शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

पोलिस आयुक्तांचा संकल्प सव्वा महिन्यातच हवेत, चौकांमध्ये पुन्हा परतले भिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:04 IST

‘जी-२०’च्या तोंडावर राबवले होते ‘मिशन भिकारीबंदी’

नागपूर : मार्च महिन्यात नागपुरात झालेल्या ‘जी-२०’ समिटच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ‘मिशन भिकारीबंदी’ राबविण्यात आले होते. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात अधिसूचनादेखील जारी केली होती. मात्र, सव्वा महिन्यातच आयुक्तांचा संकल्प हवेत विरल्याचे चित्र असून, शहरातील काही चौकांमध्ये भिकारी परतल्याचे दिसून येत आहे. वर्दळीच्या चौकांमध्ये भीक मागणेदेखील सुरू झाले असून, ‘जी-२०’पुरताच हा दिखावा होता का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मागील अनेक वर्षांपासून नागपूर शहरात चौकाचौकांत उभे राहून भीक मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात नागरिकांकडून वारंवार ओरड होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र, मार्च महिन्यात ‘जी-२०’च्या तोंडावर युद्धपातळीवर नागपूर पोलिसांनी भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले होते. पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या निर्देशांनुसार वाहतूक सिग्नल व रस्त्याच्या कडेला तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भीक मागण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच जे लोक याचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यात नमूद होते. ९ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत हे निर्देश लागू राहतील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मागील काही दिवसांअगोदरच भिकारी काही चौकांमध्ये दिसून येत आहेत. त्याकडे पोलिस प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे.

या भागांमध्ये परतले भिकारी

शहरातील विविध चौकांमध्ये भिकाऱ्यांचा वावर होता. महिनाभर सगळीकडेच शांतता होती. मात्र, आता परत भिकारी परतले आहेत. मुंजे चौक, यशवंत स्टेडियम, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट, सीताबर्डी, इतवारी या भागांमध्ये भिकारी दिसून येत आहेत. सीताबर्डी व लगतच्या भागांमध्ये चौकांमध्ये उभे राहून भीक मागणेदेखील सुरू झाले आहे. पोलिसांची तेथे नियमित गस्त असते. मात्र, कुठलीही कारवाई झालेली नाही.

भिकाऱ्यांची सोय व्हावी, उपद्रव टाळावा

अनेक भिकारी हे उन्हाळ्यामुळे शहरात परतले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी परतल्याचे अनेकांनी सांगितले. प्रशासनाकडून त्यांच्या रोजीरोटीची सोय करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक भिकाऱ्यांच्या गटांनी फुटपाथदेखील काबीज केले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनादेखील त्रास होतो. बरेचदा काही भिकारी अमली पदार्थांच्या नशेत रस्त्यांवर उपद्रव करतात. जाणूनबुजून असा प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे, असादेखील नागरिकांचा सूर आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर