शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

'भूमिका घेण्याचे क्षण आयुष्यात मोजके; ते साधले म्हणून 'बाबूजी' महान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2023 21:14 IST

Nagpur News मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले.

ठळक मुद्देगृहमंत्री अमित शाह यांच्याकडून जवाहरलाल दर्डा यांना अभिवादन

नागपूर : आपण स्वत: की आयुष्यभर जपलेली मूल्ये, सिद्धांत यापैकी एकाची निवड करण्याचे, भूमिका घेण्याचे क्षण मोजके असतात. अशावेळी मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात जवाहरलाल दर्डा यांची इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित एक आठवण सांगितली. समाजसेविका सीमा साखरे मधुमालती नावाने ‘लोकमत’मध्ये सदर लिहायच्या. इंदिरा गांधी व मनेका गांधी यांच्यातील वादावेळी त्यांनी त्या सदरात इंदिरा गांधी यांच्यावर प्रखर टीका केली. हा लेख इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचला. दर्डा यांना बोलावून विचारणा करण्यात आली. यावेळी बाबूजींनी आपण आपल्या वृत्तपत्रात पत्रकारांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे सांगितले. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्रास सहन करू, पण तडजोड नाही, अशी भूमिका बाबूजींनी घेतली. तो आठवणीचा धागा पकडून श्री. शाह म्हणाले, की इंदिरा गांधी यांच्यासमोर जवाहरलाल दर्डा यांनी जी ठोस भूमिका मांडली ती मोठी गोष्ट होती. अशा घटनाच बाबूजींसारख्या व्यक्तीला अमरत्व देतात. अशा भूमिका घेता आल्यामुळेच बाबूजींनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

ते पुढे म्हणाले, बाबूजींच्या आयुष्यातून बरेच काही शिकायला हवे. स्वातंत्र्यानंतर राजकारणात सक्रिय असताना त्यांनी एक चांगले वर्तमानपत्र समाजात कसे कार्य करू शकते याचे तत्त्व व मापदंड निश्चित केले. बाबूजींनी याबाबत कुठलेही लेखी ‘चार्टर’ लिहिले नाही, तर त्यांनी त्यांच्या कृतीतून हे तत्त्व संस्थेतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविले व पत्रकारितेत आदर्श प्रस्थापित केला. स्वातंत्र्याच्या चळवळीत बाबूजींनी जवळपास पावणेदोन वर्षे कारावास भोगला. सुभाषचंद्र बोस यांच्या आझादहिंद सेनेची शाखा त्यांनी १९४४ मध्ये यवतमाळमध्ये स्थापन केली. जीवनात ठोस भूमिका घेण्याची वेळ आयुष्यात दोन-तीनवेळाच येते. मला माझा विचार करायचा की तत्त्वांवर ठाम राहायचे, यातून एकाची निवड करायची असते. तत्त्वांवर ठाम राहणारी भूमिका घेण्याचा क्षण व्यक्तीला महान बनवतो.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात व्यक्तीचा विरोध नको, हे तत्त्व बाबूजींनी पाळले. वसंतराव नाईक यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते, पण दोघांची वाट वेगळी झाली तेव्हा त्यांनी अत्यंत सुशीलतेने 'ऋणानुबंधाच्या तुटल्या गाठी' अशा मथळ्याचा अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखातही बाबूजींनी वसंतराव नाईक यांची स्तुती केली होती. विचाराने वेगळे झालो आहोत, पण मनाने नाही, अशा भावना त्यातून त्यांनी व्यक्त केल्या होत्या. आजच्या राजकारणात हे फार महत्त्वाचे आहे. आज अनेकवेळा पक्षामध्ये आणि पक्षाबाहेर लोक एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात, पण राजकारणात आपला फक्त वैचारिक विरोध असतो. व्यक्तीचा विरोध नसतो. बाबूजी त्या परंपरेचे वाहक होते, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLokmat Eventलोकमत इव्हेंट