शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

अबब! हातमजुरी करणाऱ्या मजुराला आले १८ हजारांचे पाणी बील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 20:29 IST

Nagpur News वाढत्या महागाईचे चटके सोसत असलेल्या गरिबांना महापालिकेच्या पाण्याच्या बिलानेही होरपळून टाकले आहे. भानखेड्यातील एका ग्राहकाकडे एक खोलीचे घर आहे. पण त्याला आलेले पाण्याचे बिल १८,३०३ रुपये आहे.

नागपूर : वाढत्या महागाईचे चटके सोसत असलेल्या गरिबांना महापालिकेच्या पाण्याच्या बिलानेही होरपळून टाकले आहे. भानखेड्यातील एका ग्राहकाकडे एक खोलीचे घर आहे. पण त्याला आलेले पाण्याचे बिल १८,३०३ रुपये आहे. कुंभारपुरा, संत्रा मार्केट येथीलही एका व्यक्तीला १७ हजाराचे पाणी बिल आले आहे. हे दोन्ही ग्राहक पाणी बिल कमी करण्यासाठी जलप्रदाय विभागाच्या चकरा मारत आहेत.

भानखेडा येथील तुळजाबाई मंदिराजवळ राहणारे कन्हैय्या गौर यांनी दोन वर्षापूर्वी नळाचे कनेक्शन घेतले. २ वर्षात त्यांना महापालिकेने बिल पाठविले नाही. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच १८,३०३ रुपये बिल पाठविले. कन्हैय्या गौर यांचे एका खोलीचे घर आहे. कॉटन मार्केटमध्ये हातमजुरी करून २०० ते ३०० रुपये कमवितात. अशात १८ हजाराचे बिल बघून ते चिंतेत पडले आहे.

पांडुरंग गौर यांनीही जलप्रदाय विभागाला तक्रार केली आहे. ते १० बाय १० च्या खोलीत राहतात. त्यांना १७,९०१ रुपये पाणी बिल आले आहे. यासंदर्भात जलप्रदाय विभागाकडे तक्रार केली असता, त्यांना सांगण्यात आले की तुमच्या नळाचे कनेक्शन लिक आहे. त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना बिलाचे हप्ते पाडून देण्यात आले. परंतु मार्च महिन्यांत त्यांना परत २४ हजार रुपये पाण्याचे बिल आल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहे.

पाणी बिलासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, आम्ही बिल भरण्यास तयार आहोत, पण आमचा वापर किती बिल किती याची तफावत बघावी, अशी मागणी या ग्राहकांनी जलप्रदाय विभागाकडे केली आहे.

टॅग्स :Waterपाणी