शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

'भूमिका घेण्याचे क्षण आयुष्यात मोजके; ते साधले म्हणून 'बाबूजी' महान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2023 21:14 IST

Nagpur News मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले.

ठळक मुद्देगृहमंत्री अमित शाह यांच्याकडून जवाहरलाल दर्डा यांना अभिवादन

नागपूर : आपण स्वत: की आयुष्यभर जपलेली मूल्ये, सिद्धांत यापैकी एकाची निवड करण्याचे, भूमिका घेण्याचे क्षण मोजके असतात. अशावेळी मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात जवाहरलाल दर्डा यांची इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित एक आठवण सांगितली. समाजसेविका सीमा साखरे मधुमालती नावाने ‘लोकमत’मध्ये सदर लिहायच्या. इंदिरा गांधी व मनेका गांधी यांच्यातील वादावेळी त्यांनी त्या सदरात इंदिरा गांधी यांच्यावर प्रखर टीका केली. हा लेख इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचला. दर्डा यांना बोलावून विचारणा करण्यात आली. यावेळी बाबूजींनी आपण आपल्या वृत्तपत्रात पत्रकारांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे सांगितले. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्रास सहन करू, पण तडजोड नाही, अशी भूमिका बाबूजींनी घेतली. तो आठवणीचा धागा पकडून श्री. शाह म्हणाले, की इंदिरा गांधी यांच्यासमोर जवाहरलाल दर्डा यांनी जी ठोस भूमिका मांडली ती मोठी गोष्ट होती. अशा घटनाच बाबूजींसारख्या व्यक्तीला अमरत्व देतात. अशा भूमिका घेता आल्यामुळेच बाबूजींनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

ते पुढे म्हणाले, बाबूजींच्या आयुष्यातून बरेच काही शिकायला हवे. स्वातंत्र्यानंतर राजकारणात सक्रिय असताना त्यांनी एक चांगले वर्तमानपत्र समाजात कसे कार्य करू शकते याचे तत्त्व व मापदंड निश्चित केले. बाबूजींनी याबाबत कुठलेही लेखी ‘चार्टर’ लिहिले नाही, तर त्यांनी त्यांच्या कृतीतून हे तत्त्व संस्थेतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविले व पत्रकारितेत आदर्श प्रस्थापित केला. स्वातंत्र्याच्या चळवळीत बाबूजींनी जवळपास पावणेदोन वर्षे कारावास भोगला. सुभाषचंद्र बोस यांच्या आझादहिंद सेनेची शाखा त्यांनी १९४४ मध्ये यवतमाळमध्ये स्थापन केली. जीवनात ठोस भूमिका घेण्याची वेळ आयुष्यात दोन-तीनवेळाच येते. मला माझा विचार करायचा की तत्त्वांवर ठाम राहायचे, यातून एकाची निवड करायची असते. तत्त्वांवर ठाम राहणारी भूमिका घेण्याचा क्षण व्यक्तीला महान बनवतो.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात व्यक्तीचा विरोध नको, हे तत्त्व बाबूजींनी पाळले. वसंतराव नाईक यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते, पण दोघांची वाट वेगळी झाली तेव्हा त्यांनी अत्यंत सुशीलतेने 'ऋणानुबंधाच्या तुटल्या गाठी' अशा मथळ्याचा अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखातही बाबूजींनी वसंतराव नाईक यांची स्तुती केली होती. विचाराने वेगळे झालो आहोत, पण मनाने नाही, अशा भावना त्यातून त्यांनी व्यक्त केल्या होत्या. आजच्या राजकारणात हे फार महत्त्वाचे आहे. आज अनेकवेळा पक्षामध्ये आणि पक्षाबाहेर लोक एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात, पण राजकारणात आपला फक्त वैचारिक विरोध असतो. व्यक्तीचा विरोध नसतो. बाबूजी त्या परंपरेचे वाहक होते, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLokmat Eventलोकमत इव्हेंट