शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अबब! हातमजुरी करणाऱ्या मजुराला आले १८ हजारांचे पाणी बील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 20:29 IST

Nagpur News वाढत्या महागाईचे चटके सोसत असलेल्या गरिबांना महापालिकेच्या पाण्याच्या बिलानेही होरपळून टाकले आहे. भानखेड्यातील एका ग्राहकाकडे एक खोलीचे घर आहे. पण त्याला आलेले पाण्याचे बिल १८,३०३ रुपये आहे.

नागपूर : वाढत्या महागाईचे चटके सोसत असलेल्या गरिबांना महापालिकेच्या पाण्याच्या बिलानेही होरपळून टाकले आहे. भानखेड्यातील एका ग्राहकाकडे एक खोलीचे घर आहे. पण त्याला आलेले पाण्याचे बिल १८,३०३ रुपये आहे. कुंभारपुरा, संत्रा मार्केट येथीलही एका व्यक्तीला १७ हजाराचे पाणी बिल आले आहे. हे दोन्ही ग्राहक पाणी बिल कमी करण्यासाठी जलप्रदाय विभागाच्या चकरा मारत आहेत.

भानखेडा येथील तुळजाबाई मंदिराजवळ राहणारे कन्हैय्या गौर यांनी दोन वर्षापूर्वी नळाचे कनेक्शन घेतले. २ वर्षात त्यांना महापालिकेने बिल पाठविले नाही. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच १८,३०३ रुपये बिल पाठविले. कन्हैय्या गौर यांचे एका खोलीचे घर आहे. कॉटन मार्केटमध्ये हातमजुरी करून २०० ते ३०० रुपये कमवितात. अशात १८ हजाराचे बिल बघून ते चिंतेत पडले आहे.

पांडुरंग गौर यांनीही जलप्रदाय विभागाला तक्रार केली आहे. ते १० बाय १० च्या खोलीत राहतात. त्यांना १७,९०१ रुपये पाणी बिल आले आहे. यासंदर्भात जलप्रदाय विभागाकडे तक्रार केली असता, त्यांना सांगण्यात आले की तुमच्या नळाचे कनेक्शन लिक आहे. त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना बिलाचे हप्ते पाडून देण्यात आले. परंतु मार्च महिन्यांत त्यांना परत २४ हजार रुपये पाण्याचे बिल आल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहे.

पाणी बिलासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, आम्ही बिल भरण्यास तयार आहोत, पण आमचा वापर किती बिल किती याची तफावत बघावी, अशी मागणी या ग्राहकांनी जलप्रदाय विभागाकडे केली आहे.

टॅग्स :Waterपाणी