शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

'भूमिका घेण्याचे क्षण आयुष्यात मोजके; ते साधले म्हणून 'बाबूजी' महान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2023 21:14 IST

Nagpur News मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले.

ठळक मुद्देगृहमंत्री अमित शाह यांच्याकडून जवाहरलाल दर्डा यांना अभिवादन

नागपूर : आपण स्वत: की आयुष्यभर जपलेली मूल्ये, सिद्धांत यापैकी एकाची निवड करण्याचे, भूमिका घेण्याचे क्षण मोजके असतात. अशावेळी मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात जवाहरलाल दर्डा यांची इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित एक आठवण सांगितली. समाजसेविका सीमा साखरे मधुमालती नावाने ‘लोकमत’मध्ये सदर लिहायच्या. इंदिरा गांधी व मनेका गांधी यांच्यातील वादावेळी त्यांनी त्या सदरात इंदिरा गांधी यांच्यावर प्रखर टीका केली. हा लेख इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचला. दर्डा यांना बोलावून विचारणा करण्यात आली. यावेळी बाबूजींनी आपण आपल्या वृत्तपत्रात पत्रकारांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे सांगितले. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्रास सहन करू, पण तडजोड नाही, अशी भूमिका बाबूजींनी घेतली. तो आठवणीचा धागा पकडून श्री. शाह म्हणाले, की इंदिरा गांधी यांच्यासमोर जवाहरलाल दर्डा यांनी जी ठोस भूमिका मांडली ती मोठी गोष्ट होती. अशा घटनाच बाबूजींसारख्या व्यक्तीला अमरत्व देतात. अशा भूमिका घेता आल्यामुळेच बाबूजींनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

ते पुढे म्हणाले, बाबूजींच्या आयुष्यातून बरेच काही शिकायला हवे. स्वातंत्र्यानंतर राजकारणात सक्रिय असताना त्यांनी एक चांगले वर्तमानपत्र समाजात कसे कार्य करू शकते याचे तत्त्व व मापदंड निश्चित केले. बाबूजींनी याबाबत कुठलेही लेखी ‘चार्टर’ लिहिले नाही, तर त्यांनी त्यांच्या कृतीतून हे तत्त्व संस्थेतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविले व पत्रकारितेत आदर्श प्रस्थापित केला. स्वातंत्र्याच्या चळवळीत बाबूजींनी जवळपास पावणेदोन वर्षे कारावास भोगला. सुभाषचंद्र बोस यांच्या आझादहिंद सेनेची शाखा त्यांनी १९४४ मध्ये यवतमाळमध्ये स्थापन केली. जीवनात ठोस भूमिका घेण्याची वेळ आयुष्यात दोन-तीनवेळाच येते. मला माझा विचार करायचा की तत्त्वांवर ठाम राहायचे, यातून एकाची निवड करायची असते. तत्त्वांवर ठाम राहणारी भूमिका घेण्याचा क्षण व्यक्तीला महान बनवतो.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात व्यक्तीचा विरोध नको, हे तत्त्व बाबूजींनी पाळले. वसंतराव नाईक यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते, पण दोघांची वाट वेगळी झाली तेव्हा त्यांनी अत्यंत सुशीलतेने 'ऋणानुबंधाच्या तुटल्या गाठी' अशा मथळ्याचा अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखातही बाबूजींनी वसंतराव नाईक यांची स्तुती केली होती. विचाराने वेगळे झालो आहोत, पण मनाने नाही, अशा भावना त्यातून त्यांनी व्यक्त केल्या होत्या. आजच्या राजकारणात हे फार महत्त्वाचे आहे. आज अनेकवेळा पक्षामध्ये आणि पक्षाबाहेर लोक एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात, पण राजकारणात आपला फक्त वैचारिक विरोध असतो. व्यक्तीचा विरोध नसतो. बाबूजी त्या परंपरेचे वाहक होते, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLokmat Eventलोकमत इव्हेंट