तोंडावर युद्धपातळीवर नागपूर पोलिसांनी भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले होते. पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या निर्देशांनुसार वाहतूक सिग्नल व रस्त्याच्या कडेला तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भीक मागण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच जे लोक याचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यात नमूद होते. ९ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत हे निर्देश लागू राहतील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मागील काही दिवसांअगोदरच भिकारी काही चौकांमध्ये दिसून येत आहेत. त्याकडे पोलिस प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे.

या भागांमध्ये परतले भिकारी

शहरातील विविध चौकांमध्ये भिकाऱ्यांचा वावर होता. महिनाभर सगळीकडेच शांतता होती. मात्र, आता परत भिकारी परतले आहेत. मुंजे चौक, यशवंत स्टेडियम, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट, सीताबर्डी, इतवारी या भागांमध्ये भिकारी दिसून येत आहेत. सीताबर्डी व लगतच्या भागांमध्ये चौकांमध्ये उभे राहून भीक मागणेदेखील सुरू झाले आहे. पोलिसांची तेथे नियमित गस्त असते. मात्र, कुठलीही कारवाई झालेली नाही.

भिकाऱ्यांची सोय व्हावी, उपद्रव टाळावा

अनेक भिकारी हे उन्हाळ्यामुळे शहरात परतले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी परतल्याचे अनेकांनी सांगितले. प्रशासनाकडून त्यांच्या रोजीरोटीची सोय करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक भिकाऱ्यांच्या गटांनी फुटपाथदेखील काबीज केले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनादेखील त्रास होतो. बरेचदा काही भिकारी अमली पदार्थांच्या नशेत रस्त्यांवर उपद्रव करतात. जाणूनबुजून असा प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे, असादेखील नागरिकांचा सूर आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर